AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुनर्विकसित कामाठी पुराला ‘नामदेव ढसाळ नगर’ नाव देऊ या, सांस्कृतिक कार्य मंत्री अ‍ॅड. आशिष शेलार यांची घोषणा

नामदेव ढसाळ यांनी कामाठी पुरातील वेदना आपल्या शब्दात मांडल्या आहेत त्यामुळे या कामाठी पुराचा ज्यावेळी पुनर्विकास पूर्ण होईल त्यावेळी या नव्या मुंबईला 'महान कवी नामदेव ढसाळ नगर' असे नाव देण्यासाठी सर्वजण प्रयत्न करुयात असे मंत्री आशिष शेलार यांनी म्हटले आहे.

पुनर्विकसित कामाठी पुराला 'नामदेव ढसाळ नगर' नाव देऊ या, सांस्कृतिक कार्य मंत्री अ‍ॅड. आशिष शेलार यांची घोषणा
| Updated on: Apr 11, 2025 | 4:23 PM
Share

ज्या कामाठी पुरातील व्यथा आणि वेदना कवी नामदेव ढसाळ यांनी मांडल्या त्या कामाठी पुराच्या पुनर्विकास प्रस्तावित आहे. ज्यावेळी ही एक नवी मुंबई या भागात उभी राहिल, तेव्हा या भागाला ‘महान कवी नामदेव ढसाळ नगर’ असे यांचे नाव दिले पाहिजे, त्यासाठी आपण सगळ्यांनी पाठपुरावा करू या, अशी कल्पना सांस्कृतिक कार्य मंत्री अ‍ॅड. आशिष शेलार यांनी आज येथे मांडली. कवी नामदेव ढसाळ यांच्या 76 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने भायखळा येथील अण्णा भाऊ साठे नाट्यगृहात “सारे काही समष्टीसाठी” या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या महोत्सवाचे उद्घाटन आज सांस्कृतिक कार्य मंत्री अ‍ॅड. आशिष शेलार आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

ज्यांनी समष्टीचा मुळ विचार मांडला त्या नामदेव ढसाळ यांच्या आणि माझ्या जगण्यात काही साम्यस्थळे आहेत. त्यामुळे मी नामदेव ढसाळ यांना अभिवादन करण्यासाठी आलो आहे असे सांगत सांस्कृतिक कार्य मंत्री अ‍ॅड. आशिष शेलार यांनी गिरणगावातील आपल्या अनेक आठवणींना उजाळा दिला. ते पुढे म्हणाले की,” गिरणगावातील माझ्या बालपणाच्या आठवणींसोबत नामदेव ढसाळ यांची लेखणी जोडलेली आहे.

अंत्योदयाच्या विचाराशीही हे तत्त्व एकरूप

शिक्षणाच्या प्रमाणपत्रांपेक्षा अनुभवाची आणि वेदनेची विद्यापीठे त्यांच्याकडे होती. त्यांचे लेखन म्हणजे ज्वालामुखीतून बाहेर पडणारी अस्सल शक्ती होती. त्यांचे लिखाण हे रेषा, व्याकरण आणि परंपरागत चौकटी मोडणारे होते. ढसाळ यांनी मराठी साहित्यात नवीन प्रमेय मांडले त्यामुळे ढसाळ मराठी साहित्यातील “पायथागोरस” होते. नामदेव ढसाळ यांचे संपूर्ण आयुष्य ही समष्टीची लढाई होती. कुठलीही तडजोड न करता, निर्भयपणे विचार मांडणारे ते व्यक्तिमत्त्व होते. पंडित दिनदयाळ उपाध्याय यांनी मांडलेल्या ‘व्यक्ती ते समष्टी, व्यक्ती ते प्रकृती’ या अंत्योदयाच्या विचाराशीही हे तत्त्व एकरूप आहे.” असेही त्यांनी नमूद केले.

मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.