Maharashtra News LIVE : एनडीए मध्ये पक्ष वाढेल पण कमी होणार नाही – मंत्री जयकुमार गोरे

Maharashtra News LIVE : नाशिक शहर आणि परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी भरलं होतं. पण रात्रीपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. तर डोंबिवलीत निवृत्त नौदल अधिकाऱ्याची फसवणूक झाली आहे. एवढंच नाही तर, राजकारणात देखील मोठ्या घडामोडी घडत आहे. म्हणून राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी आणि अपडेट इथं वाचा.

Maharashtra News LIVE : एनडीए मध्ये पक्ष वाढेल पण कमी होणार नाही  - मंत्री जयकुमार गोरे
| Edited By: | Updated on: Jul 28, 2026 | 9:56 AM

LIVE NEWS & UPDATES

  • 28 Jul 2026 09:56 AM (IST)

    बदलापुरात सशस्त्र चोरट्यांकडून घरफोडी

    बदलापुरात सशस्त्र चोरट्यांकडून घरफोडी. हातात कोयता घेतलेले चोरटे सीसीटीव्हीत कैद. खरवईच्या राज तुलसी सिटीमधील घटना

  • 28 Jul 2026 09:48 AM (IST)

    इंजीनिअरिंग सीईटी संदर्भात धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल

    इंजीनिअरिंग सीईटी संदर्भात धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल. विशिष्ट परीक्षा केंद्र उपलब्ध करून, चांगले मार्क मिळवून देण्याचा ऑडिओ क्लिप मध्ये केला जातोय दावा.यापूर्वीही विद्यार्थ्यांना चांगले मार्क मिळवून दिले असल्याचा ऑडिओ क्लिपमध्ये दावा. 13लाखामध्ये चांगले मार्क मिळवून देत, सीओईपी, व्हीजेटीआय सारख्या नामांकित कॉलेजमध्ये, प्रवेश मिळून देणार असल्याचा केला जातोय दावा.


  • 28 Jul 2026 09:40 AM (IST)

    महाराष्ट्राचा नंबर सगळ्यात खाली त्याला देवेंद्र फडणवीस जबाबदार – संजय राऊत

    “आज महाराष्ट्राचा नंबर सगळ्यात खाली त्याला देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत. जंतर-मंतरची आमची मुलं आहेत, त्यांनी मोदींच्या व्हिडिओवर, भाषणावर हास्य-जत्रा सुरु केली. आमचे मुख्यमंत्री बोलतात कोट्यवधी लोकांनी पाहिला. इतक्या मिलियन लोकांनी शिव्या घातल्या ते पण पहा. जंतर-मंतरवरच्या डिजिटल मास्टर मुलांकडून शिकलं पाहिजे. या देशाने खरी डिजिटल इंडिया तिथे पाहिली. भाजपच्या आयटी सेलला टाळं लावावं लागलं” अशी टीका संजय राऊत यांनी केली.

  • 28 Jul 2026 09:32 AM (IST)

    नीटचा पेपर फोडणारे भाजपचेच लोक – संजय राऊत

    शेकडो मुलींचा विनयभंग झाला हा आदेश कोणी दिला? या देशाच्या गृहमंत्र्यांनी संसदेत येऊन निवदेन करावं. बाकी सगळ्या गोष्टींवर निवेदन करतात. पक्ष फडोण्याच्या जबाबदाऱ्या घेतात. जंतर-मंतरवरील लाठीचार्जची जबाबदारी कोणी घ्यावी, या बाबत गृहमंत्र्यांनी निवेदन करावं. पीएम मोदींनी माफी मागावी. पेपरफुटला हे राज्याचे मुख्यमंत्री मान्य करणार नाहीत. पेपरफुटीचे लाभार्थी हे त्यांच्याच पक्षाचे आहेत. नीटचा पेपर फोडणारे भाजपचेच लोक आहेत. मुख्यमंत्र्‍यांनी मान्य करावं पेपर फुटला असं संजय राऊत म्हणाले.

     

  • 28 Jul 2026 09:13 AM (IST)

    एनडीए मध्ये पक्ष वाढेल पण कमी होणार नाही – मंत्री जयकुमार गोरे

    एनडीए म्हणून आम्ही एकसंध आहोत.माझ्या माहितीप्रमाणे एनडीए मध्ये एखादा दुसरा पक्ष वाढतोय पण कमी होण्याची शक्यता नाही. आपलं चॅनेल बातम्या चालवत आहे. आणखी काही अॅडिशन होणार आहे डिलिशन नाही असं मंत्री जयकुमार गोरे म्हणाले. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस उत्तम कामे करतायत. राज्यातील निवडणुकामध्ये मिळालेले यश ही त्यांच्या कामाची पोच पावती आहे असं जयकुमार गोरे म्हणाले.

