AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BIG BREAKING | पुढच्या 24 तासात खातेवाटप, वरिष्ठ सूत्रांची ‘टीव्ही 9 मराठी’ला माहिती

महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाची बातमी समोर आली आहे. विधी मंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु होण्याआधी खातेवाटप होणार आहे. कारण वरिष्ठ सूत्रांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. वरिष्ठ सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीच्या नव्या मंत्र्यांसाठी आता लवकरच खातेवाटप केलं जाणार आहे.

BIG BREAKING | पुढच्या 24 तासात खातेवाटप, वरिष्ठ सूत्रांची 'टीव्ही 9 मराठी'ला माहिती
Image Credit source: tv9
| Updated on: Jul 13, 2023 | 5:43 PM
Share

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेवाटप याबाबत सातत्याने उलटसुलट चर्चा सुरु आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या आठ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या सर्व 9 मंत्र्यांचा शपथविधी सोहळा हा रविवारी 2 जुलैला पार पडला. त्यामुळे नव्या मंत्र्यांची शपथ घेऊन आता 12 दिवस उलटले आहेत. पण तरीही नव्या मंत्र्यांचं खातेवाटप झालेलं नाही. त्यांच्या शपथविधीला 12 दिवस उलटल्यानंतरही त्यांना खाती मिळालेली नाहीत. विशेष म्हणजे येत्या 17 जुलै पासून विधी मंडळाचं तीन आठवड्यांचं पावसाळी अधिवेशन सुरु होणार आहे. अशा परिस्थितीत नव्या मंत्र्यांसाठी खातेवाटप होणार की नाही? असा प्रश्न उपस्थित होतोय. पण सूत्रांकडून याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. त्यामुळे खातेवाटपाचा तिढा सूटणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप यासाठी वरिष्ठ स्तरावर गेल्या चार ते पाच दिवसांत मोठ्या घडामोडी घडल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात सलग तीन दिवस रात्री उशिरा बैठका पार पडल्या. या बैठकांमध्ये मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांचा अजित पवार यांना अर्थ खातं देण्यास विरोध होता. त्यामुळे हा तिढा निर्माण झालेला होता.

विशेष म्हणजे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यात तीन-तीन बैठका पार पडल्यानंतरही त्यावर तोडगा निघू शकला नाही. त्यानंतर अजित पवार हे काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीसाठी दिल्लीला गेले. त्यांनी अमित शाह यांची भेट घेतली. यावेळी अजित पवार यांच्यासोबत त्यांच्या पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल हे देखील त्यांच्यासोबत होते. यावेळी अजित पवार आणि अमित शाह यांच्यात एक तास बैठक पार पडली. त्यानंतर रात्री उशिरा राज्यात खातेवाटप आणि मंत्रिमडळ विस्ताराचा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.

खातेवाटप कधी होणार?

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार, खातेवाटप आणि नव्या मंत्र्यांचा शपथविधी आजच पार पडणार असल्याची माहिती समोर आली होती. पण ऐन पावसाळी अधिवेशनात आमदारांची नाराजी ओढावू नये म्हणून मंत्रिमंडळाचा विस्तार पुढे ढकलण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. आता मंत्रिमंडळाचा विस्तार हा पावसाळी अधिवेशनानंतरच होण्याची शक्यता आहे. तसं असलं तरी पावसाळी अधिवेशन सुरु होण्याआधी नव्या मंत्र्यांना खातेवाटप केलं जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढच्या 24 तासात खातेवाटप होणार आहे.

राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना कोणती खाती मिळणार?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या मंत्र्यांना कोणकोणती खाती मिळणार? याबाबतही राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत. सूत्रांकडून याबाबत महत्त्वाची माहिती मिळाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना शिंदे गटाकडील कोणतंही खातं दिलं जाणार नसून फक्त भाजपच्या मंत्र्यांकडे असणारी खाती दिली जातील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

‘ही’ खाती राष्ट्रवादीला जाण्याची शक्यता

  • अर्थ
  • सहकार
  • महसूल
  • ग्रामविकास
  • सार्वजनिक बांधकाम
  • अन्न व औषध प्रशासन
  • कामगार
  • सामाजिक न्याय
  • अल्पसंख्यांक
  • महिला व बालकल्याण

चंद्रपूरमध्ये भाजपची ठाकरेंच्या सेनेला ऑफर? महापौर कोणाचा; चर्चा सुरु
चंद्रपूरमध्ये भाजपची ठाकरेंच्या सेनेला ऑफर? महापौर कोणाचा; चर्चा सुरु.
बारामतीत होणारी पोटनिवडणूक एकतर्फी? संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?
बारामतीत होणारी पोटनिवडणूक एकतर्फी? संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?.
PF Withdrawal Update : खोटं बोलून PF काढताय? लगेच थांबा
PF Withdrawal Update : खोटं बोलून PF काढताय? लगेच थांबा.
नवी मुंबईत मद्यधुंद इनोवा चालकाची वाहनांना धडक | VIDEO
नवी मुंबईत मद्यधुंद इनोवा चालकाची वाहनांना धडक | VIDEO.
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील पनवेल टोल नाक्यावर गोंधळ
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील पनवेल टोल नाक्यावर गोंधळ.
रहेजाच्या ऑफिसची तोडफोड; वंचितचे कार्यकर्ते अटकेत
रहेजाच्या ऑफिसची तोडफोड; वंचितचे कार्यकर्ते अटकेत.
संघाच्या शाखेत राजकारण होत नाही! मोहन भागवतांनी स्पष्टच सांगित
संघाच्या शाखेत राजकारण होत नाही! मोहन भागवतांनी स्पष्टच सांगित.
फडणवीसांकडून मेक इन इंडिया व औद्योगिक विकासावर भर
फडणवीसांकडून मेक इन इंडिया व औद्योगिक विकासावर भर.
भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर जाणार! फडणवीसांनी व्यक्त केला
भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर जाणार! फडणवीसांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाला सलमान खान आला म्हणून काय बिघडलं? संजय शिरसाट यांचा प्रश्न
कार्यक्रमाला सलमान खान आला म्हणून काय बिघडलं? संजय शिरसाट यांचा प्रश्न.