दिलासादायक! राज्यात आज 15,229 नव्या रुग्णांची नोंद, 307 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू

राज्यात आज 15,229 रुग्ण सापडलेत. राज्यातील कोरोना संक्रमणाचं प्रमाण हळूहळू कमी होत असल्याचं चित्र निर्माण झालंय. त्यामुळे येत्या काही दिवसांत महाराष्ट्र पुन्हा अनलॉक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. Maharashtra Corona Virus 3th june 2021

दिलासादायक! राज्यात आज 15,229 नव्या रुग्णांची नोंद, 307 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू
Maharashtra Corona Virus 3th june 2021
| Edited By: | Updated on: Jun 03, 2021 | 8:58 PM

मुंबईः राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातलेलं असून, रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत होती. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ठाकरे सरकारनं केलेल्या प्रयत्नांनाही यश येताना दिसतंय. राज्यात आज 15,229 रुग्ण सापडलेत. राज्यातील कोरोना संक्रमणाचं प्रमाण हळूहळू कमी होत असल्याचं चित्र निर्माण झालंय. त्यामुळे येत्या काही दिवसांत महाराष्ट्र पुन्हा अनलॉक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Maharashtra Corona Virus The Maharashtra Today 3th june 2021 Found 15,229 New Patients)

राज्यात आज 15,229 नवीन रुग्णांचे निदान

राज्यात आज 15,229 नवीन रुग्णांचे निदान झाले असून, राज्यात आज 307 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झालाय. त्यामुळे मृत्यूदर हा 1.68 टक्के एवढा झालाय. राज्यात आज 15,229 नवीन रुग्ण सापडल्यानंतर आज रोजी एकूण 2,04,974 सक्रिय रुग्ण आहेत. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 57,91,413 झालीय.

राज्यात आज 25,617 रुग्ण बरे होऊन घरी गेलेत

राज्यात आज 25,617 रुग्ण बरे होऊन घरी गेलेत, राज्यात आजमितीस एकूण 54,86,206 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेलेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 94.73 % एवढे झाले. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,57,74,626 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 57,91,413 (16.19 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आलेत. सध्या राज्यात 15,66,490 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत, तर 7,055 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

मुंबईतील रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीतही वाढ

कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेली मुंबई कोरोनाच्या विळख्यातून मुक्त होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. तसेच बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढलेय. त्याशिवाय मुंबईतील रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीतही वाढ झाली. त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

संबंधित बातम्या

विद्यार्थ्यांसाठी दोन डोसमधील कालावधी कमी करा, मुंबई मनपाचं केंद्राला पत्र

Ratnagiri Lockdown : रत्नागिरीत 8 दिवस अत्यंत कडक लॉकडाऊन, दूध, किराणाही घरपोच मागवा!

Maharashtra Corona Virus The Maharashtra Today 3th june 2021 Found 15,229 New Patients