AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईकरांसाठी चांगली बातमी, कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रोचा आणखी एक टप्पा सुरु होणार

Mumbai Metro: सुरक्षा प्रमाणपत्र मिळताच टप्पा 2 अ च्या संचलनाचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यामुळे आता काही दिवसातच मुंबईकरांना आरे-आचार्य अत्रे चौक, वरळी असा थेट भुयारी मेट्रो प्रवास करता येणार आहे. हा मेट्रो टप्पा सुरु झाला तर दादर आणि वरळीच्या दिशेने येणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

मुंबईकरांसाठी चांगली बातमी, कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रोचा आणखी एक टप्पा सुरु होणार
Mumbai Metro
| Updated on: Apr 15, 2025 | 2:10 PM
Share

Mumbai Metro: मुंबई मेट्रोची एक्वा लाइन म्हणजे कुलाबा-वांद्रे-सीप्झ मार्गासंदर्भात चांगली बातमी आली आहे. दादर आणि वरळीच्या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना गारेगार प्रवास करता येणार आहे. कुलाबा- वांद्रे- सीप्झ मेट्रो 3 मार्गिकेतील बीकेसी-आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानक दरम्यानचा 2 अ टप्पा वाहतूक सेवेत लवकरच दाखल होणार आहे. हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाल्यास आरे, मरोळ नाका, सांताक्रुझ, बीकेसी येथून थेट वरळीला, आचार्य अत्रे चौकापर्यंत पोहचणे सोपे होणार आहे. या टप्याच्या निरीक्षणासाठी अखेर मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षा (सीएमआरएस) यांचे पथक मुंबईत दाखल झाले आहे. या पथकाकडून बीकेसी-आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानकांदरम्यानच्या मार्गिकेचे निरीक्षण करून या मार्गिकेसाठी सुरक्षा प्रमाणपत्र जारी केले जाणार आहे.

थेट भुयारी मेट्रोने वरळी गाठता येणार

मुंबई मेट्रोची लाइन 3 कुलाबा-वांद्रे ही 33.5 किमी आहे. मुंबईतील ही पहिली भुयारी मेट्रो आहे. यामध्ये 27 भूमिगत स्टेशन आहेत. या मेट्रो प्रकल्पामुळे वांद्रे ते चर्चगेट दरम्यानची गर्दी कमी होईल. आता या मेट्रोच्या आणखी एक टप्पा सुरु होणार आहे. कुलाबा- वांद्रे- सीप्झ मेट्रो केसी-आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानकापर्यंत धावणार आहे.

सुरक्षा प्रमाणपत्र मिळताच टप्पा 2 अ च्या संचलनाचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यामुळे आता काही दिवसातच मुंबईकरांना आरे-आचार्य अत्रे चौक, वरळी असा थेट भुयारी मेट्रो प्रवास करता येणार आहे. हा मेट्रो टप्पा सुरु झाला तर दादर आणि वरळीच्या दिशेने येणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

पहिला टप्पा 2024 मध्ये झाला सुरु

मुंबई मेट्रोचे काम मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून करण्यात येत आहे. गेल्या काही वर्षांपासून 33.5 किलोमीटर लांबीच्या भुयारी मेट्रो मार्गिकेचे काम सुरु आहे. हा संपूर्ण मार्ग नियोजित वेळापत्रकानुसार पूर्ण झाला असता तर मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाला असता. परंतु पहिला टप्पा सुरु होण्यास उशीर झाला. या मार्गिकेचा पहिला टप्पा 7 ऑक्टोबर 2024 मध्ये सुरु झाला. त्यानंतर अजूनही फारसा प्रतिसाद या मार्गावर प्रवाशांकडून मिळत नाही.

Follow Us
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.
जैन समाजासाठी सिलेंडरची सोय, भाजपचा सर्वात मोठा नेता वादाच्या भोवऱ्यात
जैन समाजासाठी सिलेंडरची सोय, भाजपचा सर्वात मोठा नेता वादाच्या भोवऱ्यात.
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?.
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.