अण्णाभाऊ साठे चरित्र प्रकाशन समितीकडे ठाकरे सरकारचे दुर्लक्ष, मंडळाच्या माजी अध्यक्षांचा आरोप

| Updated on: Jul 11, 2021 | 4:05 PM

अण्णाभाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समितीकडे राज्य सरकार दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप मंडळाचे माजी अध्यक्ष व भाजप प्रदेश सचिव अमित गोरखे यांनी केली आहे.

अण्णाभाऊ साठे चरित्र प्रकाशन समितीकडे ठाकरे सरकारचे दुर्लक्ष, मंडळाच्या माजी अध्यक्षांचा आरोप
ANNABHAU SATHE
Follow us on

मुंबई : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे चरित्र साहित्य प्रकाशित करण्याकरता स्थापन करण्यात आलेल्या अण्णाभाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समितीकडे राज्य सरकार दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप मंडळाचे माजी अध्यक्ष व भाजप प्रदेश सचिव अमित गोरखे यांनी केली आहे. (Thackeray government ignores Anna Bhau Sathe Charitra Sadhane Prakashan Samiti, Allegations by former chairman of the board)

गोरखे म्हणाले की, अनेक महिने उलटून गेले तरी नव्याने स्थापन झालेल्या समितीची बैठक झाली नाही. तसेच नियुक्त सदस्यांना ओळखपत्र देण्याचे कामसुद्धा शिक्षण विभागाने केलेले नाही. फडणवीस सरकारच्या काळात त्यावेळचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी साठे यांचे साहित्य प्रकाशित करून ते शेवटच्या घटकांपर्यंत पोहचवण्याचे काम केले होते.

त्यानंतर सत्तेत आलेल्या महाविकास आघाडी सरकारने ही समिती बरखास्त करून उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली जम्बो समिती स्थापन करण्यात आली. मात्र या समितीच्या कामकाजाकडे दुर्लक्ष होत आहे. प्रकाशन समितीची बैठक घेण्यास राज्य सरकार नकारात्मक भूमिकेत असल्याची टीका गोरखे यांनी केली आहे.

इतर बातम्या

पंकजा मुंडे अचानक दिल्लीला रवाना, जेपी नड्डांशी चर्चा करणार; तर्कवितर्कांना उधाण

राज्यघटनेनुसार सहकार हा विषय राज्य सरकारचाच, महाराष्ट्रात गंडांतर येणार नाही; शरद पवारांचं मोठं विधान

कोकणात शिवसेना-भाजपच्या नेत्यांचे ‘मनोमिलन’; विनायक राऊतांनी थोपटली नितेश राणेंची पाठ

(Thackeray government ignores Anna Bhau Sathe Charitra Sadhane Prakashan Samiti, Allegations by former chairman of the board)