Mira Bhayandar Crime : अवघ्या तासाभरात कुटुंब उद्ध्वस्त , साखरपुड्याला जाण्यावरून भयंकर वाद, पत्नीवर चाकूने हल्ला, मुलगा आडवा आला अन्..

मिरा-भाईंदरमध्ये एका शुल्लक कौटुंबिक वादामुळे हृदयद्रावक घटना घडली. पती-पत्नीमधील भांडणात वडिलांनी पत्नीवर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. आईला वाचवण्यासाठी धावलेल्या मुलालाच पित्याचा चाकू लागला आणि त्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी वडिलांना अटक करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

Mira Bhayandar Crime : अवघ्या तासाभरात कुटुंब उद्ध्वस्त , साखरपुड्याला जाण्यावरून भयंकर वाद, पत्नीवर चाकूने हल्ला, मुलगा आडवा आला अन्..
भयानक घटनेने मुंबई हादरली
| Updated on: Jul 30, 2026 | 10:55 AM

शुल्लक मुद्यावरून पती-पत्नीत झालेल्या वादाला भयानक वळण मिळालं आणि अवघ्या तासाभरात एक संसार उद्ध्वस्त झाला. मिरा-भाईंदरमधील एका कौटुंबिक वादाने भीषण वळण घेतल्याची घटना समोर आली आहे. पत्नीवर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्या वडिलांपासून आईला वाचवण्यासाठी मदतीला धावलेल्या मुलाला त्याचा जीव गमवावा लागला. चाकू लागून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळेपरिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मुलगा गमावल्यामुळे आईच्या आक्रोशाने अख्खा परिसर स्तब्ध झाला, तिच्या अश्रूमुळे सर्वांचं काळीज पिळवटून निघालं. उत्तन सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घटलेल्या या दुर्दैवी घटनाची सध्या सर्वत्र चर्चा असून याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

नेमकं घडलं तरी काय ?

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित पती-पत्नीमध्ये एका शुल्लाक कारणावरून भांडण झालं. कुटुंबातील एका नातेवाईकाच्या (भाच्याच्या) साखरपुड्याला जाण्यावरून त्यांचा वाद झाला होता आणि बघता बघता तो विकोपाला गेला. संतप्त पतीने पुढला मागचा विचार न करता चाकू घेऊन रागाच्या भरात पत्नीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. रागावलेल्या वडीलांची ही कृती पाहून त्यांचा मुलगा आपल्या आीला वाचवण्यासाठी मध्ये पडला. मात्र त्या हल्ल्यादरम्यान, पित्याकडून तो चाकू त्यांच्याच मुलाला लागला आणि तो गंभीर जखमी झाला.

मुलाचा दुर्दैवी मृत्यू

आपण काय कून बसलो हे पाहून पित्याचे अवलान गळाले. मात्र त्यांन जखमी मुलाला तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केलं. पण तोपर्यंत खूपच उशीर झाला होता. कारण डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केलं. या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच उत्तन सागरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपी वडिलांना ताब्यात घेतले. संबंधिति पित्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, भाईंदर पश्चिम विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त (एसीपी) कन्हैया थोरात यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. या दुर्दैवी मृत्यू प्रकरणाचा सर्व बाजूंनी सखोल तपास सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us