AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गारपीट झाल्याने बळीराजा हवालदिल; हातातोंडाशी आलेला घासही हिरावून घेतला…

शेतीला दुसऱ्यांदा फटका बसला आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी नुकसान झालेल्या शेतीचे तात्काळ पंचनामे करून लवकरात लवकर नुकसानभरपाई देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. 

गारपीट झाल्याने बळीराजा हवालदिल; हातातोंडाशी आलेला घासही हिरावून घेतला...
| Edited By: | Updated on: Apr 09, 2023 | 9:32 PM
Share

इगतपुरी/ नाशिक : नाशिक जिल्ह्याला वादळी वाऱ्यासह झालेल्या गारांच्या पावसाचा मोठा फटका बसला आहे. मागील महिन्यातही झालेल्या गारपीटीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले होते. त्या नुकसानीचे पंचनामे होतात न होतात तेच आता पुन्हा एकदा गारपीट झाल्यामुळे शेतकरी हैराण झाला आहे. शेतकऱ्यांच्या भाजीपाला, गहू, मका, कांदा आणि आंबा व वीटभट्टींचेही प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे आता नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी जगायये कसे असा सवाल आता उपस्थित केला आहे.

इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील बेळगाव तऱ्हाळे, धामणी, पिंपळगाव, मोर धामणगाव, साकूर, टाकेद परिसरात अवकाळी पावसाबरोबरच जोरदार गारपीट झाली आहे.

त्याचबरोबर विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊसही झाला आहे. अनेक ठिकाणी शेतात गारांचा खच पडला असून यामुळे बळीराजा पुरता हैराण झाला आहे.

भाजीपाला, गहू, मका, कांदा, आंबा आणि वीटभट्टी, जणांवराचा चारा यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अवकाळीने हाता तोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्याने बळीराजा हवलदिल झाला आहे. त्यामुळे आता शासनाने त्वरित पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांसह पंचायत समितीचे माजी उपसभापती पांडुरंग वारुंगसे यांनी केली आहे.

अवकाळी पाऊस आणि गारांमुळे शेतातील पिकांचे नुकसान झाले असून आता शेतकऱ्यांनी जगायचे कसे असा सवाल उपस्थित केला जात आहे.

सध्या शेतात भाजीपाला, गहू, मका, कांदा आणि आंबा पिकांना या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. आंब्याच्या ऐन हंगामामध्ये गारांच पाऊस झाल्याने त्याचा फटका आंबा उत्पादनावर होणार आहे.

यावेळी शेतीला दुसऱ्यांदा फटका बसला आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी नुकसान झालेल्या शेतीचे तात्काळ पंचनामे करून लवकरात लवकर नुकसानभरपाई देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?
ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?.
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद.
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ.
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?.
बेस्ट बसच्या धडकेत चौघांचा मृत्यू, 9 जखमी; भांडुपमध्ये घडलं काय?
बेस्ट बसच्या धडकेत चौघांचा मृत्यू, 9 जखमी; भांडुपमध्ये घडलं काय?.
वरळीत नाराजीनाट्य,आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची मध्यस्थी
वरळीत नाराजीनाट्य,आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची मध्यस्थी.
नागपूरमध्ये शिवसेनेचे नेते नाराज अन् थेट गडकरींच्या भेटीला, कारण काय?
नागपूरमध्ये शिवसेनेचे नेते नाराज अन् थेट गडकरींच्या भेटीला, कारण काय?.
मनसे मुंबई पालिका निवडणूक 52 जागांवर लढवणार, उमेदवार ठरले!
मनसे मुंबई पालिका निवडणूक 52 जागांवर लढवणार, उमेदवार ठरले!.
कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात
कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात.
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार.