MNS : आनंद दिघे असते तर निरूपमच्या कानाखाली लावली असती, एकनाथ शिंदेंनी एवढं तरी करावं, मनसेने डिवचलं

महाराष्ट्रातील रिक्षा-टॅक्सी चालकांना १ मे पासून मराठी भाषा अनिवार्य करण्यात आली आहे. या निर्णयावरून वाद पेटला असून, संजय निरुपम यांनी या सक्तीला विरोध दर्शवला आहे. मनसेने या वादात उडी घेत निरुपमवर टीकेची झोड उठवली आहे, तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मनसेच्या नेत्यांनी शिंदे सरकारला बाळासाहेब आणि आनंद दिघे यांच्या विचारांची आठवण करून देत घेरण्याचा प्रयत्न केला आहे.

MNS : आनंद दिघे असते तर निरूपमच्या कानाखाली लावली असती, एकनाथ शिंदेंनी एवढं तरी करावं, मनसेने डिवचलं
मनसे नेते संदीप देशपांडे
| Updated on: Apr 25, 2026 | 9:50 AM

महाराष्ट्रात राहणारे, काम करणारे रिक्षा आणि टॅक्सी चालक यांना मराठी भाषा अनिवार्य करण्यात आली आहे. त्यांना ग्राहकाशी मराठीत बोलावं लागणार आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हा निर्णय घेतला आहे. येत्या 1 मे पासून या आदेशाची अंमलबजावणी करण्यात येणार असून त्यावरूनच राज्यातलं वातावरण पेटलं आहे. शिंदे गटातूनच या निर्णयाला विरोध होताना दिसत असून संजय निरुपम यांनी या सक्तीविरोधात भूमिका घेतली आहे. मात्र मराठीच्या सक्तीच्या मुद्यावरून आता मनसेनेही उडी घेतली असून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पुन्हा या मुद्यावरून निरूपम यांच्यावर निशाणा साधला आहे, तसेच त्यांनी एकनाथ शिंदे यांनाही घेरलं आहे. एकनाथ शिंदे सांगतात की बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे विचार मानणारे आमचं सरकार आहे, मग भैयाला पाठिशी घालणारं , मराठी लोकांना अटक करणारं, तुमचं कोणत्या विचाराच सरकार आहे ? असा सवाल विचारत त्यांनी शिंदेंना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.

निरूपमला काय प्रॉब्लेम आहे ?

मराठीच्या मुद्यावरून संवाद साधताना संदीप देशपांडे यांनी सजयन निरूपम यांच्यावर कडाडून टीका केली. पोलीस बायस्ड आहेत यात शंका नाही. संजय निरूपम सारख्या भैया लोकांना का पाठिंबा देताहेत, हे आम्हाला कळत नाहीये. एकीकडे एकनाथ शिंदे सांगतात की, आमचं सरकार आहे हे बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे विचार मानणारं आहे. पण तरीही भैयाला पाठीशी घालता आणि मराठी लोकांना अटक करता, मग तुमचं सरकार नक्की कोणत्या विचारांचं आहे ? आम्ही किती प्रेमाने सांगायचं. जोपर्यंत आम्ही प्रेमाने सांगत होतो, तोपर्यंत तुम्ही तुम्ही शिकत नाही, मग आता आम्ही सांगतोय तर शिका . आम्हाला काही उत्तर भारतीय भेटतायत, ते म्हणतायत की आम्ही मराठी शिकायला तयार आहोत, मग संजय निरूपमला काय प्रॉब्लेम आहे ? असा थेट सवाल देशपांडे यांनी विचारला.

आनंद दिघे असते तर निरूपमच्या कानाखाली लावली असती

तुमच्यात हिंमत असेल तर एकदा मुंबई बंद करून दाखवाच. आम्हाला बघायचं आहे की मुंबई बंद करण्याची ताकद भैयामध्ये आहे का? असं थेट आव्हानही देशपांडे यांनी दिलं. ते लोक म्हणताहेत की, आम्हाला मराठी भाषा शिकायची आहे. भाषा शिकतील तर इथे रहा. अटक करायची असेल तर आम्हाला करतात, संजय निरूपमला अटक करत नाहीत असंही देशपांडे यांनी सुनावलं. कायद्याची अंमलबजावणी लवकरात लवकर करावी. आनंद दिघे असते तर त्यांना निरूपमच्या कानाखाली लावली असती, एकनाथ शिंदे आहेत त्यांनी एवढं तरी करावं, असं म्हणत देशपांडे यांनी शिंदेंनाही घेरण्याचा प्रयत्न केला.

 

Follow Us