गुवहाटीला जाता जाता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, हाच आमचा अजेंडा…

| Updated on: Nov 26, 2022 | 9:48 AM

आमची श्रद्धा आहे. आम्ही भक्तिभावाने जात आहे. आमदार उत्साहात आहेत. त्यांना दर्शन घेण्याचा उत्साह आहे. राज्यासाठीच आम्ही हे करत आहोत.

गुवहाटीला जाता जाता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, हाच आमचा अजेंडा...
गुवहाटीला जाता जाता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, हाच आमचा अजेंडा...
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या आमदारांसह गुवाहाटीला निघाले आहेत. विशेष विमानाने ते गुवाहाटीला जात आहेत. गुवाहाटीला कामाख्या देवीचं दर्शन घेण्यासाठी आपण जात असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या आमंत्रणावरूनच आम्ही गुवाहाटीला जात आहोत, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. तसेच देवीला राज्याच्या सुखसमृद्धी आणि भरभराटीचं साकडं घालणार असल्याचंही शिंदे यांनी सांगितलं.

आसामच्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला निमंत्रण दिलं होतं. आम्ही गुवाहाटीवरून घाई गडबडीत आलो होतो. त्यामुळे आता आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या निमंत्रणानुसार जात आहे. श्रद्धेने जात आहे. त्यात कुणाला काही वाटण्याची अवश्यकता आहे, असं वाटत नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

आमची श्रद्धा आहे. आम्ही भक्तिभावाने जात आहे. आमदार उत्साहात आहेत. त्यांना दर्शन घेण्याचा उत्साह आहे. राज्यासाठीच आम्ही हे करत आहोत. राज्यातील बळीराजाला सुखी होऊ दे, जनतेच्या जीवनात अमूलाग्र बदल होऊ दे, राज्यावरील अरिष्ट जाऊ दे ही प्रार्थना करणार आहे. ही प्रामाणिक भावना आहे. हाच आमचा अजेंडा आहे. बाकी काही दुसरा आमचा अजेंडा नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

कामाख्या देवीने आमची इच्छा पूर्ण केली. महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील सरकार स्थापन झालं. त्यामुळे देवीकडे आणखी काही मागण्याची गरज नाही. आम्ही भक्तीभावाने जात आहोत, असंही ते म्हणाले.

तसेच काल दलित पँथरचे नेते कोल्हापुरात भेटले. दलित पँथरचे नेते सुखदेव सोनावणे यांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, स्पेशल विमानाने आमदार आणि खासदार गुवाहाटीला जात आहेत. एकूण 180 जण विमानात आहेत. हे सर्व जण आज दुपारी साधारण 12 वाजेपर्यंत गुवाहाटीत उतरतील. त्यानंतर दुपारी ते देवीचं दर्शन घेतील.

एक दिवस ते गुवाहाटीत राहतील. त्यानंतर ते उद्या संध्याकाळी हे आमदार आणि खासदार पुन्हा राज्यात परततील, असं सांगितलं जात आहे.