AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पेट्रोल महागले, सीएनजीतही वाढ; आता मुंबईकरांना लवकरच बसणार वीज दरवाढीचा शॉक?

महाराष्ट्र वीज नियामक आयोग (Maharashtra Electricity Regulatory Commission) नवीन नियामक आराखडा आणणार असून, या आराखड्याला मंजुरी मिळाली तर येणाऱ्या काळात मुंबईमध्ये (mumbai) वीज (Electricity) महाग होऊ शकते.

पेट्रोल महागले, सीएनजीतही वाढ; आता मुंबईकरांना लवकरच बसणार वीज दरवाढीचा शॉक?
संग्रहित छायाचित्र
| Edited By: | Updated on: Apr 07, 2022 | 12:24 PM
Share

मुंबई : महाराष्ट्र वीज नियामक आयोग (Maharashtra Electricity Regulatory Commission) नवीन नियामक आराखडा आणणार असून, या आराखड्याला मंजुरी मिळाली तर येणाऱ्या काळात मुंबईमध्ये (mumbai) वीज (Electricity) महाग होऊ शकते. मुंबईकरांना वीज दरवाढीचा शॉक बसू शकतो. बेस्ट, टाटा पॉवर, अदानी आणि एमईडीसीएलसारख्या वीज कंपन्यांचा दैनंदिन खर्च वाढला आहे. दैनंदिन भांडवली खर्चासाठी गुंतवणुकीची गरज असल्याच्या पार्श्वभूमीवर हा नवा आराखडा नियामक आयोगाने तयार केला असल्याची माहिती समोर येत आहे. जर या आराखड्याची अंमलबजावणी झाली तर मुंबईकरांना वीजबिलाच्या रुपात मोठा फटका बसू शकतो. भूमिगत टाकण्यात आलेल्या वीज वाहिन्यांसाठी किंवा नव्याने जोडण्यात येणाऱ्या वीज वाहिन्यांसाठी वीज कंपन्यांना मोठ्याप्रमाणात खर्च येणार आहे. यातील पन्नास टक्के खर्च हा ग्राहकांच्या खिश्यातून वसूल करण्याचा प्रयत्न या नव्या प्रस्तावात आहे.

असा असेल नवा आराखडा

महाराष्ट्र वीज नियामक आयोग वीजबिलाबाबत नवा नियामक आराखडा आणण्याचा तयारीत आहे. या आराखड्याची अंमलबजावनी सुरू झाल्यास मुंबईमध्ये वीजबिल आणखी महाग होणार आहे. सध्या वीज कंपन्यांना जे नुकसान होत आहे, ते नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न या आराखड्यातून करण्यात येणार आहे. भूमिगत टाकण्यात आलेल्या वीज वाहिन्यांच्या दुरुस्तीसाठी तसेच नव्याने देण्यात येणाऱ्या वीजेच्या सुविधेसाठी कंपन्यांचा मोठ्या प्रमाणात खर्च होत आहे. परिणामी कंपन्या तोट्यात जात असून, आता हा तोटा नवीन आराखड्यानुसार ग्राहकांच्या खिश्यातून भरला जाणार आहे. कंपनीचा अर्धा खर्च हा ग्राहकांच्या खिशातून वसूल करण्यासाठी लवकच मुंबईमध्ये वीज दरवाढ होऊ शकते. नव्या आराखड्यावर ग्राहकांच्या सूचना आणि हरकती मागवण्यात आल्या आहेत.

