Eknath Shinde : आपका एक घंटा 13 मिनिट का भाषण मैने सुना, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भेटीत एकनाथ शिंदेंना काय सांगितलं?

| Updated on: Jul 15, 2022 | 5:09 PM

सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्यातर्फे मुख्यमंत्री शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सत्तार यांनी शक्तीप्रदर्शन करत आपल्या समर्थकांना मुंबईत आणले होते.

Eknath Shinde : आपका एक घंटा 13 मिनिट का भाषण मैने सुना, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भेटीत एकनाथ शिंदेंना काय सांगितलं?
अब्दुल सत्तार यांनी केलेल्या सत्कारानंतर बोलताना एकनाथ शिंदे
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : राज्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सांगितले. माझे एक तास 13 मिनिटांचे भाषण त्यांनी ऐकले. तुम्ही मनातून बोललात, असे मोदी म्हणाले. ही फार मोठी माणसे देशाचे नाव जगात पसरवण्याचे काम करत आहेत. त्यांच्याबद्दलही हे रोज बोलत आहेत. प्रत्येकाला वाटले पाहिजे, की हे माझे सरकार आहे, त्यासाठी आम्ही कष्ट करू, असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केले आहे. सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्यातर्फे मुख्यमंत्री शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सत्तार यांनी शक्तीप्रदर्शन करत आपल्या समर्थकांना मुंबईत आणले होते. या कार्यक्रमात शिंदेंनी फटकेबाजी केली. कोणाचेही नाव न घेता संजय राऊत आणि महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. हे सामान्यांचे सरकार आहे, असेही ते यावेळी म्हणाले.

‘लोकांनी स्वीकारली भूमिका’

मी घेतलेली भूमिका ही लोकांनी स्वीकारली आहे. माझ्यासोबत 8 मंत्री आहेत. सत्तेतील लोक बाहेर पडले. एक दोन नाही 50 जण बाहेर पडले. अनेकांनी सांगितले, की आम्ही हे देतो, ते देतो, मी म्हटले की आम्ही काही मिळवायला आलोच नाहीच. भाजपाविषयीही वाईट मत तयार केले. आमदारांचे खच्चीकरण होत आहे. त्यांची भावना पोहोचवण्यासाठी आलो आहे, मुख्यमंत्रीपदासाठी आलेलो नाही. मी चार पाच वेळा सांगितले, की आमदारांची भूमिका समजून घ्या. पण ऐकले नाही, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. शिवसेना, शिवसैनिकांना वाचवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे शिंदे म्हणाले.

‘शिवसैनिकांच्या पदरात काय पडले?’

ग्रामीण भागात शिवसैनिक कसे पक्ष वाढवतायेत, याकडे कुणी लक्ष दिले? मी नगरविकासातून निधी देत होतो, तेही अनेकांना पचले नाही. अडीच वर्षांत शिवसैनिकांच्या पदरात काय पडले. सत्ता असताना चार नंबरला गेला पक्ष. काही शिवसैनिकांना खोट्या केसेसना सामोरे जावे लागले. काही जणांना मोक्का लागला. जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख रडू लागले, असे शिंदे म्हणाले.

हे सुद्धा वाचा

‘खच्चीकरण, अन्याय, खोट्या केसेस होऊ देणार नाही’

भाजपाबाबत गैरसमज होता, सीएमपदाच्या खुर्चीसाठी काहीही करतात, असे सांगू लागले. पंतप्रधान, गृहमंत्री, अध्यक्ष, देवेंद्रजी यांनी सीएमपदाची खुर्ची दिली. त्यांचे आभार मी मानले आहेत. मी एकटा मुख्यमंत्री नाही, तुम्ही 50 जण मुख्यमंत्री आहात. आता प्रत्येक शिवसैनिकाला वाटत आहे, की तो मुख्यमंत्री आहे. तो त्याची गाऱ्हाणी सांगत आहे. तुमच्या हक्काचा माणूस सहाव्या मजल्यावर आहे. खच्चीकरण, अन्याय, खोट्या केसेस होऊ देणार नाही, अशी ग्वाही शिंदेंनी बंडखोर आमदारांना दिली.

काय म्हणाले एकनाथ शिंदे?