AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मराठा आंदोलनाचं षडयंत्र कारखान्यात? राजेश टोपे यांच्या खुलाश्याने मोठी खळबळ

मविआ सरकारमधील आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यावर मराठा आरक्षणावरून विधान परिषदेमध्ये भाजपकडून गंभीर आरोप करण्यात आला. टोपे यांच्या कारखान्यामध्ये हे षडयंत्र रचलं गेल्याचं म्हटलं गेलं. अशातच यावर राजेश टोपे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

मराठा आंदोलनाचं षडयंत्र कारखान्यात? राजेश टोपे यांच्या खुलाश्याने मोठी खळबळ
| Updated on: Feb 27, 2024 | 6:49 PM
Share

मुंबई : मराठा आक्षणाचे प्रमुख मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंंभीर आरोप केले होते. एकेरी उल्लेख करत फडणवीसांना सागर बंगल्यावर येण्यार असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर सरकारनेही कठोर भुमिका घेत जमावबंदीचे आदेश दिले. आज विधीमंडळ्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप नेत्यांनी जरांगे यांच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली. त्यासोबतच जरांगे यांच्या आंदोलनाला शरद पवारांचा पाठिंबा आहे. राजेश टोपे यांच्या कारखान्यामध्ये षडयंत्र रचलं गेल्याचा आरोप प्रविण दरेकर यांनी केला. या सर्व आरोपांवर माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले राजेश टोपे?

गरीब मराठा समाजाचं कल्याण व्हावं याच उद्देशाने हा लढा मनोज जरांगे यांनी सुरू केला आहे. मनोज जरांगे पाटील यांचा पूर्व इतिहास पाहिला तर मागील अनेक वर्षांपासून शिबवा नावाच्या संघटनेसाठी अनेक वर्षे काम करत आहेत. मी जालनाचा पालकमंत्री असताना मनोज जरांगे यांनी 105 दिवसांचं सर्वात मोठं उपोषण केलं होतं. आमच्या हुतात्म पत्कारलेल्या मुलांना दहा लाख आणि नोकऱ्या देण्याचं मान्य केलं होतं, त्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत. पैसे कधी मिळणार याची विचारणा केली होती. यामध्ये काही साखळी तर आमरण उपोषण होतं. त्यावेळी मविआचं सरकार असताना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. अशोक चव्हाण समितीचे अध्यक्ष होते तेव्हा यांची भेट घालून दिली होती. मात्र त्यांनी मुख्यमंत्र्यांशीच बोलणार असल्याचं जरांगे म्हणाले होते. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगल्यावर मनोज जरांगेंना वेळ देत हे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले होते. मला हेच सांगायचं आहे की जरांगे आताच नाहीतर आमचं सरकार असल्यापासून उपोषण करत असल्याचं राजेश टोपे म्हणाले.

माझ्यावरील सर्व आरोप धादांत खोटे- राजेश टोपे

माझ्या भागात एखाद आंदोलन सुरू असेल तर त्या भागातील लोकप्रतिनिधी म्हणून माणुसकीच्या नात्याने मी पाण्याची किंवा नाष्ट्याची सोय केली होती. हे समाजबांधवाप्रती असलेलं प्रेम असतं. यातील महत्त्वाचा भाग असा की कोणत्याही मोर्चा वेळी किंवा आंदोलनावेळी आपण माणुसकी विसरायची नसते हे मला सांगायचं आहे, असं राजेश टोपी यांनी सांगितलं.

दरम्यान, जो काही संशय व्यक्त करण्यात आला आणि जे काही आरोप करण्यात आले हे धादांत खोटे आहेत. माझ्यावरील दगडफेकीचे आरोपही खोटे आहेत. माझ्यावरील आरोपांमध्ये कोणतीही सत्यता नाही. मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी लढत आहेत. जरांगे यांचा कोणत्याही पक्षासोबत काही संबंध नाही, असंही टोपे यांनी स्पष्ट केलं.

भाजप ठाकरेंच्या सेनेसोबत सत्ता स्थापन करणार?
भाजप ठाकरेंच्या सेनेसोबत सत्ता स्थापन करणार?.
हा देश कोण्या एका धर्माचा नाही, जलील यांच्या विधानानंतर शिरसाट आक्रमक
हा देश कोण्या एका धर्माचा नाही, जलील यांच्या विधानानंतर शिरसाट आक्रमक.
पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यावर भगतसिंग कोश्यारींनी व्यक्त केला आनंद
पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यावर भगतसिंग कोश्यारींनी व्यक्त केला आनंद.
ना भगव्यावर प्रेम ना...त्या वादावर काँग्रेसच्या बड्या नेत्याने फटकारले
ना भगव्यावर प्रेम ना...त्या वादावर काँग्रेसच्या बड्या नेत्याने फटकारले.
पोस्टर लागले, तक्रारही दिली, तरीही सापडेना, आता तर कुटुंबीयही बेपत्ता
पोस्टर लागले, तक्रारही दिली, तरीही सापडेना, आता तर कुटुंबीयही बेपत्ता.
हिरव्या रंगाच्या वादात आता संजय राऊतांची उडी
हिरव्या रंगाच्या वादात आता संजय राऊतांची उडी.
मुंब्रा हिरवा करू... वादाला इम्तियाज जलील यांच्याकडून पुन्हा फोडणी
मुंब्रा हिरवा करू... वादाला इम्तियाज जलील यांच्याकडून पुन्हा फोडणी.
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला.
सत्ता, संघर्ष, राजकारणापेक्षा देश महत्वाचा; एकनाथ शिंदे
सत्ता, संघर्ष, राजकारणापेक्षा देश महत्वाचा; एकनाथ शिंदे.
राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन
राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन.