AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अशी झाली जीवाची मुंबई, कुणीतरी त्यांच्यासाठी मोठं मन केलं

'जीवाची मुंबई' या कार्यक्रमाच्या माध्यमातून आयोजक महेश पवार यांनी 20 निराधार वयोवृद्धांना मुंबईचं दर्शन घडवलं.

अशी झाली जीवाची मुंबई, कुणीतरी त्यांच्यासाठी मोठं मन केलं
| Updated on: Feb 24, 2023 | 7:57 PM
Share

मुंबई | स्वप्ननगरी, अर्थनगरी अशी असंख्य विशेषणं ही मुंबई शहराच्या ओळखीसाठी कमी पडतील. सिनेमात दाखवलेलं मुंबईचं रुप पाहून आयुष्यात एकदातरी मुंबईत फिरायलं हवं, अशी इच्छा ग्रामीण भागात राहणाऱ्या प्रत्येकाची असते. ज्यांची मुलं आर्थिकरित्या सक्षम आहेत, ते आपल्या आई वडिलांना देव-दर्शनाला नेतात. पण काही असेही असतात ज्यांना त्यांचे जन्मदाते नकोसे होतात. मग ज्या वयोवृद्धांना कुणीच नाही, त्यांच्या आनंदाचा कोण विचार करेल? मात्र महेश पवार या तरुणाने या वृद्धांना आनंद देण्यासाठी ‘जीवाची मुंबई’ या कार्यक्रमाचे आयोजन केलं.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक वयोवृद्धांना मुंबईतील पर्यटनस्थळांचं आणि धार्मिक स्थळाचं दर्शन झालं. ‘जीवाची मुंबई’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून आयोजक महेश पवार यांनी 20 निराधार वयोवृद्धांना मुंबईचं दर्शन घडवलं. या 20 जणांमध्ये कुणी वॉचमनचे काम करतो. कुणी शेतीकाम, भाजीपाला विक्री आणि धुणीभांडी अशी कामं करुन उदरनिर्वाह करतात.

‘जीवाची मुंबई’ या उपक्रमाअंतर्गत या 20 निराधारांनी सिद्धीविनायक, चैत्यभूमी आणि हाजीअली या धार्मिक स्थळांना भेट दिली. तसेच या 20 जणांनी बेस्ट बसच्या निलांबरी या विशेष बस सेवेत संध्याकाळी फिरण्याचा आनंदही घेतला. तसेच सयाजी शिंदे अभिनेते यांनी मोबाईल वर व्हिडिओ कॉल करून या वृद्धांसह संवाद साधला.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

या वृद्धांनी मुंबईतल्या सामाजिक कार्यकर्त्यांचीही भेट घेतली. विशेष बाब म्हणजे या दरम्यान या वृद्धांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनाही भेटता आलं. उपमुख्यमंत्र्यांशी निराधारांनी संवाद साधला तेव्हा. देवेंद्र गणवीर, निर्मला राठोड, शोभा राव, वामन चौधरी, इंदूबाई पोटपिल्लेवर, विष्णू शिंदे आणि इतर निराधारांनी उपमुख्यमंत्र्यांसह सोबत संवाद साधला.

यावेळेस वृद्धांनी निराधार पेन्शन इतर राज्यांच्या तुलनेत राज्यात कमी असल्याचं उपमुख्यमंत्र्यांच्या निदर्शनात आणून दिलं. या निराधार पेन्शनमध्ये वाढ करण्यात यावी, अशी मागणी निराधारांनी केली. या अधिवेशनात याबाबत पेन्शनवाढीबाबत घोषणा करावी अशी फडणवीस साहेबांना विनंतीही केली.

उपक्रमाचा उद्देश काय?

किमान आयुष्याचे शेवटचे दिवस तरी गोड व्हावे, म्हणून खास वयोवृद्धांसाठी ‘जीवाची मुंबई’ हा कार्यक्रम राबवित आहोत. या उपक्रमाचे मुख्य आयोजक हे महेश पवार होते. तर देवेंद्र गणवीर, वर्षा विद्या विलास आणि संतोष गरजे यांचं सहकार्य लाभलं.

Follow Us
लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर
Buldhana | लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर; कच्च्या मालाचे नमुने तपासणीसाठी जप्त
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून मोठी भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार, नवे नियम लागू
कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
Devendra Fadnavis On Shetkari Karjmafi | कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में.....
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणत संजय राऊतांनाही खोचक टोला
भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
Devendra Fadnavis UNCUT | मोदींच्या 12 वर्षांचा महाअहवाल! भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले....
Devendra Fadnavis | भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले मोदी सरकारच्या 12 वर्षांचे रिपोर्ट कार्ड
पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम
Rohit Pawar | रोहित पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले.....
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले, पश्चात्ताप झाला असेल तर या... रोख कुणाकडे?
काँग्रेसच्या झेंड्याखाली या...राऊतांच्या एका वक्तव्याने चर्चांना उधाण
Sanjay Raut UNCUT | काँग्रेसच्या झेंड्याखाली या... संजय राऊतांच्या त्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मुंबईकरांनो सावधान! फक्त महिनाभराचं पाणी उरलं; तलावांमध्ये केवळ....
मुंबईकरांनो सावधान! फक्त महिनाभराचं पाणी उरलं; तलावांमध्ये केवळ एवढे टक्के साठा...