AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde | “तुम्ही फक्त बाळासाहेब यांचे…”, एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांच्याबाबत काय म्हणाले?

उद्धव ठाकरे यांनी खेडमधील गोळीबार मैदानात 5 मार्चला घेतलेल्या सभेतून शिंदे शिवसेनेवर आरोप आणि टीका केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी शिंदे शिवसेनेकडून गोळीबार मैदानातच उत्तर सभेचं आयोजन करण्यात आलं आहे.

Eknath Shinde |  तुम्ही फक्त बाळासाहेब यांचे..., एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांच्याबाबत काय म्हणाले?
| Updated on: Mar 19, 2023 | 10:04 PM
Share

खेड | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. सत्तेसाठी उद्धव ठाकरे यांच्या विचाराशी तडजोड केली. मुख्यमंत्र्याच्या खुर्चीच्या मोहापोटी उद्धव यांना बाळासाहेबांच्या विचारांचा विसर पडला, अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. उबाठा गटाकडून 5 मार्च रोजी खेडमधील गोळीबार मैदानात जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेतून ठाकरे गटाकडून राज्य सरकार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका आणि आरोप करण्यात आले होते. या आरोपांना आणि टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी शिंदेच्या शिवसेनेकडून उत्तर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेत ते बोलत

एकनाथ शिंदे काय म्हणाले?

“बाळासाहेब हे तुमचे वडील होते, हे किती वेळा सांगणार? ते संपूर्ण जगाला मान्य आहे. पण ते सर्व शिवसैनिकांचं दैवत होतं. तुम्ही त्यांना वडील वडील करुन संकुचित करु नका. खोटी सहानभूती मिळवण्याचा प्रयत्न करु नका, राज्याची जनता सुज्ञ आहे, ती माफ करणार नाही”, अंसही शिंदे यांनी ठाकरेंना सुनावलं.

“तुम्ही बाळासाहेबांच्या संपत्तीचे वारसदार आहात.त्यांची संपत्ती आम्हाला नको. बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती आहे”, असं शिंदे म्हणाले.

उद्धव ठाकरे यांच्यावर टीका

आज खेडमध्ये सभा घेत आहोत ती काही ठाकरे गटाच्या आदळआपटला आणि थयथयाटाला उत्तर देण्यासाठी आलो नाही तर कोकणातील शिवसैनिकांच्या प्रेमाखातर ही विराट सभा घेत असल्याचे सांगत त्यांनी रामदास कदम आणि योगेश कदम यांचाही यावेळी गौरव केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सभेतून ठाकरे गटाबरोबरच उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, शरद पवार आणि राहुल गांधी यांच्यावरही जोरदार हल्लाबोल केला.

यावेळी राहुल गांधी यांच्यावर त्यांनी निशाणा साधताना राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका केली. त्यांच्यासोबत तुम्ही जाता, त्यांच्या गळ्यात गळा घालता असं म्हणत आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता त्यांनी त्यांच्यावर टीका केली.

उद्धव ठाकरे यांनी गद्दारी, खोके यांच्याशिवाय त्यांच्याकडे बोलण्यासाठी आता दुसरे शब्दच नाहीत. तेही शब्द ते फक्त सहानुभूती मिळवण्यासाठी करत असल्याचा घणाघातही त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.

Follow Us
सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा सोहळा
Sindhudurg Vatpurnima Celebration | ऐकावं ते नवलच! सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा अनोखा सोहळा
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
Uddhav Thackeray | नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर घणाघात
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी
मोठी बातमी! अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी; कोर्टाचा मोठा निर्णय
फडणवीसांच्या PM शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा
Uddhav Thackeray | फडणवीसांच्या PM पदाच्या शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा; मराठी माणूस पंतप्रधान होत असेल तर....
नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की...
Pune Nasrapur Case | नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की जन्मठेप?; निकाल थोड्याच वेळात...
छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या..
Rohit Pawar | छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारला इशारा
सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच
Sindhudurg | सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच, शेतकरी चिंतेत!