महाराष्ट्राची वाघिण कुस्तीपटू अश्विनी पौळ प्रकरणात धक्कादायक अपडेट, थेट मुलीचाही..
कुस्तीपटू अश्विनी मनोहर पौळ यांनी घेतलेल्या निर्णयाने खळबळ उडाली. अश्विनी पौळ प्रकरणात मोठी अपडेट येत आहे. शेवटची अपेक्षाही संपली आहे. अश्विनी यांच्या कुटुंबियांकडून गंभीर आरोप करण्यात आलीत.

धाराशिवच्या ऐतिहासिक नळदुर्ग किल्ल्यात हृदयद्रावक घटना घडली. कुस्तीच्या खेळाडू असलेल्या अश्विनी मनोहर पौळ यांनी आपल्या तीन लहान मुलांना घेऊन किल्ल्यातील उपळी बुरुजावरून उडी घेतली. या घटनेने एकच खळबळ उडाली. अश्विनी पौळ आणि त्यांचा साडेपाच वर्षांचा मुलगा अजिंक्य यांचा मृत्यू झाला. अडीच वर्षांच्या दुसऱ्या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. एका मुलीवर धाराशिव येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. अश्विनी पौळ या तीन मुलांसह नळदुर्ग किल्ला पाहण्यासाठी आल्या होत्या. यावेळी त्या केक आणि चॉकलेट घेऊन किल्ल्यावर पोहोचल्या होत्या. किल्ल्याच्या गेटजवळच त्यांनी केक कट केला आणि लेकरांना खाऊ घातला. यासोबतच किल्ल्यावरील कर्मचाऱ्यांना रजिस्टरवर नोंदणी करताना माझा नवरा मागून येत असल्याचे सांगितले.
त्यानंतर पुढे जे घडले, त्याचा साधा विचारही कोणी केला नव्हता. कुस्तीपटू अश्विनी यांच्या मुलीवर धाराशिव येथे उपचार सुरू होते. मात्र, तिची अखेरची झुंज संपली आहे. नळदुर्ग किल्ला कुस्तीपटू जीवन संपवल्याच्या प्रकरणातील चौथा मृत्यू झाला. उपचार सुरू असलेल्या वीराचा मृत्यू झाला. दोन दिवसांपूर्वी कुस्तीपटू अश्विनी पौळ यांनी तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून जीवन संपले होते.
आई, मुलगा आणि एका मुलीचा मृत्यू झाला होता. तर एका मुलीवर धाराशिवच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. धाराशिव जिल्ह्यातील ऐतिहासिक नळदुर्ग किल्ल्यात गुरुवारी घडलेली घटना हृदयद्रावक होती. राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू अश्विनी मनोहर पौळ यांनी आपल्या तीन लहान मुलांसह किल्ल्याच्या उंच बुरुजावरून उडी घेतल्याची धक्कादायक घटना घडली होती.
या दुर्घटनेत अश्विनी पौळ त्यांचा साडेपाच वर्षीय मुलगा अजिंक्य आणि जुळ्या मुलींपैकी क्रांती हिचा मृत्यू झाला, तर दुसरी मुलगी वीरा गंभीर जखमी असून तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र, तिला वाचवण्यात यश मिळाले नाही. पोलिस या प्रकरणात तपास करत आहे. माहेरच्या लोकांकडून गेल्या काही दिवसांपासून अश्विनी यांना त्रास दिला जात होता. पोलिसांनी अश्विनी यांच्या कुटुंबियांवर गुन्हा देखील दाखल केला.