AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मी जर पवारसाहेबांना सोडलं असतं तर…; जयंत पाटील यांचं ‘टू द पॉईंट’ म्हणणं काय?

Jayant Patil on Sharad Pawar NCP : 'टू द पॉईंट' या चर्चा सत्रात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची मुलाखत सविस्तर मुलाखत पार पडली. दोन भागात ही मुलाखत पार पडली. नुकताच या मुलाखतीचा दुसरा भाग प्रसारित झाला. यात त्यांनी विविध खुलासे केले आहेत.

मी जर पवारसाहेबांना सोडलं असतं तर...; जयंत पाटील यांचं 'टू द पॉईंट' म्हणणं काय?
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Dec 30, 2023 | 5:12 PM
Share

अक्षय मंकणी, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, मुंबई | 30 डिसेंबर 2023 : राष्ट्रवादीकडून एक मुलाखत सत्र प्रसिद्ध होत आहे. ‘टू द पॉईंट’ या मुलाखत सत्रात खासदार अमोल कोल्हे यांनी जयंत पाटील यांच्याशी संवाद साधला. विविध मुद्द्यांवरील त्यांची मतं जाणून घेतली. यातच अजित पवार आणि त्यांच्या समर्थक नेत्यांचं भाजपसोबत जाणं आणि शिंदे सरकारवर सामील होणं याबाबत जयंत पाटील यांनी आपली भूमिका मांडली. शरद पवार राजीनामा देणार असल्याचं माहित होतं का? यावरही जयंत पाटील यांनी भाष्य केलं. राम मंदिराच्या मुद्द्यावरही जयंत पाटील यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली.

“पवारसाहेबांना सोडलं असतं तर…”

राष्ट्रवादी हा पक्ष एकसंध राहावा यासाठी मी प्रयत्न केले. लोकांना वाटलं मीही तिकडे जाईल. पण मी पवारसाहेबांसोबत राहणं निर्णय घेतला. ज्या सहकाऱ्यांनी निर्णय घेतला, त्याला त्यांची-त्यांची काही कारणं आहेत. पण मी पक्षाचा अध्यक्ष आहे मी जर साहेबांना सोडलं असतं तर त्याचा वेगळा इम्पॅक्ट पडला असता. माझ्यावर विश्वास असताना मी त्यांना सोडलं असतं तर ते योग्य झालं नसतं, असं जयंत पाटील म्हणाले.

पवार राजीनामा देणार असल्याचं माहिती होतं का?

लोक माझे सांगाती या पुस्तकाच्या पुनर्प्रकाशनाच्या कार्यक्रमात शरद पवार यांनी आपल्या अध्यक्षपदाचा जारीनामा दिला. हा अनेकांसाठी धक्का होता. याबाबत जयंत पाटील यांना माहिती होतं का? असं विचारलं गेलं. तेव्हा, शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली अनेक वर्षे काम केलं. तेच नेतृत्व राजीनामा देत असेल तर काय.. म्हणून अश्रूंना वाट मिळाली. मी पक्षाच्या अध्यक्ष होतो पण मला कल्पना नव्हती. कुटुंबातील व्यक्तींना माहिती होती की नाही ते माहित नाही. मी साहेबांना यासाठी दोष देणार नाही, असं जयंत पाटील यांनी म्हटलं.

राम मंदिराबाबत भूमिका काय?

आता राम मंदिराचा विषय गाजवला जात आहे. माझ्या मतदारसंघात मी आधीच राम मंदिर बांधलं आहे. गोपीनाथ मुंडेसाहेब आमच्याकडे आले. तेव्हा म्हणाले होते की, आम्ही राम मंदिराच्या बाता करतो तुम्ही प्रत्यक्षात राम मंदिर बांधलं… त्यामुळे आता लोकांना प्रभावित करण्याचा हा प्रयत्न आहे असे मी म्हणेल. लोकांच्या मूलभूत प्रश्न यातून दुर्लक्ष होईल, असं जयंत पाटील यांमी म्हटलंय.

Follow Us
टेकऑफ घेणार इतक्यात... उदय सामंतांच्या हेलिकॉप्टरसोबत नेमकं काय झालं?
मोठी घडामोड! टेकऑफ घेणार इतक्यात... उदय सामंतांच्या हेलिकॉप्टरसोबत नेमकं काय झालं?
महाराष्ट्र आधी राजकारण नंतर! NEETवरून अमित ठाकरेंनी सरकारला थेट सुनवलं
महाराष्ट्र आधी… राजकारण नंतर! NEETवरून अमित ठाकरेंनी सरकारला थेट सुनवलं
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! सातबाऱ्यावर नाव नाही?; सरकारने घेतला निर्णय
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! सातबाऱ्यावर नाव नाही?; सरकारने घेतला मोठा निर्णय, व्हिडिओ बघाच
शिवसेना 5 हजार कोटींना विकली! संजय राऊतांचा खळबळजनक दावा
Sanjay Raut | शिवसेना 5 हजार कोटींना विकली! संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नेमकं काय म्हणाले?
मुंबईच्या 24 वर्षीय बायकरचा दुर्दैवी अंत; नेमकं काय घडलं?
बस्तर सफरीत काळाचा घाला! मुंबईच्या 24 वर्षीय बायकरचा दुर्दैवी अंत; नेमकं काय घडलं?
बनावट सही, बनावट वर्क ऑर्डर अन् कोट्यवधींची फसवणूक! कुंभमेळ्याच्या....
Kumbh Mela | बनावट सही, बनावट वर्क ऑर्डर अन् कोट्यवधींची फसवणूक! कुंभमेळ्याच्या नावाने नेमकं काय घडलं?
झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी!
Zeeshan Siddique | झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी! थेट मुंबई आयुक्तांना फोन; फडणवीसांनाही दिली माहिती
अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार
Abhijit Dipke | अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार; नेमकं प्रकरण काय?
मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
Mumbai | तुकाराम मुंढे यांचा Domino’s ला दणका! मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा
Eknath Shinde | एकनाथ शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा, नेमकं काय ठरलं?