AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“रोज ईडी लावणे, फोडाफोडी करायची हाच भाजपचा कार्यक्रम”; काँग्रेस नेत्याने भाजपवर निशाणा साधला

जनतेचे प्रश्न बाजूला ठेवून ईडी, सीबीआयची भीती दाखवायची हे प्रकार भाजप सत्तेत आल्यापासून सुरू आहेत. त्यामुळे या प्रकारावर बोलणे चुकीचे असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.

रोज ईडी लावणे, फोडाफोडी करायची हाच भाजपचा कार्यक्रम; काँग्रेस नेत्याने भाजपवर निशाणा साधला
| Updated on: Jan 21, 2023 | 8:05 PM
Share

यवतमाळः गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाकडून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यातच आज काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी भाजपवर सडकून टीका करत त्यांनी भाजपच्या राजकीय खेळी कशा असतात हेच त्यांनी दाखवून दिले. भाजपवर टीका करतान त्यांनी म्हटले आहे की, भाजपकडून सातत्याने बहुजन समाजाला डावललण्याची मानसिकता भाजपकडून ठेवण्यात आली आहे.

सध्या भाजपमध्ये दुसऱ्याची घरे तोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र जेव्हा भाजपचे घर फुटेल तेव्हा भाजपला दुसऱ्याची घर फोडण्याचे दुःख कळणार असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला आहे.

आज देशात अनेक प्रश्न आहेत, मात्र त्याकडे भाजपकडून दुर्लक्ष केले जात आहे. बेरोजगारी, महागाई, बेकारी असे अनेक प्रश्न येथील नागरिकांना भेडसावत असूनही भाजप मात्र मुख्य मुद्यांना बगल देत डावलत असल्याचा ठपका त्यांनी भाजपवर ठेवला आहे.

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार पडणार असल्याचे बोलले जात आहे. त्यावर बोलताना नाना पटोले यांनी स्पष्टच सांगितले की, सरकार पडणार की नाही यावर मी कोणतेही भाष्य करणार नाही.

कारण मी संविधान मानणार कार्यकर्ता आहे. भविष्य करणारे ते आहेत मी संविधानाच्या शेड्युल 10 नुसार जे नॉर्म अपात्रतेची असतात ते नॉर्म 16 आमदारांना लागू होतात. आणि त्या प्रमाणे निर्णय होईल म्हणून हे सरकार पडेल असे सांगतो असंही त्यांनी यावेळी म्हटले.

नाना पटोले यांनी भाजपवर टीका करताना त्यांनी आपण संविधान मानणाऱ्यांपैकी एक आहे. त्यामुळे संविधानविरोधी वक्तव्य करणे चुकीचे असल्याचेही त्यांनी म्हटले. नागरिकांचे प्रश्न बाजूला ठेऊन नेत्यांना ईडी, सीबीआयची भीती दाखवायची हाच कार्यक्रम भाजपकडून सुरू आहे.

जनतेचे प्रश्न बाजूला ठेवून ईडी, सीबीआयची भीती दाखवायची हे प्रकार भाजप सत्तेत आल्यापासून सुरू आहेत. त्यामुळे या प्रकारावर बोलणे चुकीचे असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.

कालीचरण महाराज यांनी हिंदूंनी हिंदुत्वासाठी एकत्र यावे असे आव्हान केले आहे. त्यावर बोलताना नाना पटोले यांनी त्यांच्या संतपणावरच सवाल उपस्थित केला आहे.

कालीचरण महाराज हे खरे संत असतील तर त्यावर बोलू शकत नाही तो कुठला संत आहे हे माहिती नाही भगवे कपडे घातले म्हणजे महाराज होत नाही. महाराज यांना एक परिभाषा असते, धर्म प्रचार करणाऱ्यांनी राजकीय मत महाराज व्यक्त करत असतील तर महाराज आहेत की नाही हे पाहावे लागेल असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.

Follow Us
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.