AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : देशात 4 जूनला कुणाचं सरकार? नामवंत राजकीय विश्लेषकांचे वेगवेगळे दावे

लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत देशात अनेकांनी वेगवेगळे दावे केले आहेत. अशातच दोन नामवंत राजकीय विश्लेषकांनी वेगवेगळे दावे केलेत. कोणाच्या बाजूने केलेत जाणून घ्या.

Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : देशात 4 जूनला कुणाचं सरकार? नामवंत राजकीय विश्लेषकांचे वेगवेगळे दावे
| Updated on: May 22, 2024 | 10:21 PM
Share

देशात 4 जूनला कुणाचं सरकार बनणार. यावरुन दावे-प्रतिदावे सुरु आहेत. देशातल्या दोन नामवंत राजकीय विश्लेषकांचं याबाबत दोन वेगवेगळी मतं आहेत. एक दावा आहे की यंदा एकटी भाजपच ३०० चा आकडा पार करेल. तर दुसऱ्या दाव्यानुसार यंदा भाजपसह एनडीए बहुमताच्या खाली राहू शकते. या दोन्ही दाव्यांना आधार काय आहेत.

निवडणुकांचा ५ टक्के पूर्ण झाल्यानंतर देशात कुणाचं सरकार येणार, यावरुन दावे-प्रतिदावे सुरु झाले आहेत. एक दावा सांगतोय की भाजप आरामात तीनशेचा आकडा पार करेल, तर दुसरा दावा आहे की भाजप यंदा स्वबळावर बहुमताचा आकडा गाठू शकत नाही. एक दावा आहे की एनडीएचा आकडा 400 नाही पण हमखास 300 च्या पुढेच असणार., दुसरा दावा आहे की एनडीए मिळूनही बहुमत हे कट टू कट होण्याची शक्यता आहे.

पाहा व्हिडीओ:-

543 पैकी 428 जागांवर मतदान पूर्ण झालंय. उरल्या आहेत 115 जागा. 25 मे आणि 1 जूनला उरलेल्या सहाव्या आणि सातव्या टप्प्याचं मतदान होईल आणि 4 जूनला देशानं कुणाला कौल दिला हे स्पष्ट होणाराय. 2019 ला पाचव्या टप्प्यानंतर 438 जागांवर मतदान पूर्ण झालं होतं., त्यावेळी कोण किती जागा जिंकलेलं, याची आकडेवारी पाहूयात. यापैकी भाजप 238, एनडीए 275, काँग्रेस 44 तर यूपीएनं 85 जागांवर विजय मिळवला होता.

यंदा मात्र दोन्ही बाजूनं आपल्यालाच कौल मिळण्याचा विश्वास व्यक्त होतोय. देशाच्या सत्तेत 80 लोकसभा जागांचं उत्तर प्रदेश महत्वाचं असलं, तरी यंदा बिहार, महाराष्ट्र, पश्चिम बंगालच्या निकालाकडेही सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Follow Us
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण.
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्...
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्....
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू.
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार.
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?.
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना...
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा.....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा......
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?.
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री..
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री...