
नाशिकमधील गिरीश महाजन यांच्या वक्तव्यानंतर सेना-भाजप एकत्र येण्याबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. आम्हाला कोणाच्या कुबड्यांची आवश्यकता नसल्याचं गिरीश महाजन यांनी वक्तव्य केलं होतं. मात्र भाजपात समन्वय नसल्याचा सेनेचा आरोप आहे. भाजप शहराध्यक्ष एकीकडे सत्तेत येण्याचा प्रस्ताव देतात, तर दुसरीकडे महाजन अस स्टेटमेंट देतात. सत्तेत जायचं की विरोधात बसायचं हा निर्णय एकनाथ शिंदे घेतील, असा पलटवार शिवसेना गटनेते अजय बोरस्ते यांनी भाजपवर केला.
जळगावातील छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृहामध्ये अजित पवारांना श्रद्धांजली देण्यासाठी सर्वपक्षीय शोकसभा पार पडली. शोकसभेत अमळनेरच्या पाडळसे इथल्या निम्न तापी प्रकल्पाला ‘दिवंगत अजित पवार निम्न तापी प्रकल्प’ असं नाव देण्याची आमदार अनिल पाटलांनी मागणी केली. आगामी मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा प्रस्ताव मांडण्यात येणार असल्याची पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भाषणात माहिती दिली. या शोकसभेत राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील दिग्गजांनी अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला.
अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड परिसरात भाविकांची गर्दी होण्यास सुरुवात झाली आहे. यावेळी मलंगगडावरील फ्युनिक्युलर ट्रेन सुरू झाल्याने भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. दर तासाला 1200 भाविक या फ्युनिक्युलने प्रवास करत आहेत. 2 ते 3 तासांचा पायी प्रवास आता अवघ्या दहा मिनिटांवर येऊन पोहोचला आहे. अंबरनाथ तालुक्यातील मलंगगडाच्या मुक्तीसाठी आज माघ पौर्णिमेनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें हे मलंगगडावरील मत्स्येंद्रनाथांच्या समाधीवर आरती करणार आहेत.
शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांनी आज मुंबई महानगरपालिका कार्यालयात येण्यास सुरुवात केली आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राजकीय वर्तुळात दुःखाचे वातावरण असून, याचे पडसाद नगरसेवकांच्या भूमिकेतूनही उमटताना दिसत आहेत. “अजित पवार यांच्या निधनामुळे आम्ही कोणत्याही प्रकारचे शक्ती प्रदर्शन करणार नाही, मात्र प्रशासकीय प्रक्रिया आणि काळाची गरज म्हणून आम्ही नाव नोंदणीसाठी जात आहोत,” अशी संयमी प्रतिक्रिया यावेळी नगरसेवकांनी माध्यमांशी बोलताना दिली.
अमेय घोले यांनी यावेळी बोलताना पक्ष नेतृत्वावर पूर्ण विश्वास व्यक्त केला. पक्षाने दिलेली कोणतीही जबाबदारी पार पाडण्यास आपण तयार असल्याचे सांगितले. गेल्या चार वर्षांपासून प्रलंबित असलेली कामे आणि विकासाचा बॅकलॉग भरून काढत नागरिकांना दिलासा देण्याचे काम भविष्यात प्राधान्याने केले जाईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
शिवसेना (शिंदे गट) नेते अमेय घोले यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना महत्त्वपूर्ण विधान केले आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जाण्याने (राजकीय घडामोडींच्या संदर्भात) आमच्यावरही दुःखाचे सावट असल्याचे सांगत, याच वातावरणात आम्हाला नाव नोंदणी करावी लागत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आम्हाला या गोष्टीचे दुःख आहे, मात्र काळाची गरज म्हणून आम्हाला नाव नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे, असे अमेय घोले म्हणाले. साधारण सकाळी ११ वाजता सर्व नगरसेवक तीन बसेसद्वारे कोकण भवनकडे रवाना होणार आहेत.
