AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुनर्विकसित कामाठी पुराला ‘नामदेव ढसाळ नगर’ नाव देऊ या, सांस्कृतिक कार्य मंत्री अ‍ॅड. आशिष शेलार यांची घोषणा

नामदेव ढसाळ यांनी कामाठी पुरातील वेदना आपल्या शब्दात मांडल्या आहेत त्यामुळे या कामाठी पुराचा ज्यावेळी पुनर्विकास पूर्ण होईल त्यावेळी या नव्या मुंबईला 'महान कवी नामदेव ढसाळ नगर' असे नाव देण्यासाठी सर्वजण प्रयत्न करुयात असे मंत्री आशिष शेलार यांनी म्हटले आहे.

पुनर्विकसित कामाठी पुराला 'नामदेव ढसाळ नगर' नाव देऊ या, सांस्कृतिक कार्य मंत्री अ‍ॅड. आशिष शेलार यांची घोषणा
| Updated on: Apr 11, 2025 | 4:23 PM
Share

ज्या कामाठी पुरातील व्यथा आणि वेदना कवी नामदेव ढसाळ यांनी मांडल्या त्या कामाठी पुराच्या पुनर्विकास प्रस्तावित आहे. ज्यावेळी ही एक नवी मुंबई या भागात उभी राहिल, तेव्हा या भागाला ‘महान कवी नामदेव ढसाळ नगर’ असे यांचे नाव दिले पाहिजे, त्यासाठी आपण सगळ्यांनी पाठपुरावा करू या, अशी कल्पना सांस्कृतिक कार्य मंत्री अ‍ॅड. आशिष शेलार यांनी आज येथे मांडली. कवी नामदेव ढसाळ यांच्या 76 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने भायखळा येथील अण्णा भाऊ साठे नाट्यगृहात “सारे काही समष्टीसाठी” या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या महोत्सवाचे उद्घाटन आज सांस्कृतिक कार्य मंत्री अ‍ॅड. आशिष शेलार आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

ज्यांनी समष्टीचा मुळ विचार मांडला त्या नामदेव ढसाळ यांच्या आणि माझ्या जगण्यात काही साम्यस्थळे आहेत. त्यामुळे मी नामदेव ढसाळ यांना अभिवादन करण्यासाठी आलो आहे असे सांगत सांस्कृतिक कार्य मंत्री अ‍ॅड. आशिष शेलार यांनी गिरणगावातील आपल्या अनेक आठवणींना उजाळा दिला. ते पुढे म्हणाले की,” गिरणगावातील माझ्या बालपणाच्या आठवणींसोबत नामदेव ढसाळ यांची लेखणी जोडलेली आहे.

अंत्योदयाच्या विचाराशीही हे तत्त्व एकरूप

शिक्षणाच्या प्रमाणपत्रांपेक्षा अनुभवाची आणि वेदनेची विद्यापीठे त्यांच्याकडे होती. त्यांचे लेखन म्हणजे ज्वालामुखीतून बाहेर पडणारी अस्सल शक्ती होती. त्यांचे लिखाण हे रेषा, व्याकरण आणि परंपरागत चौकटी मोडणारे होते. ढसाळ यांनी मराठी साहित्यात नवीन प्रमेय मांडले त्यामुळे ढसाळ मराठी साहित्यातील “पायथागोरस” होते. नामदेव ढसाळ यांचे संपूर्ण आयुष्य ही समष्टीची लढाई होती. कुठलीही तडजोड न करता, निर्भयपणे विचार मांडणारे ते व्यक्तिमत्त्व होते. पंडित दिनदयाळ उपाध्याय यांनी मांडलेल्या ‘व्यक्ती ते समष्टी, व्यक्ती ते प्रकृती’ या अंत्योदयाच्या विचाराशीही हे तत्त्व एकरूप आहे.” असेही त्यांनी नमूद केले.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.