AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बारा दिवसात पाणीसाठा दुप्पट, मुंबईकरांना नऊ महिने पुरेल इतकं पाणी

16 ऑगस्टला धरणांमध्ये तब्बल 10 लाख 99 हजार 445 दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा जमा झाला आहे.

बारा दिवसात पाणीसाठा दुप्पट, मुंबईकरांना नऊ महिने पुरेल इतकं पाणी
Nupur Chilkulwar
Nupur Chilkulwar | Updated on: Aug 16, 2020 | 6:16 PM
Share

मुंबई : मुंबईत गेल्या आठवड्यात मुसळधार पाऊस झाला (Mumbai Water Supply). सध्या मुंबईत अधूनमधून पाऊस पडत असला, तरी धरणक्षेत्रात मात्र चांगलाच पाऊस पडत आहे. यामुळे गेल्या 12 दिवसात पाणीसाठ्यात दुप्पट वाढ झाली आहे. 4 ऑगस्ट रोजी सातही धरणातील पाणीसाठा 5 लाख 5 हजार 896 दशलक्ष लिटर इतका होता. आज 16 ऑगस्टला धरणांमध्ये तब्बल 10 लाख 99 हजार 445 दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे धरणांतील पाणीसाठा 75.96 टक्क्यांवर पोहोचला आहे. हा पाणीसाठा पुढील नऊ महिने मुंबईकरांची तहान भागवेल इतका आहे (Mumbai Water Supply).

मुंबईला मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तुळशी आणि विहार या सात धरणांतून पाणीपुरवठा केला जातो. मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी सातही धरणात 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधून दरदिवशी 3850 दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा करण्यात येतो. तलावातील पाण्याच्या पातळीत घट होत असल्याने 5 ऑगस्टपासून 20 टक्के पाणी कपात करण्यात आली. परंतु, सध्या धरण क्षेत्रात सतत पडणाऱ्या पावसामुळे धरणातील पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे.

4 ऑगस्ट रोजी सातही धरणातील पाणीसाठा 5 लाख 5 हजार 896 दशलक्ष लिटर इतका होता. परंतु तलावांमध्ये पावसाची संततधार सुरु असल्याने सध्या म्हणजेच 16 ऑगस्ट सकाळी 6 वाजेपर्यंत सातही धरणांत 10 लाख 99 हजार 445 दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा झाला आहे (Mumbai Water Supply).

मुंबईला पाणी पुरवठा करणारी सर्व धरणं काठोकाठ भरायला सुमारे चार लाख दशलक्ष लिटर पाणी साठ्यात वाढ होण्याची गरज आहे. सात धरणांपैकी 27 जुलैला तुळशी तर 5 ऑगस्टला विहार तलाव ओव्हर फ्लो झाला आहे. सध्या मुंबईत 20 टक्के पाणी कपात केली असली, तरी धरण क्षेत्रात पावसाची संततधार सुरुच आहे. जर धरण पूर्ण भरली तर मुंबईकरावरील 20 टक्के पाणी कपात कमी होऊ शकते.

मागील दोन वर्षांपेक्षा पाणीसाठा कमीच 

  • 16 ऑगस्ट सकाळी 6 वाजेपर्यंत सातही धरणांत 10 लाख 99 हजार 445 दशलक्ष लिटर पाणीसाठा झाला आहे.
  • गेल्या वर्षी आजच्याच दिवशी 13 लाख 56 हजार 012 दशलक्ष लिटर इतका म्हणजेच 93.69 टक्के पाणीसाठा होता.
  • आजच्याच दिवशी 2018 मध्ये 12 लाख 99 हजार 658 दशलक्ष लिटर इतका म्हणजेच ९८.७९ टक्के पाणीसाठा जमा होता.

16 ऑगस्टपर्यंतचा सातही धरणांतील पाणीसाठा 

मुंबईला पाणी पुरवणारी धरणं 16 ऑगस्ट 2020 पर्यंतचा सातही धरणांतील पाणीसाठा
अप्पर वैतरणा1,35,077 दशलक्ष लिटर
मोडक सागर1,16,831 दशलक्ष लिटर
तानसा1,14,013 दशलक्ष लिटर
मध्य वैतरणा1,59,914 दशलक्ष लिटर
भातसा5,36,966 दशलक्ष लिटर
विहार27,698 दशलक्ष लिटर
तुळशी8,046 दशलक्ष लिटर
एकूण10,99,445 दशलक्ष लिटर

Mumbai Water Supply

संबंधित बातम्या :

विरारच्या समुद्रात बुडणाऱ्या तिघांना वाचवले, जीवरक्षकाशीच हुज्जत

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा.

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी.

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं.

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं

…तर मंत्र्यांना स्पष्ट संदेश जाईल, अण्णा हजारेंचं पंतप्रधान मोदींना पत्र, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी.

…तर मंत्र्यांना स्पष्ट संदेश जाईल, अण्णा हजारेंचं पंतप्रधान मोदींना पत्र, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी

Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!.

Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ.

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