गारपीट झाल्याने बळीराजा हवालदिल; हातातोंडाशी आलेला घासही हिरावून घेतला…

शेतीला दुसऱ्यांदा फटका बसला आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी नुकसान झालेल्या शेतीचे तात्काळ पंचनामे करून लवकरात लवकर नुकसानभरपाई देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. 

गारपीट झाल्याने बळीराजा हवालदिल; हातातोंडाशी आलेला घासही हिरावून घेतला...
Follow us
| Updated on: Apr 09, 2023 | 9:32 PM

इगतपुरी/ नाशिक : नाशिक जिल्ह्याला वादळी वाऱ्यासह झालेल्या गारांच्या पावसाचा मोठा फटका बसला आहे. मागील महिन्यातही झालेल्या गारपीटीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले होते. त्या नुकसानीचे पंचनामे होतात न होतात तेच आता पुन्हा एकदा गारपीट झाल्यामुळे शेतकरी हैराण झाला आहे. शेतकऱ्यांच्या भाजीपाला, गहू, मका, कांदा आणि आंबा व वीटभट्टींचेही प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे आता नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी जगायये कसे असा सवाल आता उपस्थित केला आहे.

इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील बेळगाव तऱ्हाळे, धामणी, पिंपळगाव, मोर धामणगाव, साकूर, टाकेद परिसरात अवकाळी पावसाबरोबरच जोरदार गारपीट झाली आहे.

त्याचबरोबर विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊसही झाला आहे. अनेक ठिकाणी शेतात गारांचा खच पडला असून यामुळे बळीराजा पुरता हैराण झाला आहे.

भाजीपाला, गहू, मका, कांदा, आंबा आणि वीटभट्टी, जणांवराचा चारा यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अवकाळीने हाता तोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्याने बळीराजा हवलदिल झाला आहे. त्यामुळे आता शासनाने त्वरित पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांसह पंचायत समितीचे माजी उपसभापती पांडुरंग वारुंगसे यांनी केली आहे.

अवकाळी पाऊस आणि गारांमुळे शेतातील पिकांचे नुकसान झाले असून आता शेतकऱ्यांनी जगायचे कसे असा सवाल उपस्थित केला जात आहे.

सध्या शेतात भाजीपाला, गहू, मका, कांदा आणि आंबा पिकांना या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. आंब्याच्या ऐन हंगामामध्ये गारांच पाऊस झाल्याने त्याचा फटका आंबा उत्पादनावर होणार आहे.

यावेळी शेतीला दुसऱ्यांदा फटका बसला आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी नुकसान झालेल्या शेतीचे तात्काळ पंचनामे करून लवकरात लवकर नुकसानभरपाई देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.