AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महसूल विभागाचा आजवरचा सर्वात क्रांतिकारी निर्णय, चंद्रशेखर बावनकुळेंनी काय दिली माहिती?

महाराष्ट्र महसूल विभागाने जमिनीचे प्रलंबित महसुली दावे निकाली काढण्यासाठी क्रांतीकारी निर्णय घेतला आहे. 'महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान' अंतर्गत मंडळ अधिकारी ते जिल्हाधिकाऱ्यांपर्यंतचे सर्व दावे १ सप्टेंबर २०२६ ते ३१ मार्च २०२७ या काळात निकाली काढले जातील. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली.

महसूल विभागाचा आजवरचा सर्वात क्रांतिकारी निर्णय, चंद्रशेखर बावनकुळेंनी काय दिली माहिती?
chandrashekhar bawankuleImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 14, 2026 | 11:00 AM
Share

स्वातंत्र्य दिनाच्या एक दिवस आधीच महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाने अत्यंत क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. राज्य सरकार आता मंडळ अधिकारी, तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांपर्यंतच्या न्यायालयातील जमिनीचे सर्व महसूली दावे दावे निकाली काढणार आहे. त्यासाठी महसूल विभाग एक विशेष मोहीम राबवणार आहे. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा माहिती दिली. राज्य सरकारने महसूल विभागातील घेतलेला हा आजवरचा सर्वात क्रांतिकारी निर्णय असल्याचं मानलं जात आहे.

क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाच्या निमित्ताने ‘महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान’ सुरू करण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा मेगा प्लॅन तयार केला आहे. या योजनेनुसार मंडळ अधिकारी, तहसीलदार ते जिल्हाधिकाऱ्यांपर्यंतच्या न्यायालयातील जमिनीचे सर्व महसुली दावे निकाली काढण्यात येणार आहे.

सहा महिने अभियान

1 सप्टेंबर 2026 ते 31 मार्च 2027 दरम्यान राज्यभरात विशेष मोहीम राबवली जाणार आहे. ज्यांच्या ज्यांच्या केसेस तहसीलदारांकडे प्रलंबित आहेत. कलेक्टरकडे प्रलंबित आहेत, वाद सुरू आहेत. ते सोडवण्यासाठी आमचे अधिकारी प्रयत्न करणार आहेत. तुम्हीही या प्रयत्नांना साथ द्या. दर तीन महिन्यांनी लोक अदालत भरवली जाणार आहे. सात महिन्यांत कोट्यवधी दावे निकाली निघणार आहेत, अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.

चाकणमधून उद्योग जाणार नाही

दरम्यान, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी चाकणमधील उद्योगांच्या स्थलांतरावर चिंता व्यक्त केली होती. चाकण औद्योगिक वसाहतीतील तब्बल 20 कंपन्यांनी वाहतूक कोंडी, प्रदूषण, पाणी, वीज आणि रस्त्यांच्या समस्यांमुळे स्थलांतर करण्याचा निर्णय घेतल्याची बाब अत्यंत गंभीर आहे. या कंपन्यांमध्ये सुमारे 2,000 हून अधिक कामगार कार्यरत आहेत, असं ट्विट शरद पवार यांनी केलं होतं. त्यावर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत उद्योगमंत्र्यांनी पुढाकार घेतला आहे. चाकणमधील एमआयडीसी तिथून जाऊ नये. यासाठी आमचा प्रयत्न आहे. चाकण एमआयडीसीत रस्त्याची समस्या होती. नितीन गडकरींनी पुणे-चाकण रस्त्यासाठी सुविधा दिली आहे. गरज पडल्यावर शरद पवारांच्या सूचनेवर उदय सामंत काम करतील. एकही उद्योग परत जाणार नाही याची काळजी घेऊ, असं बावनकुळे म्हणाले.

Follow Us
पाकिस्तानचे PM शाहबाज शरीफ यांची पुन्हा भारताला धमकी
‘सिंधूचं पाणी आमची रेड लाईन’; पाकिस्तानचे PM शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
‘गावातील शाळांना सुविधा मिळेपर्यंत स्वातंत्र्याचं स्वप्न अपूर्ण'-दिपके
‘गावातील शाळांना सुविधा मिळेपर्यंत स्वातंत्र्याचं स्वप्न अपूर्ण'- अभिजीत दिपके
जमिनीच्या वादात अडकलेल्यांसाठी मोठी बातमी! सरकारचा मेगा प्लॅन
Chandrashekhar Bawankule | जमिनीच्या वादात अडकलेल्यांसाठी मोठी बातमी! सरकारचा मेगा प्लॅन; चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली घोषणा, म्हणाले...
जरांगेंच्या टीकेनंतर बावनकुळे भावुक; लाड म्हणाले, ‘वैयक्तिक टीक नको’
जरांगेंच्या टीकेनंतर बावनकुळे भावुक; प्रसाद लाड म्हणाले, ‘वैयक्तिक टीका नको’
मनिषा कायंदे यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल : "शिंदेंच्या जीवावर खासदार
मनिषा कायंदे यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल :
राजकीय उद्योग सोडून उद्योजकांकडे लक्ष द्यावे: सामंतांवर हल्लाबोल
राजकीय उद्योग सोडून उद्योजकांकडे लक्ष द्यावे: रोहित पवारांचा उद्योगमंत्री सामंतांवर हल्लाबोल
संजय राऊत यांचा अमित शाह, निवडणूक आयोगावर घणाघात; म्हणाले...
Sanjay Raut | संजय राऊत यांचा अमित शाह, निवडणूक आयोगावर घणाघात; म्हणाले, बाळासाहेबांचा पक्ष-चिन्ह....
मनीषा कायंदे यांचा संजय राऊतांवर घणाघात; शिंदेंची बाजू घेत सुनावलं...
Manisha Kayande On Sanjay Raut | संजय राऊतांसारखा बोगस माणूस भारतात दिसला नाही! मनीषा कायंदेंचा घणाघात; शिंदेंची बाजू घेत राऊतांना सुनावलं
अमरावती आश्रमशाळा वसतीगृहात 48 ऐवजी 110 मुली एका खोलीत
अमरावती आश्रमशाळा वसतीगृह: क्षमतेपेक्षा दुप्पट विद्यार्थिनी, जीवाशी खेळ सुरु
सुखबीर सिंग बादल यांच्यावर हल्ला,आरोपी जसपाल सिंगच्या पुण्यातील घरावर
नांदेडमध्ये सुखबीर सिंग बादल यांच्यावर हल्ला: एटीएसकडून तपास सुरु, आरोपी जसपाल सिंगच्या पुण्यातील घरावर छापा