AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यपाल नियुक्त 12 जागांचं वाटप कसं होणार?; महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला समोर

Maharashtra Governor Appoints 12 Seats : राज्यपाल नियुक्त 12 जागांचा फॉर्म्युला काय आहे? कोण किती जागा लढणार आहे? याची आकडेवारी आता समोर आली आहे. महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला काय? राज्यपाल नियुक्त 12 जागांचं वाटप कसं होणार? वाचा सविस्तर बातमी...

राज्यपाल नियुक्त 12 जागांचं वाटप कसं होणार?; महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला समोर
महायुती
| Updated on: Sep 05, 2024 | 2:39 PM
Share

राज्यपाल नियुक्त 12 जागा मागच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळापासून रिक्त आहे. अशातच आता या 12 जागांवर नियुक्ती केली जाण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. याचा फॉर्म्युला काय असणार आहे? यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निकटवर्तीय, शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी भाष्य केलं आहे. आधी समसमान वाटप होणार होतं. 4- 4- 4 चा फॉर्मुला ठरला होता. मात्र आता भाजपाला 6 शिवसेनेला 3 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 3 असा फॉर्मुला ठरला असल्याची माहिती मिळते आहे, असं चंद्रकांत रघुवंशी म्हणालेत. चंद्रकांत रघुवंशी हे विधान परिषदेवर जाण्यासाठी इच्छुक आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर पूर्ण विश्वास आहे ते मला न्याय देतील, अशी मला अपेक्षा आहे, असं चंद्रकांत रघुवंशी म्हणालेत.

लवकरच 12 जागावर नियुक्तीची शक्यता

कोर्टाकडून सांगण्यात आलेला आहे की राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या विषयांमध्ये ते हस्तक्षेप करू शकत नाही. तो महाराष्ट्र शासनाचा विषय आहे सरकारचा विषय सरकारचा अधिकार आहे. त्यामुळे आता कोणत्याही क्षणी राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या विषय मार्गी लागेल अशी शक्यता बळावली आहे, असं रघुवंशी यांनी सांगितलं.

मुख्यमंत्र्यांची घेतली भेट

मी आज वर्षा बंगल्यावर जात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली आहे. उद्धव ठाकरे यांनीच राज्यपाल नियुक्त 12 आमदारांमध्ये संधी देणार, असं वचन मला दिलं होतं. त्या यादीत माझं नाव टाकलं होतं. पण ज्यावेळी उठाव झाला. त्यावेळी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आलो. त्यामुळे मी त्यांना विनंती केली आहे की, माझा विचार करण्यात यावा. मला संधी देण्यात यावी, असं चंद्रकांत रघुवंशी यांनी म्हटलं आहे.

माझा मतदारसंघ हा राखीव आहे. आदिवासींसाठी राखीव आहे. त्या ठिकाणी मी निवडणूक लढवू शकत नाही. पण त्या ठिकाणच्या ज्या दोन जागा आहेत. त्या निवडून देण्यामध्ये आमचा मोठा हात आहे. हेच कारण आहे की भविष्यातही शिवसेना जर वाढवायची असेल. तर माझा विचार करण्यात यावा असा आवाहन मी दोन्ही नेत्यांना केलं आहे, असं चंद्रकांत रघुवंशी यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना म्हटलं आहे.

मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.