Devendra Fadnavis : मला अमिताभ बच्चन म्हटलं, पण माझं शरीर अमजद खानसारखं; फडणवीस असं का म्हणाले?

| Updated on: Aug 20, 2022 | 2:43 PM

आपल्याला मुंबईकरांचा खटला जनतेच्या न्यायालयात लढायचा आहे. जनतेच्या मनातून फायनल जजमेंट येईल, याचा मला विश्वास आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Devendra Fadnavis : मला अमिताभ बच्चन म्हटलं, पण माझं शरीर अमजद खानसारखं; फडणवीस असं का म्हणाले?
मुंबईतल्या भाजपा कार्यकर्ता मेळाव्यात शिवसेनेवर टीका करताना देवेंद्र फडणवीस
Image Credit source: Twitter
Follow us on

मुंबई : भाजपा एक टीम आहे. माझा उल्लेख झाला, मला अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) म्हटले. माझे शरीर अमजद खानसारखे आहे. पण हे मला अमिताभ बच्चन म्हणत आहेत, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले. मुंबईतील भाजपा कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी मागून कितने आदमी थे, असा आवाज आला, त्यावर ते म्हणाले, हे विचारू शकतो. कितने आदमी थे. 65 मे से 50 निकल गये. और सबकुछ बदल गया. अभी दोही बचे है, असा टोला त्यांनी शिवसेनेला (Shivsena) लगावला. ते म्हणाले, दोनच राहिले पण त्यांचाही सन्मान आहे. आम्ही विरोधकांना सन्मान देतो. मला जो सन्मान मिळाला तो भाजपाच्या कार्यकर्त्यांमुळे. तुम्ही मेहनत केली. तुम्ही मला नेता बनवले. त्या यशाचा मान मला मिळाला, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

‘किमान डायलॉग तरी चेंज करावा’

भाजपा मुंबई कार्यकर्ता मेळावा आणि नवनियुक्त अध्यक्ष आशिष शेलार तसेच नूतन मंत्री मंगलप्रभात लोढा यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात त्यांनी मुंबई महापालिकेच्या निमित्ताने शिवसेनेला लक्ष्य केले. ते म्हणाले, की निवडणूक जवळ आल्यावर भावनिक मुद्दे सुरू होतील. मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचे षडयंत्र, असा आरोप होईल. त्यांना माहीत आहे, मुंबईला महाराष्ट्रापासून तोडले जाणार नाही. कारण संविधान आहे. पण मुद्दाम भ्रम तयार केला जात आहे. त्यांनी किमान डायलॉग तरी चेंज करावा, असा टोला शिवसेनेला लगावला.

‘बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे’

मुंबई महापालिकेला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून बाहेर काढावे लागेल. काही लोकांना महाराष्ट्र गेल्याचे दु:ख नाही. त्यांना मुंबई महापालिकेचे दुख आहे. बाळासाहेबांनी जे स्वप्न पाहिले होते ते पूर्ण करायची जबाबदारी आपली आहे. काही लोक आत्ममग्न होते. त्यांनी आम मुंबईकरांकडे लक्ष दिले नाही. बाळासाहेबांचे नाव घेऊन निवडून आलेल्यांनी काहीच केले नाही. त्यामुळे आपल्याला मेहनत करून बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे, असे टोले त्यांनी शिवसेनेला लगावले.

हे सुद्धा वाचा

फडणवीसांची शिवसेनेवर टीका

‘आपल्याला मार्केटिंग करायचे नाही, पण…’

आपल्याला मुंबईकरांचा खटला जनतेच्या न्यायालयात लढायचा आहे. जनतेच्या मनातून फायनल जजमेंट येईल, याचा मला विश्वास आहे. रखडलेला विकास पूर्ण करणार आहोत. सामान्य माणसाचे स्वप्न आपण पूर्ण करणार आहोत. धारावीतील अडथळे तीन महिन्यात दूर करू, असे म्हणत आपल्याला मार्केटिंग करायचे नाही. पण ज्याच्यासाठी काम करत आहोत, त्याच्यापर्यंत ते पोहोचवायचे आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

‘माझे शरीर अमजद खानसारखे’