Jalna | जालन्यात समर्थ रामदासांच्या जांब येथील राम मंदिरातील चोरीचे विधानसभेत पडसाद, राजेश टोपेंच्या मुद्द्यावर फडणवीसांचं आश्वसान काय?

जालना येथील घटनेचा मुद्दा आमदार राजेश टोपे यांनी विधानसभेत उपस्थित केला. पहाटे तीन वाजता चोरट्यांनी जांब समर्थ येथील मंदिरातील मूर्ती चोरल्याने लोकांमध्ये रोष आहे.

Jalna | जालन्यात समर्थ रामदासांच्या जांब येथील राम मंदिरातील चोरीचे विधानसभेत पडसाद, राजेश टोपेंच्या मुद्द्यावर फडणवीसांचं आश्वसान काय?
जांब समर्थ येथील मूर्तींची चोरीImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 22, 2022 | 7:14 PM

जालनाः जालना येथील समर्थ रामदास स्वामी (Ramdas Swami) यांच्या जन्मगावी म्हणजेच जांब समर्थ (Jamb Samarth) येथील राम मंदिरातून ऐतिहासिक मूर्ती चोरीला गेल्याची मोठी घटना घडली. याचे पडसाद आज विधानसभेतही (Maharashtra Assembly) उमटले. अज्ञात चोरच्यांनी मंदिरातील ऐतिहासिक दुर्मिळ पंचधातूंच्या मूर्ती चोरल्या. समर्थ रामदास स्वामी यांनी प्रतिष्ठापना केलेल्या राम, लक्ष्मण आणि सीतेची मूर्ती काल रात्री चोरीला गेली. रविवारी रात्री तीन वाजेच्या सुमारास ही चोरी झाल्याचे उघडकीस आले. यासंदर्भातील मुद्दा जालना विधानसभेचे आमदार राजेश टोपे यांनी आज अधिवेशनात उपस्थित केला. सदर घटनेमुळे जनमानसात रोष आहे. या प्रकरणी गांभीर्यानं कारवाई होण्याची मागणी त्यांनी केली. रविवारी मध्यरात्रीनंतर घडलेल्या या घटनेमुळे जांब आणि जालना परिसरात खळबळ माजली आहे. राज्यभरातून जांब येथे दर्शनासाठी दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक येत असतात. त्यामुळे ही बातमी ऐकून भाविकांमध्येही नाराजीचं वातावरण आहे.

चोरीची घटना काय?

जांब समर्थ हे समर्थ रामदास स्वामी यांचे जन्मगाव आहे. जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात हे गाव आहे. येथील रामदास स्वामी यांच्या प्राचीन घरात राम मंदिर आहे. रामदास स्वामी यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ हे मंदिर बनवण्यात आले आहे. याच मंदिरातील पंचायतन म्हणजेच राम, लक्ष्मण, सीता, भरत, शत्रूघ्न हे पंचायत चोरीला गेले आहे. तसेच समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेली राम लक्ष्मण सीतेची मूर्तीही चोरट्यांनी पळवून नेली आहे. एवढंच नाही तर रामदास स्वामींच्या झोळीत नेहमीच एक मारुतीची मूर्ती असायची, तीदेखील चोरच्यांनी पळवली. ही घटना घडल्यानंतर जालन्यात खळबळ माजली आहे. पोलीस या प्रकरणी कसून चौकशी करत आहेत.

हे सुद्धा वाचा
Jalna

जांब समर्थ येथील याच मूर्ती चोरीला गेल्या आहेत

देवेंद्र फडणीवसांचं आश्वासन काय ?

जालना येथील घटनेचा मुद्दा आमदार राजेश टोपे यांनी विधानसभेत उपस्थित केला. पहाटे तीन वाजता चोरट्यांनी जांब समर्थ येथील मंदिरातील मूर्ती चोरल्याने लोकांमध्ये रोष आहे. राज्यभरातून येथे मोठ्या संख्येने भाविक येतात. त्यामुळे या प्रकरणाची गांभीर्यानं नोंद घेऊन कारवाई करावी, अशी मागणी राजेश टोपे यांनी केली. यावर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, याबद्दल मला सकाळीच माहिती कळाली. यासंदर्भात मी पोलिस महासंचालकांशी बोललो आहे. संपूर्ण ताकद लावून या प्रकरणाची चौकशी व्हावी, तसेच आरोपींना पकडून मूर्ती परत आणून द्याव्यात असे आदेश दिले असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं.

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.