विद्येचे माहेरघर आणि ‘पूर्वेकडील ऑक्सफर्ड’ अशी जागतिक ओळख असलेल्या पुणे शहराचा कारभार पाहणाऱ्या नगरसेवकांच्या शैक्षणिक पात्रतेची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत निवडून आलेल्या १६५ नगरसेवकांपैकी केवळ ८ टक्के म्हणजेच १४ सदस्यांनी पदव्युत्तर पदवी (Post Graduation) पर्यंत शिक्षण घेतले आहे. तर तब्बल २५ टक्के म्हणजेच ४५ नगरसेवक हे केवळ दहावी किंवा त्यापेक्षा कमी शिकलेले असून, यामध्ये दुसरी ते नववीपर्यंत शिक्षण घेतलेल्यांचाही समावेश आहे. ६१ नगरसेवकांनी पदवीपर्यंत मजल मारली असली, तरी एकूण आकडेवारी पाहता शहराच्या शैक्षणिक वारशाच्या तुलनेत लोकप्रतिनिधींच्या शिक्षणाची आकडेवारी कमी असल्याचे दिसून येत आहे. ३३ सदस्य बारावी उत्तीर्ण आहेत, तर ७ सदस्यांच्या शिक्षणाची कोणतीही माहिती उपलब्ध झालेली नाही.
बीड बस स्थानक परिसरात गुंडगिरी आणि वादाच्या घटना थांबण्याचे नाव घेत नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. काल रात्री बस स्थानक परिसरात एका तृतीयपंथीयाने एका व्यक्तीला अत्यंत अमानुषपणे बेदम मारहाण केली. या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. बीड बस स्थानकावर तृतीयपंथीयांचा सतत वावर असतो आणि यापूर्वीही अनेकदा किरकोळ वादाच्या घटना घडल्या आहेत. मात्र, कालच्या या गंभीर प्रकारामुळे सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी या परिसरात गस्त वाढवून प्रवाशांना सुरक्षा द्यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
सुनेत्रा पवारांसोबत सुनील तटकरे, मंत्री मकरंद पाटील, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर देखील आहेत.. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा सातारा जिल्ह्यात आल्याने सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक देखील याठिकाणी उपस्थित आहेत… थोड्या वेळात स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन करण्यासाठी सगळे नेते निघणार.
अनेक वर्षापासून श्रीमलंगड मुक्तीसाठी शिवसेनेकडून आंदोलन चळवळ सुरू केली असून आज माघ पौर्णिमेनिमित्त शिवसैनिकांकडून मलंग गडावरती आरती केली जाते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील आज येणार असून त्यासाठी जयत तयारी करण्यात आली आहे.
राज्यातील लाखो नागरिक आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी बारामतीत दाखल झाले असताना, या दुःखद प्रसंगाचा गैरफायदा घेत चोरट्यांनी नागरिकांच्या गळ्यातील सोनसाखळ्या लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. २८ जानेवारी रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान दुर्घटनेत दुर्दैवी निधन झाले. त्यांच्यावर बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
सातपूरच्या कामगारनगर परिसरातील प्रकार. सहा महिलांच्या टोळीचा घरफोडीचा डाव. एका घरातून ८ हजार रुपयांची रोकड लंपास. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद. सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. काही संशयित महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले
आज अर्ज भरण्याची अंतिम मुदत असल्याने भाजपा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे घेणार नगरसेवकांची बैठक. भाजपा + AP राष्ट्रवादी युतीच्या सर्व नगरसेवकांची सकाळी ११ वाजता पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत होणार बैठक. महापौर उमेदवार ठरविण्यासाठी नगरसेवकांची मते ऐकून घेतली जाण्याची शक्यता. महापालिका निवडणूकित एकूण 68 जागेपैकी भाजपा + AP राष्ट्रवादीच्या युतीने जिंकल्या आहेत सर्वाधिक 52 जागा.
आज माघ पौर्णिमेनिमित्त कल्याणमधील श्री मलंगगडावर मच्छिंद्रनाथ यात्रेला भाविकांची मोठी गर्दी. सकाळपासूनच गड परिसर भक्तिमय वातावरणात न्हालेला, जयघोषाने परिसर दुमदुमला. यात्रेच्या पार्श्वभूमीवर ठाणे ग्रामीण पोलिसांचा मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख बंदोबस्त आणि सतत निगराणी.
मध्यरात्री उशिरा कालव्याला पडले भगदाड. लाखो लिटर पाणी गेले वाया. वाढे पाटखळ गावातील शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे मोठे नुकसान. कण्हेर डाव्या कालव्याबाबत वासोळे गावाच्या ग्रामस्थांनी प्रशासनाला दिले होते निवेदन
नाशिक येथे दुचाकी चोरट्यांचा सुळसुळाट पाहायला मिळत आहे. शहरातील दुचाकी चोरीचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले आहेत. अवघ्या पाच मिनिटांत दोन दुचाकी चोरी केल्या. शरणपूर रोड येथील राजीव गांधी भवन समोरील इमारतीतील दुचाकी चोरीचा सीसीटीव्ही व्हिडिओ असल्याची माहिती समोर येत आहे.
