Raut on Navneet Rana Case: हनुमान चालिसाच्या माध्यमातून मुंबईचं वातावरण बिघडवण्याचा डाव, अंडरवर्ल्डचंही कनेक्शन; राऊतांनी बॉम्ब टाकला

| Updated on: Apr 27, 2022 | 12:22 PM

Raut on Navneet Rana Case: संजय राऊत हे मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी गंभीर आरोप करत राणा दाम्पत्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे.

Raut on Navneet Rana Case: हनुमान चालिसाच्या माध्यमातून मुंबईचं वातावरण बिघडवण्याचा डाव, अंडरवर्ल्डचंही कनेक्शन; राऊतांनी बॉम्ब टाकला
हनुमान चालिसाच्या माध्यमातून मुंबईचं वातावरण बिघडवण्याचा डाव, अंडरवर्ल्डचंही कनेक्शन; राऊतांनी बॉम्ब टाकला
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी अंडरवर्ल्डशी संबंधित युसूफ लकडावालाकडून 80 लाख रुपये घेतल्याचं उघड झालं आहे. त्यावरून राज्यात खळबळ उडाली आहे. या मुद्द्यावरून शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी राणा यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. हनुमान चालिसाच्या निमित्ताने मुंबईचं (mumbai) वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न होता. त्यात मला अंडरवर्ल्ड कनेक्शन दिसतंय, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. राऊत यांनी या प्रकरणाचा थेट 1992-93च्या दंगलीशी संबंधही जोडला आहे. मुंबईत 1992-93ला दंगली झाल्या. त्यात अंडरवर्ल्ड कनेक्शन होतं. पाकिस्तानचं कनेक्शन होतं. डी गँगचं कनेक्शन होतं. माफिया टोळ्या होत्या. मला आता तसंच दिसतंय. सरकारलाही तेच दिसतंय, गेल्या 15 दिवसात जे काही घडलंय त्यावरून पुन्हा एकदा त्याच प्रकारचं वातावरण निर्माण करण्याचं काम सुरू असलेलं दिसतंय. भोंगे प्रकरण, हनुमान चालिसा प्रकरण यामागे डी गँग आणि त्यांचा पैसा काम करतोय असंच दिसतंय, असा गंभीर आरोपही राऊत यांनी केला आहे.

संजय राऊत हे मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी गंभीर आरोप करत राणा दाम्पत्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे. युसूफ लकडावाला आणि राणा दाम्पत्याचे आर्थिक हितसंबंध कसे आहे याचं लहानसं प्रकरण समोर आलं. त्याची चौकशी का झाली नाही? लकडवालाने मनी लॉन्ड्रिंग करून त्याचा पैसा अनेक ठिकाणी फिरवला. राणा दाम्पत्य हे एक त्याचे लाभार्थी आहेत. त्यांनी 80 लाख रुपये घेतले. का घेतले? कशासाठी घेतले? आंतरराष्ट्रीय गुन्हेगार असलेल्या आणि डि गॅँगशी संबंधित लकडावालाच्या पैशाचा वापर कुठे झाला? एवढेच पैसे आहेत की अजून आहेत? याचा तपास मुंबईच्या ईओडब्ल्यूने का केला नाही? असा सवाल राऊत यांनी केला आहे.

मुख्यमंत्र्यांकडे राणांची आणखी प्रकरणं

लकडावालाच्या मनी लाँडरिंग प्रकरणात सर्वांची चौकशी होते. तर मग राणा यांची चौकशी का होत नाही? त्या या प्रकरणातून कशा सुटू शकतात? त्यांना वाचवणाऱ्या कोणत्या आंतरराष्ट्रीय शक्ती आहे. त्यांच्या माध्यमातून राज्यात अस्थिरता करण्याचा प्रयत्न आहे. माझ्याकडे अनेक प्रकरण आली. कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे ही प्रकरणे दिली आहेत. ते योग्य ठिकाणी देतील, असं त्यांनी सांगितलं.