AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मविआचा जागावाटपाचा तिढा अखेर सुटला, कोण किती जागा लढणार?, वाचा संपूर्ण माहिती…

Mahavikas Aghadi Space Allocation : महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा सुटला आहे. कोण किती जागा लढणार? याबाबतची माहिती समोर आली आहे. आज पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडी जागावाटप जाहीर करणार आहे. याबाबतची बातमी, वाचा सविस्तर...

मविआचा जागावाटपाचा तिढा अखेर सुटला, कोण किती जागा लढणार?, वाचा संपूर्ण माहिती...
नाना पटोले, शरद पवार, उद्धव ठाकरेImage Credit source: ANI
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Oct 23, 2024 | 8:08 AM
Share

विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. अशातच दोन्ही आघाड्यांचं जागावाटप अद्याप झालेलं नाही. जागावाटपावरून महाविकास आघाडीत सुरु असलेली रस्सीखेच अखेर आता थांबली आहे. महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा अखेर सुटला आहे. जागावाटपात काँग्रेस मोठा भाऊ ठरला आहे. काँग्रेस सर्वाधिक 105 जागा लढणार आहे. तर शिवसेना उद्धव ठाकरे गट 95 जागांवर आपले उमेदवार देणार आहे. शरद पवार गट 84 जागांवर लढणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. आज महाविकास आघाडीची पत्रकार परिषद होणार आहे. यात जागावाटप जाहीर केलं जाणार आहे.

कोण किती जागा लढणार?

काँग्रेस- 105

ठाकरे गट – 95

शरद पवार- 84

निवडणूक जाहीर होण्याच्याआधीपासूनच महाविकास आघाडीच्या जागावाटपासाठी बैठका होत आहेत. मात्र निवडणूका जाहीर होऊन आठ दिवस झाले तरी महाविकास आघाडीचं जागावाटप झालं नाही. जागावाटपासाठी मॅरथॉन बैठका झाल्या. मात्र जागावाटपाचा तिढा सुटत नव्हता. अखेर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचं जागावाटपाबाबत एकमत झालं आहे.

विदर्भातील जागांवरून वाद

महाविकास आघाडीतील नेते जरी सगळं अलबेल असल्याचं सांगत असले. तर जागावाटपावरून विशेषत: विदर्भातील काही जागांवरून आघाडीत वाद होते. लोकसभेला काही जागा काँग्रेसला दिल्याने आता विधानसभेला ठाकरे गट जास्त जागांवर लढण्याबाबत ठाम होता. मात्र काँग्रेस विदर्भातील जागा ठाकरे गटाला सोडण्यासाठी तयार नव्हता. मात्र आता यावर तोडगा निघाला आहे.

नाना पटोले- संजय राऊतांमध्ये वाद

जागावाटपावर चर्चा करण्यासाठी महाविकास आघाडीत समिती नेमण्यात आली होती. यात काँग्रेसकडून नाना पटोले, ठाकरे गटाकडून संजय राऊत, राष्ट्रवादीकडून जयंत पाटील यांच्यासह अन्य काही नेते या जागावाटप समितीत होते. त्यांनी जागावाटपावर चर्चा केली. मात्र विदर्भातील जागांवरून वाद टोकाला गेले. नाना पटोले जर चर्चेला असतील तर आम्ही चर्चेला उपस्थित राहणार नाही, अशी भूमिका संजय राऊत पर्यायाने उद्धव ठाकरे यांनी घेतली. हा वाद इतका टोकाला गेला की दिल्लीतील काँग्रेस नेत्यांना यामध्ये लक्ष घालावं लागलं. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. दिल्लीतही काँग्रेसच्या बैठका झाल्या. आथा अखेर हा जागावाटपाचा तिढा सुटला आहे.

Follow Us
काँग्रेसमध्ये मोठं बंड? सपकाळ यांच्या हटवणीसाठी दिल्लीत मोर्चेबांधणी
Harshwardhan Sapkal | काँग्रेसमध्ये मोठं बंड? हर्षवर्धन सपकाळ यांच्या हटवणीसाठी थेट दिल्लीत मोर्चेबांधणी
पवनराजे निंबाळकर केसच्या सुनावणीत असं काय घडलं? ओमराजे...
पवनराजे निंबाळकर केसच्या सुनावणीत असं काय घडलं? ओमराजे निंबाळकर स्पष्टच बोलले...
शरद पवारांना मोठा धक्का? राष्ट्रवादीचे 6 नगरसेवक नॉट रिचेबल
Nagpur | शरद पवारांना मोठा धक्का? राष्ट्रवादीचे 6 नगरसेवक नॉट रिचेबल; भाजपच्या गळाला लागल्याची चर्चा!
अशा लोकांमुळे पंढरपूर अशुद्ध झाले... रोहित पवारांच्या आंदोलनानंतर भाजप
अशा लोकांमुळे पंढरपूर अशुद्ध झाले... रोहित पवारांच्या आंदोलनानंतर भाजप नेत्याची जोरदार टीका
रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी गोमूत्र शिंपडलं; सक्षणा सलगर आक्रमक
Sakshana Salgar | रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी गोमूत्र शिंपडलं; सक्षणा सलगर आक्रमक, पंढरपुरात पेटला नवा राजकीय वाद!
मोठी बातमी! राष्ट्रवादीतील रिक्त पदांवर नवीन नियुकत्या; चाकणकरांच्या
मोठी बातमी! राष्ट्रवादीतील रिक्त पदांवर नवीन नियुकत्या; रुपाली चाकणकरांच्या जागी या नावाची चर्चा, राजकारणात मोठं घडणार?
राऊतांचा मोठा दावा; शिवसेनेचे सर्व 9 खासदार ठाकरेंसोबतच!
Sanjay Raut UNCUT | ऑपरेशन टायगरच्या चर्चांदरम्यान राऊतांचा मोठा दावा; शिवसेनेचे सर्व 9 खासदार ठाकरेंसोबतच!
ठाकरेंच्या कार्यक्रमाकडे नजर, शिंदेंची तयारी जोरात; 19 जूनला नेमकं काय
Uddhav Thackeray | Eknath Shinde | ठाकरेंच्या कार्यक्रमाकडे नजर, शिंदेंची तयारी जोरात; 19 जूनला नेमकं काय घडणार?
तर मी पंतप्रधानांना भेटेन, राष्ट्रहितासाठी... संजय राऊतांचं हे विधान
Sanjay Raut | 'तर मी पंतप्रधानांना भेटेन, राष्ट्रहितासाठी... संजय राऊतांचं हे विधान इतकं चर्चात का? राजकारणात मोठी खळबळ
मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा! तलावात फक्त 10% पाणी शिल्लक?
Mumbai Water Shortage | मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा! तलावात फक्त 10% पाणी शिल्लक पुढच्या आठवड्यापासून मोठी पाणीकपात?