AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून हे अयोध्या दौऱ्यावर”; या नेत्याची सडकून टीका…

आजच्या घडीला राज्यातील शेतकऱ्यांना आधार देणे गरजेचे असतानाही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून हे सरकार अयोध्येला गेलेले आहे असा घणाघात त्यांनी केला आहे.

शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून हे अयोध्या दौऱ्यावर; या नेत्याची सडकून टीका...
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Apr 09, 2023 | 10:08 PM
Share

मुंबईः राज्यातील शेतकरी अवकाळी आणि गारपीटीमुळे झालेल्या नुकसानीमुळे संकटात आहे. हातातोंडाशी आलेली पिकं वाया गेल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. अशा अवस्थेत राज्यातील जनतेला सरकारची गरज असतानाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अवकाळीचा फटका बसलेला असतानाच अयोध्यच्या दौऱ्यावर गेल्याने आता विरोधकांकडून जोरदार हल्लाबोल केला जात आहे. महाराष्ट्रातील शेतकरी अवकाळी आणि गारपीटीनं उद्धवस्त झाला आहे.

त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापला आहे. भाजीपाला, गहू, मका, कलिंगड अशी पीकं अवकाळीच्या तावडीत सापडल्याने आता शेतकऱ्यांनी जगायचा कसा असा प्रश्न पडला आहे.

शेतकऱ्यांची अवस्था वाईट असतानाही मुख्यमंत्री काही आमदारांना घेऊन अयोध्या दौऱ्यावर गेले आहे. त्यामुळे आता विरोधकांकडून शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला जात आहे.

मागील महिन्यात झालेल्या अवकाळी पावसातही शेतीचे प्रचंड नुकसान झाले होते. त्याचे पंचनामे होऊन नुकसान भरपाई मिळण्याआधीच आता पुन्हा गारपीट झाल्यामुळे शेतीच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करताना त्यांनी सरकारकडून अजून पंचनामे झाले नाहीत. त्यामुळे हे पंचनामे कधी होणार असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

तर मागील वर्षी झालेल्या नुकसानीचे म्हणजेच सप्टेंबर ऑक्टोंबरमधील मदत अजून मिळाली नाही, तरीही हे सरकार अयोध्येच्या दौऱ्यामध्ये मश्गूल असल्याची टी्काही त्यांनी केली आहे.

शेतकऱ्यांची अशी अवस्था असतानाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही आमदारांना घेऊन अयोध्या दौऱ्यावर गेले आहेत. हे अयोध्याचा दर्शन उशिरानंही घेता आलं असतं अशी जोरदार टीका रविकांत तुपकर यांनी केली आहे.

आजच्या घडीला राज्यातील शेतकऱ्यांना आधार देणे गरजेचे असतानाही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून हे सरकार अयोध्येला गेलेले आहे असा घणाघात त्यांनी केला आहे.

Follow Us
स्टुडंट, इडियट, अंधभक्त... राहुल गांधींच्या वक्तव्याने सभागृहात गदारोळ
Rahul Gandhi | स्टुडंट, इडियट, अंधभक्त... राहुल गांधींच्या एका वक्तव्याने सभागृहात प्रचंड गदारोळ
कर्जमाफी प्रमाणपत्राची प्रत व्हायरल, सोशल मीडियावर नेमकी कसली चर्चा?
Photo | कर्जमाफी प्रमाणपत्राची प्रत व्हायरल, सोशल मीडियावर नेमकी कसली चर्चा?
एकानेही घरी थांबायचं नाही! ज्या मराठ्यांच्या लेकरांवर अन्याय झालाय...
Manoj Jarange Patil | एकानेही घरी थांबायचं नाही! ज्या मराठ्यांच्या लेकरांवर अन्याय झालाय त्यांनी 28 ऑगस्टला अंतरवालीला या; जरांगेंनी पुन्हा फुंकलं आंदोलनाचं रणशिंग
पालिकेची लूटमार सुरू? नव्या गाड्यांच्या प्रस्तावावर पेडणेकर आक्रमक
Kishori Pednekar | पालिकेची लूटमार सुरू आहे का? नव्या गाड्यांच्या प्रस्तावावर किशोरी पेडणेकर आक्रमक
उद्धव ठाकरे ना मंत्री आहेत, ना आमदार तरी थेट... भाजप नेता काय म्हणाला?
उद्धव ठाकरे ना मंत्री आहेत, ना आमदार तरी थेट... राऊतांनी विचारलेल्या प्रश्नांवर भाजप नेत्याने घेरलं
भर मंचावरून केली घोषणा! अखेरचं अन् निर्णायक आंदोलन त्यानंतर...
भर मंचावरून केली घोषणा! अखेरचं अन् निर्णायक आंदोलन त्यानंतर... मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
अक्कलकोटमध्ये गुरुपौर्णिमेचा उत्साह; दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी
Solapur | अक्कलकोटमध्ये गुरुपौर्णिमेचा भक्तिमय उत्साह; स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी
काय ठरलं, CJP पुन्हा जंतर-मंतरवर उतरणार? आंदोलकांवरील...
काय ठरलं, CJP पुन्हा जंतर-मंतरवर उतरणार? आंदोलकांवरील FIR... पुन्हा प्रकरण पेटलं
16.96 लाख शेतकऱ्यांची यादी तयार; बँकांना सरकारचे थेट आदेश
कर्जमाफीत मोठा बदल! 16.96 लाख शेतकऱ्यांची यादी तयार; बँकांना सरकारचे थेट आदेश
84% पेरणी पूर्ण; खताचा तुटवडा नाही! कृषिमंत्र्यांची मोठी गुड न्यूज
Dattatray Bharne | 84% पेरणी पूर्ण; खताचा तुटवडा नाही! कृषिमंत्री दत्ता भरणेंची शेतकऱ्यांना मोठी गुड न्यूज, म्हणाले...