विजेची मागणी वाढली

विजेची वाढती मागणी आणि टंचाईमुळे कोळसा महाग झाल्याने इंधन समाजोयन आकार म्हणून शुल्कवाढ होण्याची शक्यता आहे. याचा मोठा फटका हा बेस्ट आणि टाटाच्या सुमारे 18 लाख ग्राहकांना बसू शकतो. मुंबईत औष्णिकसह 180 मेगावॅट वायू 440 मेगावॅट जलिद्युत्त आणि 350 मेगावॅट वीज हरीत ऊर्जा स्त्रोतांकडून पुरवली जात आहे. या माध्यमातून वीजदरवाढ टाळण्याचा प्रयत्न असल्याचे टाटा पॉवरने म्हटले आहे. मात्र तरी देखील येणाऱ्या काळात वीजदर वाढ होण्याची दाट शक्यता असल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे.

संबंधित बातम्या

धनादेश फसवणुकीला ‘पीएनबी’चा चाप ! ग्राहकांसाठी सुरु केली खास सुविधा

CNG Price Hike : सुटकेचा गुरुवार, पेट्रोल-डिझेलचे भाव स्थिर, सीएनजीचे भाव मात्र 3 रुपयाने वाढले

ऑनलाईन कर्ज देणाऱ्या अ‍ॅपची न्यायालयाकडून गंभीर दखल, अ‍ॅपवर नियंत्रण कधी येणार? ‘आरबीआयला’ सवाल

Follow Us
मोठी बातमी! मुंबईतील सर्व खासगी पाणी टँकर सेवा बंद करण्याचा इशारा
मोठी बातमी! मुंबईतील सर्व खासगी पाणी टँकर सेवा बंद करण्याचा इशारा
काही लोकं तर फक्त ... एकनाथ शिंदेचा उद्धव ठाकरेंना टोला, नाव न घेता...
काही लोकं तर फक्त ... एकनाथ शिंदेचा उद्धव ठाकरेंना टोला, नाव न घेता...
परभणीत चक्रीवादळाचा कहर; घरांचे पत्रे उडाले, संसार उघड्यावर....
Parbhani | परभणीत चक्रीवादळाचा कहर; घरांचे पत्रे उडाले, संसार उघड्यावर, गावकऱ्यांची मदतीसाठी आर्त हाक!
TMC च्या 58 आमदारानंतर आता तब्बल 18 खासदार थेट... बंगालच्या राजकारणात
TMC च्या 58 आमदारानंतर आता तब्बल 18 खासदार थेट... बंगालच्या राजकारणात मोठी खळबळ!
तटकरेंचा तट तोडून आले! भुजबळांची गोगावलेंवर मिश्किल टिप्पणी
Chhagan Bhujbal | तटकरेंचा तट तोडून आले! राज्यसभा अर्जावेळी भुजबळांची गोगावलेंवर मिश्किल टिप्पणी
धक्कादायक! मुलीचा साखरपुडा अवघ्या पाच दिवसांवर असताना आईचं हादरवणारं
धक्कादायक! मुलीचा साखरपुडा अवघ्या पाच दिवसांवर असताना आईचं हादरवणारं कृत्य, थेट स्टेटस  ठेवला अन्... पुढे काय घडलं?
मुंबई हादरली! BEST बसचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, तर 3 जण गंभीर जखमी
मुंबई हादरली! BEST बसचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, तर 3 जण गंभीर जखमी
महाबळेश्वर बस स्थानकात वाहतूक निरीक्षकाची प्रवाशांसह पत्रकारांशी...
महाबळेश्वर बस स्थानकात वाहतूक निरीक्षकाची प्रवाशांसह पत्रकारांशी अरेरावी, थेट अर्वाच्च भाषेत... व्हिडीओ व्हायरल
अचानक बोलवली INDIA आघाडीची महत्त्वाची बैठक, कारण सांगत सुप्रिया सुळे..
अचानक बोलवली INDIA आघाडीची महत्त्वाची बैठक, कारण सांगत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
क्षणात होत्याचं नव्हतं झालं! बोट उलटल्याने दोन जणांचा मृत्यू, तर पाच..
Bhandara | क्षणात होत्याचं नव्हतं झालं! बोट उलटल्याने दोन जणांचा मृत्यू, तर पाच जण....