AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अवकाळी पावसात होतं नव्हतं सगळं गेलं;कलिंगड, टोमॅटो, कांदा पिकांची लागली वाट…

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे आता तरी सरकारने अवकाळी पावसात नुकसा झालेल्या शेतीची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे. 

अवकाळी पावसात होतं नव्हतं सगळं गेलं;कलिंगड, टोमॅटो, कांदा पिकांची लागली वाट...
| Edited By: | Updated on: Apr 09, 2023 | 8:42 PM
Share

अहमदनगर : मागील महिन्यातही अवकाळी पावसाने शेतीचे प्रचंड नुकसान केले होते. त्याच दरम्यान शासकीय कर्मचाऱ्यांचा संप चालू झाल्यानंतर पिकांच्या नुकसानीचे पंचनामे वेळाने करण्यास सुरुवात झाली होती. ते संपतात न संपतात तोच आता पुन्हा एकदा अवकाळी पावसाने जोरदार थैमान घातले आहे. यावेळी गारांसह जोरदार पाऊस झाल्याने शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

नगर शहरासह जिल्ह्यात काही भागात जोरदार पावसाने हजेरी लावल्याने नगर जिल्ह्यातील काही तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. कलिंगड खरबूज, टोमॅटो आणि कांदा या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसासह गारांचा पाऊस होत असल्याने शेतीचे प्रचंड नुकसान होत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मागील महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाचाही जोरदार फटका बसला होता. या वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात अनेक झाडंही उन्मळून पडली आहेत.

त्यावेळी भाजीपाला, गहू आणि कांदा या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्ंयांनी उभा पिकांवर नांगर फिरवला होता. तर आताही हाता तोंडाशी आलेल्या पिकांना पावसाचा फटका बसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडणार असल्याचे बोलले जात आहे.

अहमदनगर जिल्ह्यात आज वादळी वारा, विजेच्या कडकडाटासह गारांच्या पावसाला सुरुवात झाली. जोरदार पावसाने अनेक भागातील विजेची बत्तीही गुल केली.

त्यामुळे सायंकाळच्यावेळी अनेक गावांवर अंधाराचे साम्राज्य पसरले होते. अहमदनगर, कर्जत, पारनेरसह जिल्ह्यातील अनेक भागात गारपीटाचा मोठा फटका बसला आहे. या पावसामुळे कलिंगड,खरबूज टोमॅटो व कांदा पिकांचे मोठे नुकसान होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे आता तरी सरकारने अवकाळी पावसात नुकसा झालेल्या शेतीची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे.

आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास.
आम्ही काँग्रेसला हव्या त्या जागा...; जागावाटपावर राऊतांचा खुलासा
आम्ही काँग्रेसला हव्या त्या जागा...; जागावाटपावर राऊतांचा खुलासा.
गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया
गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया.
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा.
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की...
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की....
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा.