AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईसह महाराष्ट्रात तापमानात सातत्याने चढ-उतार, हवामान खात्याचा काय?

सध्या अनेक ठिकाणी रात्री काहीसा गारवा आणि दिवसा उकाडा अशी स्थिती पाहायला मिळत आहे. त्यातच आता पुढील आठवडा वातावरण कसे असेल, याची माहिती समोर आली आहे.

मुंबईसह महाराष्ट्रात तापमानात सातत्याने चढ-उतार, हवामान खात्याचा काय?
| Updated on: Nov 18, 2024 | 4:38 PM
Share

Maharashtra Weather Update : गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रातील वातावरणात सातत्याने बदल होत आहेत. मुंबईसह सपूर्ण महाराष्ट्रातील तापमानात चढ-उतार पाहायला मिळत आहे. सध्या अनेक ठिकाणी रात्री काहीसा गारवा आणि दिवसा उकाडा अशी स्थिती पाहायला मिळत आहे. त्यातच आता पुढील आठवडा वातावरण कसे असेल, याची माहिती समोर आली आहे. या हवामान बदलामुळे आरोग्याच्या तक्रारींमध्येही वाढ आहोत.

मुंबईतील तापमानात सातत्याने चढ-उतार सुरु आहेत. त्यामुळे रात्री काहीसा गारवा आणि दिवसा उकाडा अशी स्थिती पुन्हा निर्माण झाली आहे. यामध्ये कमाल व किमान तापमानात घट अथवा वाढ होत आहे. पुढील दोन तीन दिवस कमाल तापमान ३३ ते ३५ अंश सेल्सिअस दरम्यान पाहायला मिळत आहे. तसेच किमान तापमानही वाढत असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

तापमानाचा पारा ३०-३१ अंश सेल्सिअस

मुंबईत पुढील दोन ते तीन दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. तसेच किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त असल्यामुळे पहाटे काहीसा गारवा जाणवेल. राज्याच्या कमाल तापमानात काही दिवसांनी घट होईल. त्यानंतर कमाल तापमानाचा पारा ३०-३१ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे

हवामान खात्याचा अंदाज

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर महाराष्ट्रात सध्या कमालीची थंडी आहे. नाशिक, निफाड, धुळे या शहरांमध्ये कमाल आणि किमान तापमानात मोठी घट झाली आहे. त्यासोबतच आता संपूर्ण राज्यात थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे. डिसेंबरच्या सुरुवातीला महाराष्ट्रात कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता आहे. यामुळे महाराष्ट्रात तापमानात घट होणार आहे.

हिंदी महासागर, मालदीव आणि विषुववृत्ताजवळ चक्रीवादळाची स्थिती निर्माण होत आहे. त्यासोबतच आग्नेय अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे राज्याच्या किमान आणि कमाल तापमानात झपाट्याने घट होईल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

शेतकऱ्यांना दिलासा

सध्या जळगाव, परभणी, गडचिरोली, गोंदिया, ब्रह्मपुरी, नागपूर, अमरावती येथे किमान तापमान 15 अंशांपेक्षा कमी नोंदवले गेले आहे. याशिवाय उर्वरित राज्यातील किमान तापमानातही घट दिसून येत आहे. सध्या पश्चिम महाराष्ट्रात रात्रीच्या वेळी हलकीशी थंडी आहे. कमाल आणि किमान तापमानात घट झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. आज राज्यात आकाश निरभ्र राहून कमाल तापमानात चढ-उतार होईल आणि किमान तापमानात 2 ते 3 अंशांनी घट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपला MIM चा पाठिंबा?
महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपला MIM चा पाठिंबा?.
कोल्हापूरच्या महापौरपदी रुपाराणी निकम यांची निवड
कोल्हापूरच्या महापौरपदी रुपाराणी निकम यांची निवड.
भाजपचंच वर्चस्व... आठ महापालिकेत कोण बनलं महापौर? घ्या जाणून
भाजपचंच वर्चस्व... आठ महापालिकेत कोण बनलं महापौर? घ्या जाणून.
मोदींचा विद्यार्थ्यांना कानमंत्र, कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा?
मोदींचा विद्यार्थ्यांना कानमंत्र, कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा?.
मुंबईच्या राजकारणात उलथापालथ; शरद पवार गटाचा आवाज सत्ताधाऱ्यांमध्ये
मुंबईच्या राजकारणात उलथापालथ; शरद पवार गटाचा आवाज सत्ताधाऱ्यांमध्ये.
महत्वाच्या महामार्गावर 32 तास वाहतूक ठप्प; प्रशासन यंत्रणेवर सवाल
महत्वाच्या महामार्गावर 32 तास वाहतूक ठप्प; प्रशासन यंत्रणेवर सवाल.
सत्ता हातात आली की शिंगं फुटतात; राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
सत्ता हातात आली की शिंगं फुटतात; राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल.
मुंबई हादरली! बाप झाला हैवान, मुकबधीर मुलीवर अत्याचार
मुंबई हादरली! बाप झाला हैवान, मुकबधीर मुलीवर अत्याचार.
सुनेत्रा पवारांचा बॅनरवरून फोटो गायब; रायगडमधील प्रकाराने खळबळ
सुनेत्रा पवारांचा बॅनरवरून फोटो गायब; रायगडमधील प्रकाराने खळबळ.
मी केवळ शब्दाचा पक्का नाही, तर कामाचा माणूस आहे
मी केवळ शब्दाचा पक्का नाही, तर कामाचा माणूस आहे.