AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“रोज ईडी लावणे, फोडाफोडी करायची हाच भाजपचा कार्यक्रम”; काँग्रेस नेत्याने भाजपवर निशाणा साधला

जनतेचे प्रश्न बाजूला ठेवून ईडी, सीबीआयची भीती दाखवायची हे प्रकार भाजप सत्तेत आल्यापासून सुरू आहेत. त्यामुळे या प्रकारावर बोलणे चुकीचे असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.

रोज ईडी लावणे, फोडाफोडी करायची हाच भाजपचा कार्यक्रम; काँग्रेस नेत्याने भाजपवर निशाणा साधला
| Updated on: Jan 21, 2023 | 8:05 PM
Share

यवतमाळः गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाकडून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यातच आज काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी भाजपवर सडकून टीका करत त्यांनी भाजपच्या राजकीय खेळी कशा असतात हेच त्यांनी दाखवून दिले. भाजपवर टीका करतान त्यांनी म्हटले आहे की, भाजपकडून सातत्याने बहुजन समाजाला डावललण्याची मानसिकता भाजपकडून ठेवण्यात आली आहे.

सध्या भाजपमध्ये दुसऱ्याची घरे तोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र जेव्हा भाजपचे घर फुटेल तेव्हा भाजपला दुसऱ्याची घर फोडण्याचे दुःख कळणार असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला आहे.

आज देशात अनेक प्रश्न आहेत, मात्र त्याकडे भाजपकडून दुर्लक्ष केले जात आहे. बेरोजगारी, महागाई, बेकारी असे अनेक प्रश्न येथील नागरिकांना भेडसावत असूनही भाजप मात्र मुख्य मुद्यांना बगल देत डावलत असल्याचा ठपका त्यांनी भाजपवर ठेवला आहे.

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार पडणार असल्याचे बोलले जात आहे. त्यावर बोलताना नाना पटोले यांनी स्पष्टच सांगितले की, सरकार पडणार की नाही यावर मी कोणतेही भाष्य करणार नाही.

कारण मी संविधान मानणार कार्यकर्ता आहे. भविष्य करणारे ते आहेत मी संविधानाच्या शेड्युल 10 नुसार जे नॉर्म अपात्रतेची असतात ते नॉर्म 16 आमदारांना लागू होतात. आणि त्या प्रमाणे निर्णय होईल म्हणून हे सरकार पडेल असे सांगतो असंही त्यांनी यावेळी म्हटले.

नाना पटोले यांनी भाजपवर टीका करताना त्यांनी आपण संविधान मानणाऱ्यांपैकी एक आहे. त्यामुळे संविधानविरोधी वक्तव्य करणे चुकीचे असल्याचेही त्यांनी म्हटले. नागरिकांचे प्रश्न बाजूला ठेऊन नेत्यांना ईडी, सीबीआयची भीती दाखवायची हाच कार्यक्रम भाजपकडून सुरू आहे.

जनतेचे प्रश्न बाजूला ठेवून ईडी, सीबीआयची भीती दाखवायची हे प्रकार भाजप सत्तेत आल्यापासून सुरू आहेत. त्यामुळे या प्रकारावर बोलणे चुकीचे असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.

कालीचरण महाराज यांनी हिंदूंनी हिंदुत्वासाठी एकत्र यावे असे आव्हान केले आहे. त्यावर बोलताना नाना पटोले यांनी त्यांच्या संतपणावरच सवाल उपस्थित केला आहे.

कालीचरण महाराज हे खरे संत असतील तर त्यावर बोलू शकत नाही तो कुठला संत आहे हे माहिती नाही भगवे कपडे घातले म्हणजे महाराज होत नाही. महाराज यांना एक परिभाषा असते, धर्म प्रचार करणाऱ्यांनी राजकीय मत महाराज व्यक्त करत असतील तर महाराज आहेत की नाही हे पाहावे लागेल असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.

निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.