AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरकार मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक, न्यायालयात…; जालन्यातील लाठीचार्जवर दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया

Deepak Kesarkar on Jalna Lathi Charge : सरकार मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक; जालन्यातील लाठीचार्जवर दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया. मराठा आरक्षण प्रश्नावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते नेमकं काय म्हणालेत? वाचा...

सरकार मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक, न्यायालयात...; जालन्यातील लाठीचार्जवर दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Sep 04, 2023 | 4:08 PM
Share

कोल्हापूर | 04 सप्टेंबर 2023 : जालन्यात झालेल्या लाठीचार्जवर मंत्री दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अधिकाऱ्यावर कारवाई करावी, ही मागणी केली जात आहे. जिल्हा पोलीस प्रमुखांना सक्तीच्या रजेवर पाठवलं आहे. त्या ठिकाणी शैलेश बलकवडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मराठा समाजाने शांत आणि संयमी आंदोलनं केली. आरक्षण मिळावं, हे राज्य सरकारला देखील वाटतं. सरकार मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक आहे, असं दीपक केसरकर म्हणाले आहेत. मराठा आरक्षण प्रश्नावरही दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राज ठाकरे हे देखील राज्याचे नेते आहेत. त्यांनी चौकशी करणं साहजिकच आहे.पण त्यातून काही मार्ग सर्वांना काढावा लागेल. अॅक्शन ताबडतोब घेतली आहे. मराठा आंदोलनातील कुणी दगडफेक करणार नाही. बाहेरचे कोण आहेत हे पाहण्यासाठी पोलीस चौकशी करत आहेत. आंदोलनाकडे राज्य सरकारने दुर्लक्ष केलेलं नाही. लवकरच त्यावर तोडगा निघेल, असा शब्दही दीपक केसरकर यांनी दिला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचा आंदोलकांशी फोनवरून संवाद सुरू आहेत. हे घडण्याआधापासून मुख्यमंत्री मनोज जरांगे पाटील यांच्या संपर्कात आहेत. प्रत्यक्ष भेट घेतली नाही म्हणजे दुर्लक्ष आहे, असं नाही. आज या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजातील प्रमुखांची तातडीची बैठक बोलावली. ती बैठक पार पडली आहे. लवकरच यावर तोडगा निघेल, असं दीपक केसरकर म्हणालेत.

मराठा समाजाबदल विशेष कायदा केला. तो कोर्टात टिकला. हे आम्ही काहीतरी करतोय, याचा पुरावा आहे. काही करत नाही, असं होऊ शकत नाही. राज्य सरकार जागरूक राहून मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे सरकारने पानं पुसली असं विरोधक म्हणू शकत नाहीत, असं केसरकर म्हणालेत.

आवश्यक असेल तर परीक्षा पुढे ढकलली जाईल. जर परिस्थिती तशी असेल तर निर्णय घेऊ. मुलांच्या भविष्यावर कोणताही परिणाम पडणार नाही. याची काळजी घेतली जाईल, असा शब्दही त्यांनी दिला आहे. हसन मुश्रीफ हे ज्येष्ठ नेते आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी शासन दरबारी उपक्रम घेतला आहे. जर गरज असेल तर मुश्रीफ यांच्याशी चर्चा करून जनता दरबार मीही घेण्याचा प्रयत्न करतो, असं म्हणत दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल