धो डाला… पाणी तुंबले, वाहतूक कोंडी, घराघरात पाणी, पहिल्याच पावसात मुंबईची दाणादाण

राज्यात मॉन्सूनचा पाऊस दाखल झाला. या पावसाने थैमान घातले. एकाच दिवसात रस्ते जलमय झाले. सर्वत्र पाणीच पाणी साचले. त्यामध्येच पुढील काही तासात पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता आहे. तसा इशारा हवामान विभागाने दिला.

धो डाला… पाणी तुंबले, वाहतूक कोंडी, घराघरात पाणी, पहिल्याच पावसात मुंबईची दाणादाण
weather
| Updated on: Jun 24, 2026 | 9:09 AM

मॉन्सून राज्यभरात दाखल झाला. पहिल्याच दिवसात तीनतेरा वाजले आहेत. रात्रभर झालेल्या मुसळधार पावसाने रस्ते जलमय झाले. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले. दादरच्या परिसरात झाड गाडीवर पडल्याने नुकसान झाले. कुर्ला, सायन सर्कलमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले. धरण क्षेत्रात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. पाणीटंचाईचे मोठे संकट होते. अंधेरी सबवे बंद आहे. कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका आता थेट लोकांच्या घरापर्यंत पोहोचला आहे. कांदिवली पूर्व हनुमान नगर येथील राधा कृष्ण सोसायटीमध्ये राहणाऱ्या लोकांच्या घरात पावसाचे पाणी शिरल्याचे समोर आले आहे.

राधा कृष्ण सोसायटीतील रहिवाशांच्या घरात रात्री पाणी शिरले. त्यामुळे या सोसायटीतील लोकांनी रात्रभर घरातील पाणी बाहेर काढण्याचे काम केले. सध्या पावसाचा जोर कमी झाला असून हलक्या सरी सुरू आहेत. आता घरांमधील पाणी ओसरले आहे. मात्र पुन्हा जोरदार पाऊस झाल्यास परिस्थिती बिघडण्याची भीती रहिवासी व्यक्त करत आहेत.

पुढील 3 तासात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. दादर, माटूंगा, अंधेरी, कुर्ला, सायन या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. फक्त मुंबई आणि उपनगरेच नाही तर राज्यभरात हीच स्थिती आहे. पुण्यातही मुसळधार पाऊस आहे. मोठा इशारा भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आला.

अकोला जिल्ह्यातल्या अकोट शहरात मुसळधार पावसाचा फटका, अनेक घरांमध्ये पाणी शिरले असून पाणी काढत रात्र जागून काढावी लागली आहे. तर रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. खामगाव, शेगाव, संग्रामपूर सह इतर तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागात मुसळधार पाऊस झाला. यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.. नेमका हा पाऊस पेरणी करता कसा दिलासादायक ठरतो याकडे देखील बळीराजा लक्ष ठेवून आहे. .

Follow Us