AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…त्यांना विधानसभेची पायरी चढू देणार नाही, लक्ष्मण हाके यांनी कुणाला दिला इशारा

मनोज जरांगे यांनी येणाऱ्या विधान सभा निवडणूकीत 288 उमेदवार उभे करण्याऐवजी पाच उमेदवार उभे करावेत अशी मागणी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केली आहे.

...त्यांना विधानसभेची पायरी चढू देणार नाही, लक्ष्मण हाके यांनी कुणाला दिला इशारा
laxman hake
| Updated on: Oct 02, 2024 | 4:49 PM
Share

जरांगे यांना जर उमेदवार उभे करायचे असतील तर त्यांनी आधी आंदोलनाच्या जागी जालनामध्ये पहीला उमेदवार द्यावा अशी मागणी ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी केली आहे. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला गव्हर्नमेंटने खुपच एन्टरटेन्मेंट केले होते. ओबीसीना जर असे दुर्लक्षित केले तर भाजपाला विधानसभेत नक्कीच त्रास होईल. परंतू हे पुन्हा सत्तेवर बसले तर 2024 नंतर ओबीसी आरक्षण संपलेले असेल असेही लक्ष्मण हाके यांनी म्हटले आहे.

ज्यांना छत्रपतींचे वारसदार आपण मानतो त्या संभाजी राजेंनी फक्त जरांगेंना भेट द्यावी, दीड किमीवरच्या ओबीसी आंदोलकांला भेट दिली नाही. ही का राजेशाही आहे का ? विशालगडावर त्यांनी हातवारे केले. मानसन्मान स्वत:हून दिला जातो. मागून मिळत नाही. जातीयवादी भूमिका त्यांनी घेतली.त्यांना आम्ही राजे का म्हणावे ? ओबीसी आंदोलनाला ज्यांनी ज्यांनी पाठिंबा दिला नाही, केवळ विरोध केला त्या 50 लोकांची यादी तयार आहे, त्यांना विधानसभेची पायरी चढू देणार नाही असाही इशारा लक्ष्मण हाके यांनी यावेळी दिला.

जरांगेंनी पाच उमेदवार उभे करावेत

महाराष्ट्र कोणाची जहागिरी नाही. मक्तेदारी नाही. ओबीसींच्या हक्काच्या लढाई लढत आहे. ओबीसी आरक्षणा बाबत नेते बेकायदेशीरपणे वागत आहेत. त्यामुळेच निवडणूकनंतर हे आरक्षण संपेल ही भीती आहे. राजकारण पेक्षा ओबीसींची स्थिती काय आहे यावर बोलण्यासाठी मी आलोय. राजकीय पक्ष वापर करून घेतात. फायदा करुन घेतात. निवडणूक जिंकण्याचे व्याकरण नेत्याकडे आहे. शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण असे 21 मुख्यमंत्री मराठा समाजाचे होते. जरांगे पाटील हे शरद पवार यांच्या स्क्रीप्टवर काम करतात. जरांगेनी 288 नाही तर निदान 5 उमेदवार तरी उभे करावे अशीही मागणी लक्ष्मण हाके यांनी यावेळी केली

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.