Sachin Ahir : ‘हिम्मत कशी होते? यापुढच्या काळात..’ माझगावमध्ये गणेश मिरवणुकीवर अंड फेकण्याच्या घटनेवर सचिन अहिर यांचं रोखठोक भाष्य

Sachin Ahir : माझगावमध्ये काल रात्री गणेश आगमन मिरवणुकीवर अंड फेकण्याची घटना घडली. त्यावर शिवसेना नेते आणि विधान परिषदेते उपसभापती सचिन अहिर यांनी स्पष्ट शब्दात आपली भूमिका मांडली आहे. त्या शिवाय त्यांनी वरळी मतदारसंघाचा दौरा केला.

Sachin Ahir : हिम्मत कशी होते? यापुढच्या काळात.. माझगावमध्ये गणेश मिरवणुकीवर अंड फेकण्याच्या घटनेवर सचिन अहिर यांचं रोखठोक भाष्य
Sachin Ahir
| Updated on: Aug 24, 2026 | 1:54 PM

गिरीश गायकवाड, प्रतिनिधी : माझगावमध्ये काल गणेश आगमन मिरवणुकीदरम्यान एक घटना घडली. माझगाव मोरया गणपती मंडळाची गणेश आगमन मिरवणूक सुरु असताना अंड फेकण्याचा प्रकार झाला. कॉनटिनेन्टल हाईट्स टॉवर या इमारतीमधून हा अंड फेकण्याचा प्रकार झाला. त्यामुळे मंडळाचे कार्यकर्ते खवळले. या घटनेमुळे माझगावमध्ये वातावरण तापलं होतं. मिरवणुकीवर अंड आणि दगड फेकल्याचा आरोप माझगाव मोरया मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केला. यावर एकनाथ शिंदे शिवसेनेचे नेते आणि विधान परिषदेते उपसभापती सचिन अहिर बोलले आहेत. “माझगाव मध्ये करणारा एक व्यक्ती पण समाज बदनाम होतोय, हिम्मत कशी होते? अशा घटना पुढच्या काळात होण्याची शक्यता आहे, सणांना गालबोट लावण्याचा प्रकार होऊ शकतो त्यामुळे कायदा हाती घेऊ नका” असं आवाहन सचिन अहिर यांनी केलं आहे.

हिंदुत्वाचा आक्रमकतेने प्रचार करणारे भाजपे नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी सुद्धा जळजळीत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आपल्या शैलीत अंडी फेकणाऱ्यांना इशारा दिला आहे. पुढे ईद, मोहरम आहे हे लक्षात ठेवा, अशा शब्दात त्यांनी इशारा दिलाय. दरम्यान सचिन अहिर यांनी आज वरळी, महालक्ष्मी धोबीघाट परिसराचा आढावा घेतला. “बरीच विकास कामं प्रलंबित आहेत, जी पूर्ण झालेली नाहीत. या मतदार संघात विकासाला चालना मिळायला हवी. कोळीवाड्याते रस्ते खराब आहेत. वरळीत रस्त्यात खड्डे आहेत ते बुझवण्याचं काम केलं पाहिजे” असं सचिन अहिर यांनी म्हटलय.

हिंदू सणांना प्रोत्साहन देण्याचा आमची भूमिका

“आदित्य ठाकरे कदाचित ज्या रस्त्यांवर खड्डे नाहीत तिथे गेले असतील, मी जिथे खड्डे पडलेत तिथे पाहणी केली आहे” असं सचिन अहिर म्हणाले. “जे मराठी रिक्षाचालकाला मारहाण करतात त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे. समाजात कटूता माजवण्याचं हे काम आहे. संजय राऊत यांना काय म्हणायचंय, मराठी नाही आली तरी चालेल ही भूमिका शिवसेनेनं स्पष्ट करावी. याची जर अंमलबजावणी आम्ही करत असू तर गैर काय ? मुंबईतून कोकणात जाणाऱ्या ८०० जणांना मोफत सेवा आम्ही देतोय, चाकरमानी कोकणात जातोय. हिंदू सणांना प्रोत्साहन देण्याचा आमची भूमिका आहे” असं सचिन अहिर म्हणाले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us