AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून हे अयोध्या दौऱ्यावर”; या नेत्याची सडकून टीका…

आजच्या घडीला राज्यातील शेतकऱ्यांना आधार देणे गरजेचे असतानाही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून हे सरकार अयोध्येला गेलेले आहे असा घणाघात त्यांनी केला आहे.

शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून हे अयोध्या दौऱ्यावर; या नेत्याची सडकून टीका...
| Updated on: Apr 09, 2023 | 10:08 PM
Share

मुंबईः राज्यातील शेतकरी अवकाळी आणि गारपीटीमुळे झालेल्या नुकसानीमुळे संकटात आहे. हातातोंडाशी आलेली पिकं वाया गेल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. अशा अवस्थेत राज्यातील जनतेला सरकारची गरज असतानाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अवकाळीचा फटका बसलेला असतानाच अयोध्यच्या दौऱ्यावर गेल्याने आता विरोधकांकडून जोरदार हल्लाबोल केला जात आहे. महाराष्ट्रातील शेतकरी अवकाळी आणि गारपीटीनं उद्धवस्त झाला आहे.

त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापला आहे. भाजीपाला, गहू, मका, कलिंगड अशी पीकं अवकाळीच्या तावडीत सापडल्याने आता शेतकऱ्यांनी जगायचा कसा असा प्रश्न पडला आहे.

शेतकऱ्यांची अवस्था वाईट असतानाही मुख्यमंत्री काही आमदारांना घेऊन अयोध्या दौऱ्यावर गेले आहे. त्यामुळे आता विरोधकांकडून शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला जात आहे.

मागील महिन्यात झालेल्या अवकाळी पावसातही शेतीचे प्रचंड नुकसान झाले होते. त्याचे पंचनामे होऊन नुकसान भरपाई मिळण्याआधीच आता पुन्हा गारपीट झाल्यामुळे शेतीच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करताना त्यांनी सरकारकडून अजून पंचनामे झाले नाहीत. त्यामुळे हे पंचनामे कधी होणार असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

तर मागील वर्षी झालेल्या नुकसानीचे म्हणजेच सप्टेंबर ऑक्टोंबरमधील मदत अजून मिळाली नाही, तरीही हे सरकार अयोध्येच्या दौऱ्यामध्ये मश्गूल असल्याची टी्काही त्यांनी केली आहे.

शेतकऱ्यांची अशी अवस्था असतानाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही आमदारांना घेऊन अयोध्या दौऱ्यावर गेले आहेत. हे अयोध्याचा दर्शन उशिरानंही घेता आलं असतं अशी जोरदार टीका रविकांत तुपकर यांनी केली आहे.

आजच्या घडीला राज्यातील शेतकऱ्यांना आधार देणे गरजेचे असतानाही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून हे सरकार अयोध्येला गेलेले आहे असा घणाघात त्यांनी केला आहे.

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.