Indian Railways : मुंबईत रेल्वे स्टेशनवर लावणार हवेतून पाणी बनवणारं मशीन

| Updated on: Sep 01, 2022 | 8:18 PM

अवघ्या काही दिवसांमध्ये मुंबईतील मध्य रेल्वे स्थानकात हे मेघदूत नावाचे यंत्र बसवले जाणार आहे. तर इतर पाच रेल्वे स्टेशनमध्येही हे यंत्र असणार आहे. या मेघदूत यंत्राच्या माध्यमातून हवेतून पाणी निर्माण होणार आहे. सांद्रीभवन शास्त्राचा वापर करुनच हे यंत्र सभोवतालच्या हवेतून पाणी काढणार आहे. या अत्याधुनिक उपकरणाला एडब्ल्यूजी असेही म्हणतात.

Indian Railways : मुंबईत रेल्वे स्टेशनवर लावणार हवेतून पाणी बनवणारं मशीन
मुंबई रेल्वे स्थानक
Follow us on

मुंबई : (Mumbai Railway) मुंबई रेल्वे स्टेशनवर वाढती प्रवाशांची संख्या आणि त्यांना मुलभूत सोई-सुविधा मिळवून देण्याचा (Railway Administration) रेल्वे प्रशासनाचा प्रयत्न राहिलेला आहे. आता प्रवाशांना मुबलक पाणी मिळावे या हेतूने एक अनोखा फंडा राबवला जाणार आहे. रेल्वे स्थानकावर हवेतून पाणी तयार करणारे यंत्र हे बसवले जाणार आहे. त्यामुळे पाणीटंचाईचे संकट दूर होणार आहे. मुंबईतील 5 रेल्वे स्टेशनवर हे (Machine) यंत्र बसवले जाणार असून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचाही सहभाग असणार आहे. त्यामुळे प्रवाशांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळणार आहे. प्रवाशांची वाढती गर्दी आणि पाण्याची गरज लक्षात घेता हा अनोखा फंडा राबवला जाणार आहे.

म्हणून गरज निर्माण झाली…

मानवी जीवनामध्ये पाण्याचे महत्व हे अनन्यसाधारण आहे. असे असतानादेखील पाण्याचा अपव्यय हा केलाच जोतो. निसर्गाच्या लहरीपणामुळे अनेक मुख्य शहरांना देखील पाणीटंचाईला सामोरे हे जावे लागतेच. त्यापैकी मुंबई एक शहर आहे. मान्सूनच्या काळात अतिवृष्टी आणि सततचा पाऊस असला तरी मुंबईकरासाठी पाणी टंचाई ही नवीन नाही. शिवाय पाणीकपातीलाहा सामोरे जावेच लागते. अशी प्रतिकूल स्थिती असतनाच प्रवाशांना किमान रेल्वे स्टेशनवर तरी पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून एक असे यंत्र बसवले जाणार आहे, जे हवेतून पाणी तयार करेल. त्यामुळे पाणीटंचाईची समस्या तर निर्माण होणार नाहीच पण प्रवाशांची जागोजागी सोय होणार हे निराळेच.

जलनिर्मीत करणाऱ्या यंत्राचे नाव मेघदूत

अवघ्या काही दिवसांमध्ये मुंबईतील मध्य रेल्वे स्थानकात हे मेघदूत नावाचे यंत्र बसवले जाणार आहे. तर इतर पाच रेल्वे स्टेशनमध्येही हे यंत्र असणार आहे. या मेघदूत यंत्राच्या माध्यमातून हवेतून पाणी निर्माण होणार आहे. सांद्रीभवन शास्त्राचा वापर करुनच हे यंत्र सभोवतालच्या हवेतून पाणी काढणार आहे. या अत्याधुनिक उपकरणाला एडब्ल्यूजी असेही म्हणतात. एवढेच नाहीतर या उपकरणाला संयुक्त राष्ट्राने देखील मान्यता दिलेली आहे. मुंबईतील ठाणे आणि दादर येथेही ही उपकरणे बसवली जाणार आहेतच पण कुर्ला, घाटकोपर येथे प्रत्येकी एक तर ठाण्यात 4 उपकरणे बसवली जाणार आहेत.

हे सुद्धा वाचा

असे होणार हवेचे पाण्यात रुपांतर

मेघदूत हे अत्याधुनिक उपकरण हे मैत्री अॅक्वाटेक प्रायव्हेट लिमिटेडने तयार केलेले आहे. हवेतून पाणी घेण्यासाठी हे उपकरण अद्वितीय तंत्रज्ञानाचा खऱ्या अर्थाने वापर करते. जर का तापमान 18 डिग्री सेल्सिअस ते 45 डिग्री सेल्सिअस असे असेल तर यामध्ये हे उपकरण 100 टक्के कार्य करते. तर एका दिवसाला 1 हजार लिटर पाणी तयार करते. त्यामुळे प्रवाशांची तर गैरसोय दूर होणारच आहे पण वेगळेपणही अुभवयास येणार आहे.