AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईसह महाराष्ट्रात तापमानात सातत्याने चढ-उतार, हवामान खात्याचा काय?

सध्या अनेक ठिकाणी रात्री काहीसा गारवा आणि दिवसा उकाडा अशी स्थिती पाहायला मिळत आहे. त्यातच आता पुढील आठवडा वातावरण कसे असेल, याची माहिती समोर आली आहे.

मुंबईसह महाराष्ट्रात तापमानात सातत्याने चढ-उतार, हवामान खात्याचा काय?
| Updated on: Nov 18, 2024 | 4:38 PM
Share

Maharashtra Weather Update : गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रातील वातावरणात सातत्याने बदल होत आहेत. मुंबईसह सपूर्ण महाराष्ट्रातील तापमानात चढ-उतार पाहायला मिळत आहे. सध्या अनेक ठिकाणी रात्री काहीसा गारवा आणि दिवसा उकाडा अशी स्थिती पाहायला मिळत आहे. त्यातच आता पुढील आठवडा वातावरण कसे असेल, याची माहिती समोर आली आहे. या हवामान बदलामुळे आरोग्याच्या तक्रारींमध्येही वाढ आहोत.

मुंबईतील तापमानात सातत्याने चढ-उतार सुरु आहेत. त्यामुळे रात्री काहीसा गारवा आणि दिवसा उकाडा अशी स्थिती पुन्हा निर्माण झाली आहे. यामध्ये कमाल व किमान तापमानात घट अथवा वाढ होत आहे. पुढील दोन तीन दिवस कमाल तापमान ३३ ते ३५ अंश सेल्सिअस दरम्यान पाहायला मिळत आहे. तसेच किमान तापमानही वाढत असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

तापमानाचा पारा ३०-३१ अंश सेल्सिअस

मुंबईत पुढील दोन ते तीन दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. तसेच किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त असल्यामुळे पहाटे काहीसा गारवा जाणवेल. राज्याच्या कमाल तापमानात काही दिवसांनी घट होईल. त्यानंतर कमाल तापमानाचा पारा ३०-३१ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे

हवामान खात्याचा अंदाज

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर महाराष्ट्रात सध्या कमालीची थंडी आहे. नाशिक, निफाड, धुळे या शहरांमध्ये कमाल आणि किमान तापमानात मोठी घट झाली आहे. त्यासोबतच आता संपूर्ण राज्यात थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे. डिसेंबरच्या सुरुवातीला महाराष्ट्रात कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता आहे. यामुळे महाराष्ट्रात तापमानात घट होणार आहे.

हिंदी महासागर, मालदीव आणि विषुववृत्ताजवळ चक्रीवादळाची स्थिती निर्माण होत आहे. त्यासोबतच आग्नेय अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे राज्याच्या किमान आणि कमाल तापमानात झपाट्याने घट होईल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

शेतकऱ्यांना दिलासा

सध्या जळगाव, परभणी, गडचिरोली, गोंदिया, ब्रह्मपुरी, नागपूर, अमरावती येथे किमान तापमान 15 अंशांपेक्षा कमी नोंदवले गेले आहे. याशिवाय उर्वरित राज्यातील किमान तापमानातही घट दिसून येत आहे. सध्या पश्चिम महाराष्ट्रात रात्रीच्या वेळी हलकीशी थंडी आहे. कमाल आणि किमान तापमानात घट झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. आज राज्यात आकाश निरभ्र राहून कमाल तापमानात चढ-उतार होईल आणि किमान तापमानात 2 ते 3 अंशांनी घट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

Follow Us
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही.
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?.
ठाकरेंच्या काळात पाणी दिलं हा आरोप दिशाभूल करणारा
ठाकरेंच्या काळात पाणी दिलं हा आरोप दिशाभूल करणारा.
पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत फडणवीसांचं मोठं विधान
पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत फडणवीसांचं मोठं विधान.
लॉकडाऊन लागणार नाही, अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार - CM फडणवीस
लॉकडाऊन लागणार नाही, अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार - CM फडणवीस.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सभागृहात गोंधळ; ठाकरेंच्या नगरसेवकांना...
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सभागृहात गोंधळ; ठाकरेंच्या नगरसेवकांना....
बुलढाणा चांदी बाजारात मंदी; LPGच्या तुटवड्यामुळे दागिन्यांचे काम ठप्प
बुलढाणा चांदी बाजारात मंदी; LPGच्या तुटवड्यामुळे दागिन्यांचे काम ठप्प.
राजकारण संपल्यानंतर काय करणार? पंकजा मुंडे यांचं मोठं विधान काय?
राजकारण संपल्यानंतर काय करणार? पंकजा मुंडे यांचं मोठं विधान काय?.
सुप्रिया सुळेंच्या त्या वक्तव्यावर काँग्रेसची टीका; फडणवीस यांच्या....
सुप्रिया सुळेंच्या त्या वक्तव्यावर काँग्रेसची टीका; फडणवीस यांच्या.....
पुन्हा लॉकडाऊन?केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींचं ट्विट काय
पुन्हा लॉकडाऊन?केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींचं ट्विट काय.