AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एका भाकरीने काय होईल, दुसरी भाकरी टाकू; बच्चू कडू यांना नेमकं म्हणायचं काय?

दुसरी भाकर टाकू. एका भाकरीवर ताव मारून काय होणार. दुसरी भाकर तयार आहे, असं सूचक वक्तव्य बच्चू कडू यांनी केलं.

एका भाकरीने काय होईल, दुसरी भाकरी टाकू; बच्चू कडू यांना नेमकं म्हणायचं काय?
Image Credit source: tv9
| Updated on: Jul 04, 2023 | 7:17 PM
Share

गिरीश गायकवाड, प्रतिनिधी, मुंबई : अजित पवार यांनी शिंदे-भाजप सरकारमध्ये प्रवेश केला. यावर बच्चू कडू यांनी मोठं विधान केलंय. बच्चू कडू म्हणाले, माझ्या वीस वर्षांच्या कारकिर्दीत हे पाच वर्षे महत्त्वाचे ठरले. सुरुवातीला उद्धव ठाकरे यांनी उठाव केला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शिवसेना सहभागी होईल, असं स्वप्नातही पाहिलं नव्हतं. शिवसेना फुटून भाजपमध्ये जाईल, हेही आम्ही स्वप्नात पाहीलं नव्हतं. शिंदे गट आणि भाजप यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस येईल, हेही कुणी स्वप्नात पाहीलं नव्हतं. त्यामुळे हे पाच वर्षे उठावाचं वर्ष आहे. याला बंडखोरी म्हणता येणार नाही.

दम असणारे बाहेर येतात

वरिष्ठ नेत्यांविरोधात कनिष्ठ नेत्यांनी केलेला उठाव आहे. नवीन पिक्चर सुरू झाला आहे. उठाव करणे हा काही दोष नाही. ज्याच्यात दम असतो तो बाहेर येतो. यात हिरो आणि विलन कोणी नसतो. हे पिक्चरसारखं असतं, असं लोकांना वाटतं. यात सर्व हिरोच असतात. काही लोकं हरतात आणि काही लोकं जिंकतात.

नाराजी करून फायदा काय?

नाराजी करून फायदा काय. कधी नाराजी करायची आणि कधी नाराजी करायची नाही, हे सर्व आमदारांना माहीत असते. आता नाराजी करून काही फायदा नाही. जसं आहे तसं समजून घ्यायचं आनंदीत राहायचं. लोकांचे काम करायचे, असं बच्चू कडू यांनी म्हंटलं.

शिंदे-भाजप आणि राष्ट्रवादीचा एक गट हे सर्व एकत्र येणं हे आम्हाला पचणे कठीण झाले. लोकांना पचायला वेळ लागेल. रेग्यूलर जेवण असलं तर पचायला सोपं जातं. आता ताटचं बदललं आहे, हे पचायला लोकांना जड जाईल.

आम्ही गुलामीची अवस्था करून ठेवली

बाप मेला तरी बेहत्तर. नेता जिवंत राहिला पाहिजे, असे लोकांची मानसिकता असते. प्रत्येकाला आपआपला नेता, पक्ष प्रीय असतो. बॅनर, मागे मागे राहणं, ही सर्व गुलामीची अवस्था आम्ही राजकीय लोकांनी करून ठेवली, असल्याची खंत बच्चू कडू यांनी व्यक्त केली.

लोकं कायम नेत्याचे गुलाम राहते. कोणी राज ठाकरे, कुणी उद्धव ठाकरे, कुणी एकनाथ शिंदे यांचे, कुणी माझे. आम्ही गुलामी सोडली म्हणून अपक्ष चारवेळी निवडून आलो.

दुसरी भाकरं तयार आहे

या युतीमुळे शिंदे गट अस्वस्थ असल्याचं बोललं जातं. आमच्या वाट्याला अर्धी भाकर येणार होती. आता त्यातील हिस्सा हा अजित पवार गटाने नेला. असं शिंदे गटातील नेत्यांना वाटते. यावर प्रतिक्रिया देताना बच्चू कडू यांनी मोठं सूचक वक्तव्य केलं. दुसरी भाकर टाकू. एका भाकरीवर ताव मारून काय होणार. दुसरी भाकर तयार आहे, असं सूचक वक्तव्य बच्चू कडू यांनी केलं.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.