AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai : मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा ‘यलो अलर्ट’

गुरुवारी मुंबई आणि लगतच्या भागात तुरळक प्रमाणात पावसाच्या सरी कोसळल्या. हवामान खात्याच्या वेधशाळेमध्ये कुलाबा येथे 18 मिमी पाऊस झाला. तर सांताक्रूझ वेधशाळेमध्ये 11.7 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

Mumbai : मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा ‘यलो अलर्ट’
मुंबईत येत्या 48 तासांत मुसळधार! Image Credit source: twitter
| Updated on: Jun 17, 2022 | 8:36 AM
Share

मुंबई : मुंबईतील (Mumbai) अनेक भागांत गुरुवारी सकाळी पावसाने हजेरी लावली तसेच कुर्ल्यातील (Kurla) काही भागात पाणी साचल्याचं पाहायला मिळालं. काल दिवसभर ठाण्यात (Thane) पावसाने हजेरी लावली. हवामान खात्याने रविवारपासून मुंबई, ठाणे आणि पालघरसाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला असून काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. सध्या मुंबईसह लगतच्या भागात जोरदार पाऊस अद्याप झालेला नाही. राज्यात देखील अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. जर राज्यात अनेक जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यंदा राज्यात मान्सून वेळेच्या आगोदर दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली होती. परंतु हवामान खात्याचा अंदाज चुकला आहे. पण येत्या दोन दिवसात जोरात पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मच्छिमारांना 20 जूनपासून समुद्रात न जाण्याचा सल्ला दिला आहे

पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता

गुरुवारी मुंबई आणि लगतच्या भागात तुरळक प्रमाणात पावसाच्या सरी कोसळल्या. हवामान खात्याच्या वेधशाळेमध्ये कुलाबा येथे 18 मिमी पाऊस झाला. तर सांताक्रूझ वेधशाळेमध्ये 11.7 मिमी पावसाची नोंद झाली आहे. उद्या पासून कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागत पावसाचं प्रमाण वाढणार असल्याचं सुषमा नायर यांनी सांगितलं. हवामान खात्याच्या अंदाजनुसार उद्यापासून मान्सून अनेक भागात सक्रीय होणार आहे. महाराष्ट्रात आत्तापर्यंत झालेल्या पावसात वीज अंगावर कोसळून अनेकांचा मृत्यू झाला आहे.

हवामान खात्याने मच्छिमारांसाठी देखील अलर्ट जारी केला

हवामान खात्याने मच्छिमारांसाठी देखील अलर्ट जारी केला आहे. मच्छिमारांना 20 जूनपासून समुद्रात न जाण्याचा सल्ला दिला आहे. “उत्तर महाराष्ट्राच्या किनारपट्टीसह लगतच्या भागात 40 ते 50 किमी प्रतितास वेगाने वाऱ्याचा वेग 60 किमीपर्यंत जाऊ शकतो. त्यामुळे वादळी हवामान राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामान खात्याने मच्छिमारांना 20 जून समुद्रात न जाण्याच्या सुचना जारी करण्यात आल्या आहेत. वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्यास त्याचा परिणाम अनेक गोष्टीवर होणार आहे.

त्यामुळे पावसाची तीव्रता वाढल्यास सुरक्षित स्थळी थांबण्याचा निर्णय हवामान खात्याने दिला आहे. तसेच वाहतुकीवर देखील पावसासह वाऱ्याचा परिणाम होणार आहे.

Follow Us
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत.
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.