Maharashtra News LIVE : नवनीत राणा यांनी घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट
घरगुती एलपीजी गॅस २९ रुपयांनी महागला असून मुंबई-आग्रा महामार्गावर सीएनजीसाठी लांब रांगा लागल्या आहेत. दुसरीकडे सुनेत्रा पवारांनी केली बारामतीमधील वादळी पावसाच्या नुकसानीची पाहणी, तर राज्यात ६ ते ९ जून दरम्यान 'येलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे.

LIVE NEWS & UPDATES
-
बोगस डॉक्टरामुळे दोन जीवांचा बळी..
मृत बालक गोणीत गोनीत भरून नेल्याचा धक्कादायक प्रकार. महिला उपचाराची कोणतीही डिग्री नसतांना घरीच सुरू केलं मॅटर्निटी होम. कोणतीही डिग्री नसतांना घरीच प्रसूती केल्याचा धक्कादायक प्रकार. घरीच प्रसूती करण्याच्या दरम्यान नवजात बालकासह महिलचा मृत्यू झाल्याची खबजनक घटना. बोगस डॉक्टरामूळे दोन निष्पाप जीवांचा बळी गेल्याने नागरिकांमध्ये संताप. चक्क बोगस मॅटर्निटी होम सुरू असून मालेगाव महापालिका आरोग्य विभागाच्या कामावर प्रश्नचिन्ह. मृताच्या नातेवाईकांकडून संबंधित बोगस डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्याची मागणी..
-
ज्यूस मधून गुंगीचे औषध देऊन तरुणीवर अत्याचार
व्हिडिओ व्हायरल करेन असे ब्लॅकमेल करत तरुणीवर तिघांनी केला अत्याचार, पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून परांडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. धाराशिवच्या परंडा तालुक्यातील धक्कादाय घटना. मोबाईल चार्जिंग लावण्याच्या बहाण्याने तरुणीच्या घरात केला प्रवेश, तरुणी एकटी असल्याचे बघून केला अत्याचार. ज्यूस पिल्यानंतर बेशुद्ध तरुणीवर केला अत्याचार. तरुणी शुद्धीवर आल्यानंतर अश्लील व्हिडिओचे चित्रीकरण दाखवून केले ब्लॅकमेल
-
-
एकीकडे सीएनजीच्या दरात वाढ तर दुसरीकडे सीएनजी भरण्यासाठी वाहनांच्या रांगा
शहरातील अनेक पंपांवर सीएनजी उपलब्ध होत नसल्याने सीएनजी पंपांवर सीएनजी वाहनधारकांच्या रांग. नाशिक मुंबई आग्रा महामार्गावर असलेल्या सीएनजी पंपावर दीड ते दोन किलोमीटर पर्यंत वाहनांची रांग. प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांसह खाजगी वाहने रिक्षा सीएनजीच्या रांगेत
-
भाजप नेत्या नवनीत राणा यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची घेतली भेट
नवनीत राणा यांना सुनेत्रा पवार यांच्या रिक्त होणाऱ्या राज्यसभेच्या जागी संधी मिळणार असल्याची सुरू आहे चर्चा. दरम्यान नवनीत राणा यांना राज्यसभेची खासदारकी हवी असल्यास राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करावा लागणार अशी सूत्रांची माहिती
-
खुल्या पद्धतीने मतदान घ्या- संजय राऊत
नुकताच संजय राऊत यांनी भाजपावर जोरदार टीका केली. त्यांनी म्हटले की, खुल्या पद्धतीने मतदान घ्या. घोडेबाजार झाला हे मान्य करा. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या मुद्द्यावर त्यांनी सरकारवर टीका केली.
