AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अवकाळी पावसात होतं नव्हतं सगळं गेलं;कलिंगड, टोमॅटो, कांदा पिकांची लागली वाट…

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे आता तरी सरकारने अवकाळी पावसात नुकसा झालेल्या शेतीची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे. 

अवकाळी पावसात होतं नव्हतं सगळं गेलं;कलिंगड, टोमॅटो, कांदा पिकांची लागली वाट...
| Edited By: | Updated on: Apr 09, 2023 | 8:42 PM
Share

अहमदनगर : मागील महिन्यातही अवकाळी पावसाने शेतीचे प्रचंड नुकसान केले होते. त्याच दरम्यान शासकीय कर्मचाऱ्यांचा संप चालू झाल्यानंतर पिकांच्या नुकसानीचे पंचनामे वेळाने करण्यास सुरुवात झाली होती. ते संपतात न संपतात तोच आता पुन्हा एकदा अवकाळी पावसाने जोरदार थैमान घातले आहे. यावेळी गारांसह जोरदार पाऊस झाल्याने शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

नगर शहरासह जिल्ह्यात काही भागात जोरदार पावसाने हजेरी लावल्याने नगर जिल्ह्यातील काही तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. कलिंगड खरबूज, टोमॅटो आणि कांदा या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसासह गारांचा पाऊस होत असल्याने शेतीचे प्रचंड नुकसान होत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मागील महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाचाही जोरदार फटका बसला होता. या वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात अनेक झाडंही उन्मळून पडली आहेत.

त्यावेळी भाजीपाला, गहू आणि कांदा या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्ंयांनी उभा पिकांवर नांगर फिरवला होता. तर आताही हाता तोंडाशी आलेल्या पिकांना पावसाचा फटका बसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडणार असल्याचे बोलले जात आहे.

अहमदनगर जिल्ह्यात आज वादळी वारा, विजेच्या कडकडाटासह गारांच्या पावसाला सुरुवात झाली. जोरदार पावसाने अनेक भागातील विजेची बत्तीही गुल केली.

त्यामुळे सायंकाळच्यावेळी अनेक गावांवर अंधाराचे साम्राज्य पसरले होते. अहमदनगर, कर्जत, पारनेरसह जिल्ह्यातील अनेक भागात गारपीटाचा मोठा फटका बसला आहे. या पावसामुळे कलिंगड,खरबूज टोमॅटो व कांदा पिकांचे मोठे नुकसान होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे आता तरी सरकारने अवकाळी पावसात नुकसा झालेल्या शेतीची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे.

पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.