अमरावतीत भाजपचा महापौर करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडणार असून 3 नावे चर्चेत आहेत. कोअर कमिटीकडे अंतिम मान्यतेसाठी पाठवणार पाठवण्यात आला आहे. यावेळी भाजप पुरुष महापौर देणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. 2 फेब्रुवारी रोजी नामनिर्देशन अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिवस असून 6 फेब्रुवारी रोजी अमरावतीला महापौर मिळणार आहे. अशात मॅजिक फिगर जुडविण्यासाठी राजकीय हालचाली वाढल्या आहेत.
अजित दादांच्या अस्थींचे आज नाशिकच्या रामकुंडावर विसर्जन होणार आहे. मंत्री छगन भुजबळ अजित दादांच्या अस्थी आणणार आहेत. रामकुंडावर पुरोहितांच्या उपस्थितीत अस्थी विसर्जन कार्यक्रम होणार आहे. अजित दादांच्या अस्थी येणार असल्याने प्रशासनाकडून तयारी सुरू झाली आहे. रामकुंड, मालेगाव स्टँड परिसरात वाहतुकीचे पोलिसांकडून नियोजन सुरू झालं आहे. दुपारी 3 च्या दरम्यान अजित दादांच्या अस्थी नाशिकमध्ये येणार आहे.
ईव्हीएममध्ये घोळ असता, तर ओमराजे खासदार झाला असता का? असा सवाल धाराशिवचे ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी उपस्थित केला आहे. मोदी साहेबांसाठी महत्त्वाची निवडणूक लोकसभेची होती, नगरपालिकेची नव्हे. मग घोळ करायचाच असता, तर तो लोकसभेलाच झाला असता, असे खासदार ओमराजे म्हणाले. ईव्हीएममध्ये घोळ नाही, मात्र जागरूक राहणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. मतदानादिवशी 50 मते तपासणे, 7C फॉर्मवरील सिरीयल नंबर नोंदवणे आणि मतमोजणीवेळी तीच मशीन आहे का? याची खात्री या तीन गोष्टी केल्या, तर ईव्हीएममध्ये घोळ शक्य नाही, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला….
द्वारका सर्कलच्या अंडरपासच्या कामाला आजपासून सुरुवात होणार आहे. द्वारका चौकात आजपासून बसेस आणि अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. पुढील तीन महिन्यांसाठी द्वारका अवजड वाहनांसाठी बंद राहणार आहे. 15 फेब्रुवारी नंतर हलक्या वाहनाना देखील बंदी असणार आहे. शहरातील वाहतुकीवर प्रचंड परिणाम होणार आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याची प्रशासनाकडून सूचना देण्यात आली आहे.
बुलढाण्यातील मिर्झा नगरात पुन्हा एकदा बिबट्याचे दर्शन झालं आहे. परिसरातील नागरिकात भीतीचे वातावरण आहे. बिबट्या रहिवासी वस्तीत शिरल्याचे cctv मध्ये कैद झालं आहे. यापूर्वी अनेकदा याच भागत बिबट्या आला होता. बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी गावकऱ्यांकडून करण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेल्यानंतर सुनेत्रा पवारांचा पहिलाच शासकीय दौरा पार पडला. सुनेत्रा पवार आज सातारा दौऱ्यावर 10 वाजता कराड येथे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी स्थळी दर्शन घेणार आहेत. त्यानंतर फलटण तालुक्यातील तरडगाव येथे जात अजित दादाचे सुरक्षारक्षक स्वर्गीय विदीप जाधव यांच्या घरी सांत्वनपर भेट देणार आहेत. तर, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेत येणार असल्याची माहिती समोर येत आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे 3 तर शरद पवार गटाचा 1 नगरसेवक शिंदे सेनेत सहभागी होऊन एकच गट स्थापन करणार आहे. आता शिंदे सेनेच्या गटाची संख्या 29 वरून 33 वर तर महायुतीचं एकत्रित संख्याबळ 122 पर्यंत पोहचणार आहे. अमेय घोले यांची शिवसेनेची गट नेते पदी निवड होणार असल्याची माहिती समोर येत आहे. स्वर्गीय अजितदादा पवार यांचा पवित्र अस्थिकलश आज व उद्या वाशिम जिल्ह्यात दाखल होत आहे. 2 व 3 फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये अस्थिकलश दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.