-
-
अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघटनेचे चिटणीस अजित आचेरकर यांना DRI कडून अटक
६ जून २०२६ रोजी पहाटे २.३० वाजण्याच्या सुमारास डीआरआयची कारवाई. महसूल गुप्तचर संचालनालयाची (DRI) तस्करीविरोधी मोठी कारवाई. अजित आचेरकर यांच्यासह काही सहकाऱ्यांनाही अटक. कारवाईदरम्यान ५ कोटींपेक्षा अधिक किमतीचे सोने आणि इतर साहित्य जप्त.अजित आचेरकर हे अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघटनेचे चिटणीस म्हणून होते कार्यरत…
-
सीएनजी दरवाढीच्या फटक्यानंतर आता टंचाईचा मनस्ताप; मुंबई-आग्रा महामार्गावर वाहनांच्या रांगा
नाशिक शहरात सीएनजी वाहनधारकांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागत असून, एकीकडे सीएनजीच्या दरात सातत्याने वाढ होत असतानाच, दुसरीकडे इंधन भरण्यासाठी तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे. शहरातील अनेक पेट्रोल पंपांवर सीएनजीचा पुरेसा पुरवठा उपलब्ध होत नसल्याने वाहनधारकांची मोठी कोंडी झाली आहे. विशेषतः नाशिक-मुंबई आग्रा महामार्गावरील सीएनजी पंपांवर तब्बल दीड ते दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या इंधन टंचाईमुळे प्रवासी वाहतूक करणारी वाहने, ऑटोरिक्षा आणि खाजगी चारचाकी गाड्यांचे चालक कमालीचे त्रस्त झाले असून, त्यांचा मौल्यवान वेळ आणि रोजगार सीएनजी मिळवण्यातच वाया जात असल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
-
हंगेवाडी परिसरात जोरदार गारपिटीचा तडाखा; आमदार विक्रम पाचपुते यांच्याकडून फळबागांची पाहणी
अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील हंगेवाडी आणि आसपासच्या परिसरात अचानक झालेल्या जोरदार गारपिटीमुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीत प्रामुख्याने डाळिंब, लिंबू, संत्रा आणि मोसंबी यांसारख्या बहुवार्षिक फळबागांना मोठा फटका बसला असून, शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक आमदार विक्रम पाचपुते यांनी तातडीने नुकसानग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी केली आणि हवालदील झालेल्या शेतकऱ्यांना धीर दिला. प्रशासनाने या भागातील शेती पिकांचे तात्काळ पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी पाचपुते यांनी केली आहे. तसेच या गंभीर परिस्थितीबाबत ते स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन तातडीने आर्थिक मदत मंजूर करण्याची विनंती करणार आहेत. दुसरीकडे, हाता तोंडाशी आलेला घास हिरावल्या गेल्याने सरकारने लवकरात लवकर नुकसान भरपाई जाहीर करावी, अशी आर्त हाक पीडित शेतकऱ्यांनी दिली आहे.
-
देवरीत आज शिवसेना शिंदे गटाचा जाहीर कार्यकर्ता मेळावा; भरत गोगावले, बच्चू कडू राहणार उपस्थित
गोंदिया जिल्ह्यातील देवरी शहरात आज शिवसेना शिंदे गट पक्षाच्या वतीने एका भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापणार आहे. या मेळाव्याला प्रतोद भरत गोगावले, आमदार आशिष जयस्वाल आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू हे राज्यातील दिग्गज नेते प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आणि पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यात हे नेते कार्यकर्त्यांना काय मोलाचे मार्गदर्शन करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या बड्या नेत्यांच्या दौऱ्यामुळे देवरीसह संपूर्ण गोंदिया जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आला असून कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.
-
जागतिक पोहे दिनानिमित्त शेफ विष्णू मनोहर बनवणार ३ हजार किलो नागपुरी तर्री पोहे
जागतिक पोहे दिनाचे औचित्य साधून नागपूरचे प्रसिद्ध आणि जागतिक कीर्तीचे शेफ विष्णू मनोहर पुन्हा एकदा एका अनोख्या विक्रमासाठी सज्ज झाले आहेत. संत्रा नगरीची ओळख असलेल्या नागपुरात ते तब्बल ३ हजार किलो वजनाचे खास ‘नागपुरी तर्री पोहे’ तयार करणार आहेत. यापूर्वी अनेक थक्क करणारे जागतिक रेकॉर्ड्स नावावर असणाऱ्या विष्णू मनोहर यांच्या शिरपेचात या निमित्ताने आणखी एका भव्य विक्रमाची भर पडणार आहे. विशेष म्हणजे, या महासोहळ्याला उपस्थित राहणाऱ्या आणि भेट देणाऱ्या सर्व नागरिकांना या चवदार तर्री पोह्यांचे मोफत वाटप केले जाणार आहे. या अनोख्या उपक्रमामुळे नागपूरकरांना जागतिक पोहे दिनी विश्वविक्रमी चवीचा आस्वाद घेण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.
