AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रासाठी मान्सूनसंदर्भात आनंदाची बातमी, अनुकूल वातावरणानंतर या तारखेला दाखल होणार नैऋत्य मोसमी वारे

imd mansoon prediction about konkan: अरबी समुद्र खवळलेला असल्यामुळे नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा वेग ही वाढला आहे. आता समुद्राचा रंग देखील बदलला आहे. समुद्र किनारपट्टी भागात वेगवान वारे वाहत आहे. तळकोकणातून महाराष्ट्रात मान्सूनची एन्ट्री होते. त्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे.

महाराष्ट्रासाठी मान्सूनसंदर्भात आनंदाची बातमी, अनुकूल वातावरणानंतर या तारखेला दाखल होणार नैऋत्य मोसमी वारे
mansoon
| Updated on: Jun 01, 2024 | 10:28 AM
Share

राज्यात आणि देशात सध्या तापमान प्रचंड वाढले आहे. त्यामुळे सर्वांना मान्सूनचे वेध लागले आहे. यंदा मान्सूनची वाटचाल चांगली सुरु आहे. अंदमान निकोबारमध्ये वेळेआधी मान्सून दाखल झाला. १८ मे रोजी अंदामान निकोबारमध्ये मान्सून आल्यानंतर त्याची वाटचाल केरळकडे सुरु झाली. केरळमध्ये मान्सून वेळेआधी आला. १ जून ऐवजी ३० मे रोजी मान्सून आला. त्यानंतर महाराष्ट्रतील कोकणात मान्सूनचे वेध लागले. महाराष्ट्रासाठी चांगली बातमी आहे. मान्सून कोकणात वेळेआधीच दाखल होणार आहे. कोणात मान्सून वाऱ्यांसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे.

कधी येणार कोकणात मान्सून

कोकण किनारपट्टीवरती मान्सून सक्रिय होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. येत्या 3 जूनला गोव्यात तर 4 जूनला मान्सून कोकणात येण्याचा अंदाज आहे. दोन जूनपासून नैऋत्य मोसमी वाऱ्यांना गती मिळणार आहे. यंदा मान्सून वेळेआधीच येणार आहे. तसेच सरासरीपेक्षा जास्त कोसळणार आहे. राज्यात सरासरीच्या 106 टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने यापूर्वीच व्यक्त केला आहे.

ही निर्माण झाली लक्षणे

अरबी समुद्र खवळलेला असल्यामुळे नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा वेग ही वाढला आहे. आता समुद्राचा रंग देखील बदलला आहे. समुद्र किनारपट्टी भागात वेगवान वारे वाहत आहे. तळकोकणातून महाराष्ट्रात मान्सूनची एन्ट्री होते. त्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे.

उत्तर भारतात उष्णतेच्या लाटेचा तडाखा

उत्तर भारतात उष्णतेच्या लाटेचा तडाखा सुरु आहे. उष्माघातामुळे शुक्रवारी एका दिवसात 4 राज्यांमध्ये 40 जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशामध्ये सर्वाधिक 17 जणांना उष्मघातामुळे मृत्यू झाला आहे. बिहारमध्ये 14, ओडिशामध्ये 5 आणि झारखंडमध्ये 4 जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशात गेल्या 72 तासांत 182 लोकांचा मृत्यू हा उष्णतेच्या लाटेने झाल्याची माहिती देण्यात आली. अयोध्येत 3 दिवसांत 18 बेवारस मृतदेह अंत्यसंस्कारासाठी आणण्यात आले होते, त्यांच्या मृत्यूचे कारण उष्माघात असल्याचे सांगितले गेले.

शनिवारी देशात कुठेही उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला नाही. पण राजस्थान, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, दिल्ली, ओडिशा आणि महाराष्ट्रात उष्णतेची लाट असेल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात
कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात.
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार.
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....