Manoj Jarange Patil Sabha : मनोज जरांगे पाटील यांची जालन्यात विराट सभा; सरकारला 10 दिवसांचा अल्टिमेटम
Manoj Jarange Patil Sabha : अंतरवली सराटी गावातील सभास्थळी मनोज जरांगे पाटील यांच्यावर फुलांची उधळण करण्यात आली आहे. मराठा आंदोलकांकडून त्यांचं भव्य स्वागत करण्यात आलं. सभेतून जरांगे यांनी सरकारला काय इशारा दिला? सरकारकडे काय मागण्या केल्या? वाचा सविस्तर....
1 / 5

मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील अंतरवली सराटी गावात भव्य सभा झाली. या सभेला महाराष्ट्रभरातून लोक आले होते. सभास्थळी प्रचंड गर्दी झाली होती.
2 / 5

3 / 5

मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही. तोपर्यंत मी एक इंचही मागे हटणार नाही, अशी भूमिका मनोज जरांगे यांनी घेतली आहे. त्यांनी उपस्थितांना आश्वस्त केलं.
4 / 5

मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थितांना संबोधित केलं. तेव्हा त्यांनी सरकारला 10 दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. येत्या 10 दिवसात सरकारने याबाबत निर्णय घ्यावा अन्यथा आंदोलन करू, असा इशारा जरांगे यांनी दिला.
5 / 5

मनोज जरांगे पाटील यांनी या सभेतून सरकारकडे आरक्षणाची मागणी केली आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी असल्याचं प्रमाणपत्र द्या आणि मराठ्यांचा ओबीसीमध्ये समावेश करा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
Follow Us