AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अवकाळी पावसात होतं नव्हतं सगळं गेलं;कलिंगड, टोमॅटो, कांदा पिकांची लागली वाट…

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे आता तरी सरकारने अवकाळी पावसात नुकसा झालेल्या शेतीची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे. 

अवकाळी पावसात होतं नव्हतं सगळं गेलं;कलिंगड, टोमॅटो, कांदा पिकांची लागली वाट...
| Edited By: | Updated on: Apr 09, 2023 | 8:42 PM
Share

अहमदनगर : मागील महिन्यातही अवकाळी पावसाने शेतीचे प्रचंड नुकसान केले होते. त्याच दरम्यान शासकीय कर्मचाऱ्यांचा संप चालू झाल्यानंतर पिकांच्या नुकसानीचे पंचनामे वेळाने करण्यास सुरुवात झाली होती. ते संपतात न संपतात तोच आता पुन्हा एकदा अवकाळी पावसाने जोरदार थैमान घातले आहे. यावेळी गारांसह जोरदार पाऊस झाल्याने शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

नगर शहरासह जिल्ह्यात काही भागात जोरदार पावसाने हजेरी लावल्याने नगर जिल्ह्यातील काही तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. कलिंगड खरबूज, टोमॅटो आणि कांदा या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसासह गारांचा पाऊस होत असल्याने शेतीचे प्रचंड नुकसान होत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मागील महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाचाही जोरदार फटका बसला होता. या वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात अनेक झाडंही उन्मळून पडली आहेत.

त्यावेळी भाजीपाला, गहू आणि कांदा या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्ंयांनी उभा पिकांवर नांगर फिरवला होता. तर आताही हाता तोंडाशी आलेल्या पिकांना पावसाचा फटका बसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडणार असल्याचे बोलले जात आहे.

अहमदनगर जिल्ह्यात आज वादळी वारा, विजेच्या कडकडाटासह गारांच्या पावसाला सुरुवात झाली. जोरदार पावसाने अनेक भागातील विजेची बत्तीही गुल केली.

त्यामुळे सायंकाळच्यावेळी अनेक गावांवर अंधाराचे साम्राज्य पसरले होते. अहमदनगर, कर्जत, पारनेरसह जिल्ह्यातील अनेक भागात गारपीटाचा मोठा फटका बसला आहे. या पावसामुळे कलिंगड,खरबूज टोमॅटो व कांदा पिकांचे मोठे नुकसान होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे आता तरी सरकारने अवकाळी पावसात नुकसा झालेल्या शेतीची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.