अवकाळी पावसात होतं नव्हतं सगळं गेलं;कलिंगड, टोमॅटो, कांदा पिकांची लागली वाट…

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे आता तरी सरकारने अवकाळी पावसात नुकसा झालेल्या शेतीची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे. 

अवकाळी पावसात होतं नव्हतं सगळं गेलं;कलिंगड, टोमॅटो, कांदा पिकांची लागली वाट...
Follow us
| Updated on: Apr 09, 2023 | 8:42 PM

अहमदनगर : मागील महिन्यातही अवकाळी पावसाने शेतीचे प्रचंड नुकसान केले होते. त्याच दरम्यान शासकीय कर्मचाऱ्यांचा संप चालू झाल्यानंतर पिकांच्या नुकसानीचे पंचनामे वेळाने करण्यास सुरुवात झाली होती. ते संपतात न संपतात तोच आता पुन्हा एकदा अवकाळी पावसाने जोरदार थैमान घातले आहे. यावेळी गारांसह जोरदार पाऊस झाल्याने शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

नगर शहरासह जिल्ह्यात काही भागात जोरदार पावसाने हजेरी लावल्याने नगर जिल्ह्यातील काही तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. कलिंगड खरबूज, टोमॅटो आणि कांदा या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसासह गारांचा पाऊस होत असल्याने शेतीचे प्रचंड नुकसान होत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मागील महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाचाही जोरदार फटका बसला होता. या वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात अनेक झाडंही उन्मळून पडली आहेत.

त्यावेळी भाजीपाला, गहू आणि कांदा या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्ंयांनी उभा पिकांवर नांगर फिरवला होता. तर आताही हाता तोंडाशी आलेल्या पिकांना पावसाचा फटका बसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडणार असल्याचे बोलले जात आहे.

अहमदनगर जिल्ह्यात आज वादळी वारा, विजेच्या कडकडाटासह गारांच्या पावसाला सुरुवात झाली. जोरदार पावसाने अनेक भागातील विजेची बत्तीही गुल केली.

त्यामुळे सायंकाळच्यावेळी अनेक गावांवर अंधाराचे साम्राज्य पसरले होते. अहमदनगर, कर्जत, पारनेरसह जिल्ह्यातील अनेक भागात गारपीटाचा मोठा फटका बसला आहे. या पावसामुळे कलिंगड,खरबूज टोमॅटो व कांदा पिकांचे मोठे नुकसान होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे आता तरी सरकारने अवकाळी पावसात नुकसा झालेल्या शेतीची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे.

Non Stop LIVE Update
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.
नेहरुंनतर मोदी तिसरे PM बनणार, राज यांची 'शिवतीर्था'वरून थेट घोषणाच
नेहरुंनतर मोदी तिसरे PM बनणार, राज यांची 'शिवतीर्था'वरून थेट घोषणाच.
तेव्हापासून ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणं सोडल, फडणवीसांची टीका
तेव्हापासून ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणं सोडल, फडणवीसांची टीका.
त्यामुळे मला पाठींबा द्या, बिचूकले लोकसभेच्या रिंगणात, केली मोठी मागणी
त्यामुळे मला पाठींबा द्या, बिचूकले लोकसभेच्या रिंगणात, केली मोठी मागणी.
बैठका अन सभांचा सपाटा सुरु असताना जरांगेंची प्रकृती बिघडली, उपचार सुरू
बैठका अन सभांचा सपाटा सुरु असताना जरांगेंची प्रकृती बिघडली, उपचार सुरू.
राज ठाकरेंच्या इंजिनमध्ये भाजपचा कोळसा,कुणी केली जिव्हारी लागणारी टीका
राज ठाकरेंच्या इंजिनमध्ये भाजपचा कोळसा,कुणी केली जिव्हारी लागणारी टीका.
तोंडाच्या वाफेने काही करता येतं पण... काँग्रेस नेत्याची ठाकरेंवर टीका
तोंडाच्या वाफेने काही करता येतं पण... काँग्रेस नेत्याची ठाकरेंवर टीका.