AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai : मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा ‘यलो अलर्ट’

गुरुवारी मुंबई आणि लगतच्या भागात तुरळक प्रमाणात पावसाच्या सरी कोसळल्या. हवामान खात्याच्या वेधशाळेमध्ये कुलाबा येथे 18 मिमी पाऊस झाला. तर सांताक्रूझ वेधशाळेमध्ये 11.7 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

Mumbai : मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा ‘यलो अलर्ट’
मुंबईत येत्या 48 तासांत मुसळधार! Image Credit source: twitter
| Updated on: Jun 17, 2022 | 8:36 AM
Share

मुंबई : मुंबईतील (Mumbai) अनेक भागांत गुरुवारी सकाळी पावसाने हजेरी लावली तसेच कुर्ल्यातील (Kurla) काही भागात पाणी साचल्याचं पाहायला मिळालं. काल दिवसभर ठाण्यात (Thane) पावसाने हजेरी लावली. हवामान खात्याने रविवारपासून मुंबई, ठाणे आणि पालघरसाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला असून काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. सध्या मुंबईसह लगतच्या भागात जोरदार पाऊस अद्याप झालेला नाही. राज्यात देखील अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. जर राज्यात अनेक जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यंदा राज्यात मान्सून वेळेच्या आगोदर दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली होती. परंतु हवामान खात्याचा अंदाज चुकला आहे. पण येत्या दोन दिवसात जोरात पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मच्छिमारांना 20 जूनपासून समुद्रात न जाण्याचा सल्ला दिला आहे

पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता

गुरुवारी मुंबई आणि लगतच्या भागात तुरळक प्रमाणात पावसाच्या सरी कोसळल्या. हवामान खात्याच्या वेधशाळेमध्ये कुलाबा येथे 18 मिमी पाऊस झाला. तर सांताक्रूझ वेधशाळेमध्ये 11.7 मिमी पावसाची नोंद झाली आहे. उद्या पासून कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागत पावसाचं प्रमाण वाढणार असल्याचं सुषमा नायर यांनी सांगितलं. हवामान खात्याच्या अंदाजनुसार उद्यापासून मान्सून अनेक भागात सक्रीय होणार आहे. महाराष्ट्रात आत्तापर्यंत झालेल्या पावसात वीज अंगावर कोसळून अनेकांचा मृत्यू झाला आहे.

हवामान खात्याने मच्छिमारांसाठी देखील अलर्ट जारी केला

हवामान खात्याने मच्छिमारांसाठी देखील अलर्ट जारी केला आहे. मच्छिमारांना 20 जूनपासून समुद्रात न जाण्याचा सल्ला दिला आहे. “उत्तर महाराष्ट्राच्या किनारपट्टीसह लगतच्या भागात 40 ते 50 किमी प्रतितास वेगाने वाऱ्याचा वेग 60 किमीपर्यंत जाऊ शकतो. त्यामुळे वादळी हवामान राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामान खात्याने मच्छिमारांना 20 जून समुद्रात न जाण्याच्या सुचना जारी करण्यात आल्या आहेत. वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्यास त्याचा परिणाम अनेक गोष्टीवर होणार आहे.

त्यामुळे पावसाची तीव्रता वाढल्यास सुरक्षित स्थळी थांबण्याचा निर्णय हवामान खात्याने दिला आहे. तसेच वाहतुकीवर देखील पावसासह वाऱ्याचा परिणाम होणार आहे.

Follow Us
कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडून पेट्रोल विक्रीबाबत मोठा निर्णय
कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडून पेट्रोल विक्रीबाबत मोठा निर्णय.
भोंदू बाबा अशोक खरातला पहिला सर्वात मोठा दणका... अखेर...
भोंदू बाबा अशोक खरातला पहिला सर्वात मोठा दणका... अखेर....
चाकणकर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदावरून जाणार की राहणार?
चाकणकर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदावरून जाणार की राहणार?.
भोंदूबाबा खरात याच्या वडिलांच्या दशक्रिया पत्रिकेत रुपाली चाकणकरचे नाव
भोंदूबाबा खरात याच्या वडिलांच्या दशक्रिया पत्रिकेत रुपाली चाकणकरचे नाव.
राज्यसभेच्या सीटवरून प्रियंका चतुर्वेदी नाराज?, संजय राऊत काय म्हणाले?
राज्यसभेच्या सीटवरून प्रियंका चतुर्वेदी नाराज?, संजय राऊत काय म्हणाले?.
खरातच्या पेन ड्राईव्हमध्ये 3 मंत्री, म्हणून अशोक खरातचा एन्काऊंटर?
खरातच्या पेन ड्राईव्हमध्ये 3 मंत्री, म्हणून अशोक खरातचा एन्काऊंटर?.
दादांच्या घातपाताचा कट? मुडदाही खोदून काढू; मुख्यमंत्र्यांनी घेतला....
दादांच्या घातपाताचा कट? मुडदाही खोदून काढू; मुख्यमंत्र्यांनी घेतला.....
अजित पवार अपघात प्रकरण, कॅप्टनची बदली का झाली?, फडणवीसांनी सांगितलं...
अजित पवार अपघात प्रकरण, कॅप्टनची बदली का झाली?, फडणवीसांनी सांगितलं....
मुख्यमंत्री फडणवीस यांचे अशोक खरातबाबत कठोर वक्तव्य
मुख्यमंत्री फडणवीस यांचे अशोक खरातबाबत कठोर वक्तव्य.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं निवडणूक आयोगाला पत्र
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं निवडणूक आयोगाला पत्र.