AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून हे अयोध्या दौऱ्यावर”; या नेत्याची सडकून टीका…

आजच्या घडीला राज्यातील शेतकऱ्यांना आधार देणे गरजेचे असतानाही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून हे सरकार अयोध्येला गेलेले आहे असा घणाघात त्यांनी केला आहे.

शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून हे अयोध्या दौऱ्यावर; या नेत्याची सडकून टीका...
| Updated on: Apr 09, 2023 | 10:08 PM
Share

मुंबईः राज्यातील शेतकरी अवकाळी आणि गारपीटीमुळे झालेल्या नुकसानीमुळे संकटात आहे. हातातोंडाशी आलेली पिकं वाया गेल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. अशा अवस्थेत राज्यातील जनतेला सरकारची गरज असतानाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अवकाळीचा फटका बसलेला असतानाच अयोध्यच्या दौऱ्यावर गेल्याने आता विरोधकांकडून जोरदार हल्लाबोल केला जात आहे. महाराष्ट्रातील शेतकरी अवकाळी आणि गारपीटीनं उद्धवस्त झाला आहे.

त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापला आहे. भाजीपाला, गहू, मका, कलिंगड अशी पीकं अवकाळीच्या तावडीत सापडल्याने आता शेतकऱ्यांनी जगायचा कसा असा प्रश्न पडला आहे.

शेतकऱ्यांची अवस्था वाईट असतानाही मुख्यमंत्री काही आमदारांना घेऊन अयोध्या दौऱ्यावर गेले आहे. त्यामुळे आता विरोधकांकडून शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला जात आहे.

मागील महिन्यात झालेल्या अवकाळी पावसातही शेतीचे प्रचंड नुकसान झाले होते. त्याचे पंचनामे होऊन नुकसान भरपाई मिळण्याआधीच आता पुन्हा गारपीट झाल्यामुळे शेतीच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करताना त्यांनी सरकारकडून अजून पंचनामे झाले नाहीत. त्यामुळे हे पंचनामे कधी होणार असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

तर मागील वर्षी झालेल्या नुकसानीचे म्हणजेच सप्टेंबर ऑक्टोंबरमधील मदत अजून मिळाली नाही, तरीही हे सरकार अयोध्येच्या दौऱ्यामध्ये मश्गूल असल्याची टी्काही त्यांनी केली आहे.

शेतकऱ्यांची अशी अवस्था असतानाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही आमदारांना घेऊन अयोध्या दौऱ्यावर गेले आहेत. हे अयोध्याचा दर्शन उशिरानंही घेता आलं असतं अशी जोरदार टीका रविकांत तुपकर यांनी केली आहे.

आजच्या घडीला राज्यातील शेतकऱ्यांना आधार देणे गरजेचे असतानाही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून हे सरकार अयोध्येला गेलेले आहे असा घणाघात त्यांनी केला आहे.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...