लातूर : (Nilanga) निलंगा तालुक्यातील केदारपूर येथे धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लग्न सोहळ्यातील जेवणातून विऱ्हाडी मंडळीला (Food Poisoning) अन्नातून विषबाधा झाल्याची घटना घडली असून 100 नागरिकांवर निलंगा उपजिल्हा रूग्णालय, अंबुलगा बु, देवणी तालुक्यातील वलांडी, जवळगा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. केदारपूर येथील वधू आणि देवणी तालुक्यातील जवळगा साकोळा येथील वर यांच्या (Marriage Function) विवाह समारंभ पार पडल्यानंतर जेवणावळी उठल्यानंतर काही वेळाने हा प्रकार समोर आला आहे.
रविवारी भर दुपारी लग्न सोहळा पार पडल्यानंतर वऱ्हाडी मंडळीच्या जेवणावळी उठल्या. त्या दरम्यान उन्हाचा पाराही चढलेलाच होता. लग्नासाठी केदारपूर काटेजवळगा, जवळगा ,अंबुलगा बु ,सिंदखेड यासह अनेक गावातून वऱ्हाडी लोक आले होते. पंगतीमधील ज्या नागरिकांनी वरण खाल्ले त्यांनाच पोटदुखी आणि उलटी याचा त्रास सुरु झाला होता. पोट दुखणे ,उलट्या आणि जुलाब अशी लक्षणे असलेल्या रुग्णाची संख्या वाढण्यास सुरुवात झाल्यावर जेवणातूनच विषबाधा झाल्याचे समोर आले.
केदारपूर येथील लग्न सोहळ्यात नागरिकांची मोठी गर्दी होती. दरम्यान, जेवणातून विषबाधा झाल्याचे लक्षात येताच रुग्णांची संख्या ही वाढत गेली. अंबुलगा बु येथील केंद्रामध्ये 80 रुग्ण दाखल झाले होते. तर सोमावरपर्यंत 250 जणांची नोंदणी झाली होती. अजूनही यातील काही रुग्णांवर उपचार सुरु आहेत तर काहींना औषधोपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे.
निलंगा तालुक्यातल्या आंबूलगा गावा जवळ असलेल्या केदारपूर इथं परवा एक लग्न होते,या लग्नात जेवण घेतल्या नंतर काही वेळाने अनेकांच्या पोटात दुखायला लागले, काहींना संडास उलट्याचा त्रास सुरू झाला. विशेष म्हणजे ज्यांनी भातावर वरण घेतले त्यांनाच हा त्रास जाणवला आहे.या विषबाधेमुळे कोणाचीही चिंताजनक प्रकृती नसून सर्वांना औषध उपचारा नंतर घरी पाठवण्यात आले आहे.