     


  • 28 Jul 2026 08:56 AM (IST)

    जालना जिल्ह्याला पुढील 4 दिवस पावसाचा येलो अलर्ट जारी; विजेचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

    मुंबईच्या कुलाबा येथील हवामान केंद्राकडून जालना जिल्ह्याला पुढील 4 दिवस पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला असून 31 जुलै पर्यंत जिल्ह्यात विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली,शिवाय ताशी 50 किलोमीटर वेगाने सोसायट्याचा वारा देखील वाहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नागरिकांसह शेतकऱ्यांना खबरदारी घेऊन सतर्क राहण्याचे आवाहन देखील केलंय.दरम्यान पाऊस सुरू असताना मोबाईलचा वापर विद्युत उपकरणांचा वापर टाळावा आणि विजा चमकत असेल तर सुरक्षित स्थळी थांबावं असं आवाहन देखील करण्यात आले.

  • 28 Jul 2026 08:55 AM (IST)

    सासरच्या छळाला कंटाळून 27 वर्षीय विवाहित महिलेची आत्महत्या,अंबड तालुक्यातल्या डोमेगाव येथील घटना

    जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातील डोमेगाव गावात सासरच्या मंडळीकडून होत असलेल्या छळाला कंटाळून एका 27 वर्षीय महिलेने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली, नीता शरद लहामगे असं आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव असून सासरच्या मंडळींनी माहेरून दोन लाख रुपये आणण्याचा दबाव आणि घर कामाच्या कारणावरून सातत्याने मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचे आरोप आहेत. दरम्यान या सगळ्या घटने प्रकरणी मृत महिलेच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाण्यात पती सासू दीर आणि जाऊ अशा 4 जनाविरुद्ध आत्महत्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालाय.

  • 28 Jul 2026 08:53 AM (IST)

    जालना शहरातल्या नवीन मोंढा परिसरात गोदाम फोडून सोयाबीनची चोरी करणारी टोळी जेरबंद

    जालना शहरातल्या नवीन मोंढा परिसरात गोदाम फोडून सोयाबीन चोरी करणाऱ्या टोळीला चंदनझिरा पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडून जवळपास एक लाख 14 हजार रुपये किमतीचा 21 क्विंटल 50 किलो सोयाबीन जप्त करण्यात आलाय शिवाय चोरीचा माल विकत घेणाऱ्या 2 व्यापाऱ्यांना देखील पोलिसांनी यामध्ये आरोपी केलय. दरम्यान पोलिसांनी या तिघांना अटक केला असून त्यांना चार दिवसांची देखील पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, या प्रकरणात अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून या रॅकेटची साखळी नेमकी कुठपर्यंत आहे याचा देखील कसून तपास पोलीस आता करत आहे.

  • 28 Jul 2026 08:52 AM (IST)

    60 वर्षाच्या नराधमाकडून 10 आणि 5 वर्षाच्या दोन सख्या बहिणीवर वारंवार लैगिक अत्याचार

    पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरामध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. एका 60 वर्षाच्या नराधमा कडून 10 आणि 5 वर्षाच्या दोन सख्या बहिणीवर वारंवार लैगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित मुली पैकी एका मुलीच्या पोटात वारंवार दुखू लागल्या नंतर तिच्या कुटुंबियांना ही धक्कादायक घटना कळाली आहे. या प्रकरणात पीडित मुलींच्या कुटुंबीयांनी आणि संतप्त नागरिकांनी नराधमा विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी काल रात्री वाकड पोलीस स्टेशनमध्ये मोठी गर्दी केली होती. त्यानंतर वाकड पोलिसांनी नराधमाला ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्या नुसार गुन्हा दाखल केला आहे.

नाशिक शहर आणि परिसरात काल रात्रीपासून पावसाने विश्रांती घेतली. पावसाचा जोर कमी झाल्याने जिल्ह्यातील धरणांमधील पाण्याचा विसर्गही कमी केला. गंगापूर धरणातून सध्या 4 हजार 947 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दारणा धरणातून 2,600 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पाण्याचा विसर्ग कमी झाल्याने गोदावरी आणि दारणा नदीवरील पूर ओसरला आहे. तर शेळगाव मध्यम प्रकल्पात 58.53 टक्के जलसाठा शिल्लक असून गतवर्षाच्या तुलनेत 37% ने पाणी पातळीत वाढ झाली आहे. जळगाव जिल्ह्यातील शेळगाव मध्यम प्रकल्प यावल चोपडा अनेक भागात सिंचन उपयोगी महत्त्वाचा आहे. तर बँकेचे व्यवहार करताना सावध राहा, सेवानिवृत्त ओळखपत्रच्या आमिषाने डोंबिवलीतील निवृत्त नौदल अधिकाऱ्याची फसवणूक झाली आहे. ओटीपी घेत 5.98 लाखांवर डल्ला मारण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. डोंबिवलीतील नौदलातून सेवानिवृत्त झालेल्या 61 वर्षीय महिलेची ऑनलाईन फसवणूक झाल्याची माहिती समोर येत आहे. तर बोरीवलीचे भाजप आमदार संजय उपाध्याय यांनी पुन्हा एकदा मोठी कारवाई केली आहे. त्यांनी वाईन शॉपजवळ विकल्या जाणाऱ्या बंदी असलेल्या सिगारेट आणि अमली पदार्थांचा पर्दाफाश केला. यासह राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी आणि अपडेट इथं वाचा.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us