-
अन्नपदार्थात भेसळ करणाऱ्या 15 दुकानांचे परवाने निलंबित; FDIकडून 6 कोटींहून अधिकचा मुद्देमाल जप्त
नाशिक जिल्ह्यात दूध, पनीर, दुग्धजन्य पदार्थ यांसह इतर खाद्यपदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्या आणि निकृष्ट दर्जाच्या अन्नाची विक्री करणाऱ्यांवर अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई केली आहे. या धडक मोहिमेअंतर्गत प्रशासनाने अन्नपदार्थात भेसळ करणाऱ्या १५ दुकानांचे परवाने थेट निलंबित केले आहेत. १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या आर्थिक वर्षात राबवण्यात आलेल्या या मोहिमेत मानवी आरोग्यास अत्यंत घातक असलेले अन्नपदार्थ आणि बनावट औषधे असा एकूण ६ कोटी ७५ लाख ९० हजार रुपयांचा विक्रमी मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या शेकडो दोषी आस्थापनांवर प्रशासनाने कायदेशीर बडगा उगारला असून, भविष्यातही अशा प्रकारची बनावट व निकृष्ट अन्नपदार्थांची निर्मिती आणि विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
-
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा बारामती दौरा, वादळग्रस्त भागांची केली पाहणी
राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज बारामती शहराच्या धडाकेबाज दौऱ्यावर असून अजित पवार यांच्या कार्यपद्धतीचा वारसा जपत त्यांनी सकाळी ६ वाजल्यापासूनच विविध विकासकामांची आणि नुकसानग्रस्त भागांची पाहणी सुरू केली आहे. बारामतीमध्ये दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर झाडे उमळून पडली असून नागरिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर, सुनेत्रा पवार यांनी स्वतः रस्त्यावर उतरून एसटी स्टँड परिसरासह शहरातील इतर प्रमुख ठिकाणांचा आढावा घेतला. वादळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत स्थानिक नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी त्यांनी उपस्थित प्रशासकीय अधिकाऱ्यांना तात्काळ मदतकार्य राबवण्याच्या आणि स्वच्छता व दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याच्या कडक सूचना दिल्या आहेत.
-
बळजबरीने विवाह करून तरुणीवर अत्याचार; ५ लाखांची खंडणी मागणाऱ्यावर गुन्हा दाखल
नाशिक शहरात नोकरी निमित्त राहणाऱ्या एका तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून, तिच्यावर अत्याचार करत ५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी संशयित आरोपी अविनाश निरभवणे याच्यासह त्याच्या साथीदारांविरुद्ध नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित तरुणीची २०१७ मध्ये एका मैत्रिणीमार्फत अविनाशसोबत ओळख झाली होती. या ओळखीचा गैरफायदा घेत अविनाशने आधी प्रेमाचे नाटक करून तरुणीशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर तिला वेगवेगळी आमिषे दाखवून, तसेच जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर वारंवार अत्याचार केले. एवढ्यावरच न थांबता संशयित आरोपीने पीडितेशी बळजबरीने विवाह केला आणि त्यानंतर तिच्याकडे तब्बल ५ लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. या जाचाला कंटाळून अखेर पीडित तरुणीने पोलिसांत धाव घेत न्याय मागितला असून, नाशिकरोड पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
-
नीट-यूजी परीक्षेसाठी चार नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती; २१ जून रोजी होणार परीक्षा
नाशिक जिल्ह्यात आगामी २१ जून रोजी होणाऱ्या नीट-यूजी (NEET-UG) परीक्षेच्या सुव्यवस्थित आणि पारदर्शक आयोजनासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. या परीक्षेच्या प्रभावी समन्वयनासाठी चार वरिष्ठ नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, यामध्ये अप्पर जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांवर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. जिल्ह्यातील एकूण २१ केंद्रांवर दुपारी २ ते सायंकाळी ५:१५ या वेळेत ही परीक्षा पार पडणार आहे. परीक्षा केंद्रांवरील सर्व प्रशासकीय व्यवस्था चोख ठेवणे आणि परीक्षार्थी उमेदवारांना आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे ही या अधिकाऱ्यांची मुख्य जबाबदारी असेल. संपूर्ण परीक्षा प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी जिल्हा प्रशासनाने या नोडल अधिकाऱ्यांना परीक्षेपूर्वी तसेच परीक्षेच्या दिवशी प्रत्यक्ष केंद्रांना भेटी देऊन सर्व आवश्यक पूर्वतयारी व नियोजनाची पाहणी करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.
