AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मराठा आंदोलनाचं षडयंत्र कारखान्यात? राजेश टोपे यांच्या खुलाश्याने मोठी खळबळ

मविआ सरकारमधील आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यावर मराठा आरक्षणावरून विधान परिषदेमध्ये भाजपकडून गंभीर आरोप करण्यात आला. टोपे यांच्या कारखान्यामध्ये हे षडयंत्र रचलं गेल्याचं म्हटलं गेलं. अशातच यावर राजेश टोपे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

मराठा आंदोलनाचं षडयंत्र कारखान्यात? राजेश टोपे यांच्या खुलाश्याने मोठी खळबळ
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Feb 27, 2024 | 6:49 PM
Share

मुंबई : मराठा आक्षणाचे प्रमुख मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंंभीर आरोप केले होते. एकेरी उल्लेख करत फडणवीसांना सागर बंगल्यावर येण्यार असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर सरकारनेही कठोर भुमिका घेत जमावबंदीचे आदेश दिले. आज विधीमंडळ्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप नेत्यांनी जरांगे यांच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली. त्यासोबतच जरांगे यांच्या आंदोलनाला शरद पवारांचा पाठिंबा आहे. राजेश टोपे यांच्या कारखान्यामध्ये षडयंत्र रचलं गेल्याचा आरोप प्रविण दरेकर यांनी केला. या सर्व आरोपांवर माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले राजेश टोपे?

गरीब मराठा समाजाचं कल्याण व्हावं याच उद्देशाने हा लढा मनोज जरांगे यांनी सुरू केला आहे. मनोज जरांगे पाटील यांचा पूर्व इतिहास पाहिला तर मागील अनेक वर्षांपासून शिबवा नावाच्या संघटनेसाठी अनेक वर्षे काम करत आहेत. मी जालनाचा पालकमंत्री असताना मनोज जरांगे यांनी 105 दिवसांचं सर्वात मोठं उपोषण केलं होतं. आमच्या हुतात्म पत्कारलेल्या मुलांना दहा लाख आणि नोकऱ्या देण्याचं मान्य केलं होतं, त्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत. पैसे कधी मिळणार याची विचारणा केली होती. यामध्ये काही साखळी तर आमरण उपोषण होतं. त्यावेळी मविआचं सरकार असताना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. अशोक चव्हाण समितीचे अध्यक्ष होते तेव्हा यांची भेट घालून दिली होती. मात्र त्यांनी मुख्यमंत्र्यांशीच बोलणार असल्याचं जरांगे म्हणाले होते. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगल्यावर मनोज जरांगेंना वेळ देत हे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले होते. मला हेच सांगायचं आहे की जरांगे आताच नाहीतर आमचं सरकार असल्यापासून उपोषण करत असल्याचं राजेश टोपे म्हणाले.

माझ्यावरील सर्व आरोप धादांत खोटे- राजेश टोपे

माझ्या भागात एखाद आंदोलन सुरू असेल तर त्या भागातील लोकप्रतिनिधी म्हणून माणुसकीच्या नात्याने मी पाण्याची किंवा नाष्ट्याची सोय केली होती. हे समाजबांधवाप्रती असलेलं प्रेम असतं. यातील महत्त्वाचा भाग असा की कोणत्याही मोर्चा वेळी किंवा आंदोलनावेळी आपण माणुसकी विसरायची नसते हे मला सांगायचं आहे, असं राजेश टोपी यांनी सांगितलं.

दरम्यान, जो काही संशय व्यक्त करण्यात आला आणि जे काही आरोप करण्यात आले हे धादांत खोटे आहेत. माझ्यावरील दगडफेकीचे आरोपही खोटे आहेत. माझ्यावरील आरोपांमध्ये कोणतीही सत्यता नाही. मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी लढत आहेत. जरांगे यांचा कोणत्याही पक्षासोबत काही संबंध नाही, असंही टोपे यांनी स्पष्ट केलं.

Follow Us
काँग्रेसमध्ये मोठं बंड? सपकाळ यांच्या हटवणीसाठी दिल्लीत मोर्चेबांधणी
Harshwardhan Sapkal | काँग्रेसमध्ये मोठं बंड? हर्षवर्धन सपकाळ यांच्या हटवणीसाठी थेट दिल्लीत मोर्चेबांधणी
पवनराजे निंबाळकर केसच्या सुनावणीत असं काय घडलं? ओमराजे...
पवनराजे निंबाळकर केसच्या सुनावणीत असं काय घडलं? ओमराजे निंबाळकर स्पष्टच बोलले...
शरद पवारांना मोठा धक्का? राष्ट्रवादीचे 6 नगरसेवक नॉट रिचेबल
Nagpur | शरद पवारांना मोठा धक्का? राष्ट्रवादीचे 6 नगरसेवक नॉट रिचेबल; भाजपच्या गळाला लागल्याची चर्चा!
अशा लोकांमुळे पंढरपूर अशुद्ध झाले... रोहित पवारांच्या आंदोलनानंतर भाजप
अशा लोकांमुळे पंढरपूर अशुद्ध झाले... रोहित पवारांच्या आंदोलनानंतर भाजप नेत्याची जोरदार टीका
रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी गोमूत्र शिंपडलं; सक्षणा सलगर आक्रमक
Sakshana Salgar | रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी गोमूत्र शिंपडलं; सक्षणा सलगर आक्रमक, पंढरपुरात पेटला नवा राजकीय वाद!
मोठी बातमी! राष्ट्रवादीतील रिक्त पदांवर नवीन नियुकत्या; चाकणकरांच्या
मोठी बातमी! राष्ट्रवादीतील रिक्त पदांवर नवीन नियुकत्या; रुपाली चाकणकरांच्या जागी या नावाची चर्चा, राजकारणात मोठं घडणार?
राऊतांचा मोठा दावा; शिवसेनेचे सर्व 9 खासदार ठाकरेंसोबतच!
Sanjay Raut UNCUT | ऑपरेशन टायगरच्या चर्चांदरम्यान राऊतांचा मोठा दावा; शिवसेनेचे सर्व 9 खासदार ठाकरेंसोबतच!
ठाकरेंच्या कार्यक्रमाकडे नजर, शिंदेंची तयारी जोरात; 19 जूनला नेमकं काय
Uddhav Thackeray | Eknath Shinde | ठाकरेंच्या कार्यक्रमाकडे नजर, शिंदेंची तयारी जोरात; 19 जूनला नेमकं काय घडणार?
तर मी पंतप्रधानांना भेटेन, राष्ट्रहितासाठी... संजय राऊतांचं हे विधान
Sanjay Raut | 'तर मी पंतप्रधानांना भेटेन, राष्ट्रहितासाठी... संजय राऊतांचं हे विधान इतकं चर्चात का? राजकारणात मोठी खळबळ
मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा! तलावात फक्त 10% पाणी शिल्लक?
Mumbai Water Shortage | मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा! तलावात फक्त 10% पाणी शिल्लक पुढच्या आठवड्यापासून मोठी पाणीकपात?