AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘हे’ पाच मुद्दे पटले तरच सोयरीक जमणार, नाहीतर…; मनोज जरांगे पाटील यांचा राज्य सरकारला टाईमबॉंड!

Manoj Jarange Patil Andolan For Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांच्या सरकारला पाच अटी; टाईमबॉंड देत म्हणाले...

'हे' पाच मुद्दे पटले तरच सोयरीक जमणार, नाहीतर...; मनोज जरांगे पाटील यांचा राज्य सरकारला टाईमबॉंड!
| Updated on: Sep 12, 2023 | 3:55 PM
Share

जालना | 12 सप्टेंबर 2023 : मराठा आरक्षण प्रश्नी उपोषण करत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी काही वेळा आधी मराठा बांधवांशी संवाद साधला. उपोषण मागे घेण्याची विनंती सर्वच स्तरातून मागणी होत आहे. अशात पुढचा निर्णय काय घ्यायचा, याबाबत समाज बांधवांशी चर्चा करून निर्णय घ्यायचा असा त्यांचा मानस आहे. त्यासाठी त्यांनी उपस्थित समाज बांधवांशी चर्चा केली. यावेळी त्यानी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी सरकारला पाच प्रश्न विचारले आहेत. या पाच मुद्द्यांची पूर्तता झाली तरच आपण निर्णय मागे घेणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

मनोज पाटील यांच्या सरकारला पाच अटी

  1. अहवाल कसाही येवो, आरक्षण द्यावं लागेल.
  2. मराठा आंदोलकांवर महाराष्ट्रात जेवढे गुन्हे दाखल झाले आहेत. तेवढे मागे घ्यायचे.
  3. आंदोलकांवर लाठीमार करणाऱ्या अधिकारी कर्मचारी निलंबित करा.
  4. उपोषण सोडायला, मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री संपूर्ण मंत्रिमंडळ आणि छत्रपती संभाजीराजे आणि उदयनराजे आले पाहिजेत
  5. सरकारच्या वतीने हे सर्व लिहून द्यावं

सरकारला जर वेळ द्यायचा असेल तर सरकारने तसं सांगावं की महिनाभरात आम्ही मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलं पाहिजे. महिना पूर्ण झाला की 31 व्या दिवसापासून मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायला सुरु करा. कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत सरकारने भूमिका घ्यावी, ती जाहीर करावी, असं म्हणत जरांगे पाटील यांनी सरकारला टाईमबाँड दिला आहे.

तज्ज्ञाचं मत आहे की, आरक्षण प्रक्रिया बनवायला वेळ लागतो. सरकार म्हणते एक दिवसात शासन आदेश काढतो पण तो टिकणार नाही आणि हे खरं आहे. 40 वर्षांपासून मराठ्यांनी मेहनत घेतली. मी अभ्यासक किंवा ज्ञानी नाही. गैरसमज आणि समज तुमच्यात आणि आमच्यात आपण करायचा नाही. मी तीन आदेश नाकारले. आता आयुष्यभराचं आरक्षण मिळालं पाहिजे. ते एक दोन वर्षाचं नको. आरक्षण हा मराठ्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे, असं जरांगे म्हणाले.

Follow Us
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत.
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.