AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Summer Season: उन्हाळी सोयाबीन विकायचा विचारयं..! मग आगोदर दराचे चित्र काय ते पहाच?

उन्हाळी हंगामातील सोयाबीनची उत्पादकता ही कमी असते असे सांगितले जात होते पण झाले उलटेच. पोषक वातावरणामुळे बिगर हंगामातही उत्पादकता वाढवण्याचा प्रयत्न हा यशस्वी ठरला आहे. संपूर्ण हंगामात पाण्याची उपलब्धता, पोषक वातावरण आणि शेतकऱ्यांचे परिश्रम हे कामी आले आहेत. एकरी 8 ते 9 क्विंटल सोयाबीन उत्पादन मिळत आहे.

Summer Season: उन्हाळी सोयाबीन विकायचा विचारयं..! मग आगोदर दराचे चित्र काय ते पहाच?
| Updated on: May 23, 2022 | 1:56 PM
Share

लातूर :  (Summer Crop) उन्हाळी हंगामात शेतकऱ्यांनी जो (Soybean Crop) सोयाबीनचा प्रयोग केला होता तो यशस्वी होताना दिसत आहे. कारण सोयाबीन काढणी सुरु असून उन्हाळ्यातील वातावरण पोषक असल्याचे उत्पादकतेवरुन दिसून येत आहे. पाण्याची उपलब्धता आणि अवकाळीचे संकट दूर झाल्याने उन्हाळी सोयाबीन चांगलेच बहरले होते. आता काढणी करुन शेतकरी विक्री करण्याच्या तयारीत असेल तर  (Soybean Rate) सोयाबीनचे दर अवगत असणे गरजेचे आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनच्या दरात घसरण होत असून आता सोयाबीन हे 6 हजार 750 असा दर आहे. त्यामुळे उन्हाळी सोयाबीनची साठवणूक की विक्री हा प्रश्न कायम आहे.

उन्हाळी हंगामात सरासरीएवढे उत्पादन

उन्हाळी हंगामातील सोयाबीनची उत्पादकता ही कमी असते असे सांगितले जात होते पण झाले उलटेच. पोषक वातावरणामुळे बिगर हंगामातही उत्पादकता वाढवण्याचा प्रयत्न हा यशस्वी ठरला आहे. संपूर्ण हंगामात पाण्याची उपलब्धता, पोषक वातावरण आणि शेतकऱ्यांचे परिश्रम हे कामी आले आहेत. एकरी 8 ते 9 क्विंटल सोयाबीन उत्पादन मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जो उद्देश ठेऊन हा वेगळा प्रयोग केला होता तो यशस्वी झाला आहे. आता अपेक्षित दर मिळाला तर मोहिम फत्तेच होईल आशा शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आहेत.

सध्या मार्केटमधले चित्र काय?

गेल्या महिन्याभरापासून केवळ सोयाबीनच नाही तर तूर आणि हरभऱ्याच्या दरातही घट होत आहे. एप्रिल महिन्यात सोयाबीनला 7 हजार 100 असा दर होता. मात्र, सोयापेंडची आयात करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेताच दरात घसरण सुरु झाली होती. आता 6 हजार 750 सोयाबीनला दर मिळत आहे. ज्या काळात सोयाबीनचे दर वाढणे हे अपेक्षित होते. तिथे शेतीमालाच्या दरात घसरण सुरु झालेली आहे. तूरीलाही हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी साठवणूकीवर भर दिला आहे तर दुसरीकडे हरभऱ्याचा हमीभाव आणि बाजारभाव यामध्ये 1 हजार रुपयांची तफावत असल्याने खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी वाढत आहे.

शेतकऱ्यांना काय आहे सल्ला?

सध्या सर्वच शेतीमालाचे दर हे घसरत आहेत. सोयाबीन दरात वाढ होईल अशी अपेक्षा होती पण आता 6 हजार 750 दर मिळत आहे. हा सरासरी एवढा दर आहे. मात्र, उन्हाळी हंगामात उत्पादन आणि उत्पादकता पाहता शेतकऱ्यांनी काही काळ थांबून सोयाबीन विक्रीचा विचार करावा असा सल्ला व्यापारी अशोक अग्रवाल यांनी दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अपेक्षित उत्पादन तर घेतले आहे पण मनातला दर सोयाबीनला मिळणार का हे पहावे लागणार आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.