-
नागपूर: मान्सूनच्या पार्श्वभूमीवर तहसीलदारांना इन्सिडंट कमांडरचे अधिकार; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय
नागपूर जिल्ह्यात मान्सूनच्या काळात संभाव्य आपत्तींना तोंड देण्यासाठी आणि तात्काळ मदतकार्य सुरू करण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना ‘इन्सिडंट कमांडर’ म्हणून नियुक्त करण्यात आले असून, त्यांना पूर, अतिवृष्टी, वीज पडणे, रस्ते अपघात आणि इमारत दुर्घटना यांसारख्या आपत्कालीन परिस्थितीत थेट आणि तात्काळ निर्णय घेण्याचे विशेष अधिकार देण्यात आले आहेत. आता तहसीलदार पीडब्ल्यूडी, सिंचन, महावितरण, पोलीस आणि आरोग्य यांसारख्या सर्व प्रमुख विभागांना थेट आदेश देऊ शकतील आणि बचावकार्यासाठी आवश्यक मनुष्यबळ व यंत्रसामग्री तात्काळ उपलब्ध करून घेऊ शकतील. जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशांचे पालन सर्व शासकीय, निमशासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांना बंधनकारक असणार असून, तहसीलदारांच्या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्या किंवा कामात विलंब करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या कलम ५१ आणि ५५ अंतर्गत थेट दंडात्मक व कायदेशीर कारवाई केली जाईल.
आज राज्यात आणि देशात वेगवेगळ्या घडामोडी घडत असून, वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांच्या किचनचे बजेट कोलमडले आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडर महागल्यानंतर आता घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरातही तब्बल २९ रुपयांची मोठी वाढ करण्यात आली आहे. इंधनाच्या या दरवाढीचे सावट सर्वत्र पाहायला मिळत आहे. एकीकडे एलपीजी गॅसच्या दरात वाढ झालेली असताना दुसरीकडे सीएनजीच्या दरात वाढ झाली आहे. अनेक पंपांवर सीएनजी उपलब्ध नसल्याने मुंबई-आग्रा महामार्गावर वाहनांच्या चक्क दीड ते दोन किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा लागल्या आहेत. ज्यामुळे रिक्षा, खाजगी आणि प्रवासी वाहतूकदार पुरते हैराण झाले आहेत. तर दुसरीकडे बारामतीमध्ये दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज पाहणी केली. पहाटे ६ वाजल्यापासूनच एसटी स्टँड परिसरासह विविध भागांचा दौरा करत अधिकाऱ्यांना त्वरित कामे करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच गेल्या काही दिवसांपासून जाणवणाऱ्या असह्य उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता असून हवामान विभागाने ६ ते ९ जून दरम्यान जिल्ह्यात ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे, ज्यानुसार विजांच्या कडकडाटासह आणि ताशी ३०-४० किमी वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला असून प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. यासह देश, क्रीडा, मनोरंजन तसेच राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी आणि अपडेट इथं वाचा.