AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून हे अयोध्या दौऱ्यावर”; या नेत्याची सडकून टीका…

आजच्या घडीला राज्यातील शेतकऱ्यांना आधार देणे गरजेचे असतानाही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून हे सरकार अयोध्येला गेलेले आहे असा घणाघात त्यांनी केला आहे.

शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून हे अयोध्या दौऱ्यावर; या नेत्याची सडकून टीका...
| Updated on: Apr 09, 2023 | 10:08 PM
Share

मुंबईः राज्यातील शेतकरी अवकाळी आणि गारपीटीमुळे झालेल्या नुकसानीमुळे संकटात आहे. हातातोंडाशी आलेली पिकं वाया गेल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. अशा अवस्थेत राज्यातील जनतेला सरकारची गरज असतानाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अवकाळीचा फटका बसलेला असतानाच अयोध्यच्या दौऱ्यावर गेल्याने आता विरोधकांकडून जोरदार हल्लाबोल केला जात आहे. महाराष्ट्रातील शेतकरी अवकाळी आणि गारपीटीनं उद्धवस्त झाला आहे.

त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापला आहे. भाजीपाला, गहू, मका, कलिंगड अशी पीकं अवकाळीच्या तावडीत सापडल्याने आता शेतकऱ्यांनी जगायचा कसा असा प्रश्न पडला आहे.

शेतकऱ्यांची अवस्था वाईट असतानाही मुख्यमंत्री काही आमदारांना घेऊन अयोध्या दौऱ्यावर गेले आहे. त्यामुळे आता विरोधकांकडून शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला जात आहे.

मागील महिन्यात झालेल्या अवकाळी पावसातही शेतीचे प्रचंड नुकसान झाले होते. त्याचे पंचनामे होऊन नुकसान भरपाई मिळण्याआधीच आता पुन्हा गारपीट झाल्यामुळे शेतीच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करताना त्यांनी सरकारकडून अजून पंचनामे झाले नाहीत. त्यामुळे हे पंचनामे कधी होणार असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

तर मागील वर्षी झालेल्या नुकसानीचे म्हणजेच सप्टेंबर ऑक्टोंबरमधील मदत अजून मिळाली नाही, तरीही हे सरकार अयोध्येच्या दौऱ्यामध्ये मश्गूल असल्याची टी्काही त्यांनी केली आहे.

शेतकऱ्यांची अशी अवस्था असतानाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही आमदारांना घेऊन अयोध्या दौऱ्यावर गेले आहेत. हे अयोध्याचा दर्शन उशिरानंही घेता आलं असतं अशी जोरदार टीका रविकांत तुपकर यांनी केली आहे.

आजच्या घडीला राज्यातील शेतकऱ्यांना आधार देणे गरजेचे असतानाही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून हे सरकार अयोध्येला गेलेले आहे असा घणाघात त्यांनी केला आहे.

Follow Us
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.
शांतता सामर्थ्यवानांची असते; राऊतांना नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर
शांतता सामर्थ्यवानांची असते; राऊतांना नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर.
लोकसभेत विरोधकांचा गदारोळ, सभागृहात जोरदार घोषणाबाजी
लोकसभेत विरोधकांचा गदारोळ, सभागृहात जोरदार घोषणाबाजी.
युद्धामुळे संभाजीनगरमध्ये एलपीजी गॅस पुरवठ्यावर परिणाम
युद्धामुळे संभाजीनगरमध्ये एलपीजी गॅस पुरवठ्यावर परिणाम.
आता सोशल मीडियावर बदनामी करणं महागात पडणार
आता सोशल मीडियावर बदनामी करणं महागात पडणार.
इराण-इस्रायल युद्धाचा थेट महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना फटका
इराण-इस्रायल युद्धाचा थेट महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना फटका.
... म्हणून चर्चा टाळली जातेय; राहुल गांधींचे गंभीर आरोप
... म्हणून चर्चा टाळली जातेय; राहुल गांधींचे गंभीर आरोप.
मुंबईत व्यावसायिक एलपीजी गॅसचा तीव्र तुटवडा
मुंबईत व्यावसायिक एलपीजी गॅसचा तीव्र तुटवडा.
पुण्यात व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळेना; इस्राईल-इराण युद्धाचा परिणाम
पुण्यात व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळेना; इस्राईल-इराण युद्धाचा परिणाम.
जालन्यातील अवैध गर्भपात प्रकरणात दानवेंचे भाजपवर आरोप
जालन्यातील अवैध गर्भपात प्रकरणात दानवेंचे भाजपवर आरोप.