AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vande Bharat | वंदे भारत ट्रेनमध्ये महत्वाचा बदल, प्रवाशांना मिळणार आता फक्त…

Vande Bharat Tain | रेल्वे प्रवासात अनेक प्रवासी एक लिटर बाटलीमधील काहीसे पाणी पिऊन उर्वरित पाणी फेकून देत होते. त्यामुळे पाण्याचा अपव्यय होत होता. त्यामुळे वंदे भारतमध्ये आता एक लिटरऐवजी अर्ध्या लिटरच्या पाण्याची बाटली मिळणार आहे.

Vande Bharat | वंदे भारत ट्रेनमध्ये महत्वाचा बदल, प्रवाशांना मिळणार आता फक्त...
| Updated on: Mar 15, 2024 | 10:05 AM
Share

मुंबई | 15 मार्च 2024 : वंदे भारत एक्स्प्रेस देशात सर्वाधिक लोकप्रिय ठरली आहे. आता देशात शंभर वंदे भारत एक्स्प्रेस सुरु झाल्या आहेत. सेमीहायस्पीड असलेली ही ट्रेन सुरु करण्याबाबत सर्वत्र मागणी वाढत आहे. यामुळे १२ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा वंदे भारत एक्स्प्रेस सुरु केल्या. महाराष्ट्रातून गांधीनगर, अहमदाबाद, सोलापूर, शिर्डी, मडगाव, जालना या मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस धावत आहे. या गाड्यांमध्ये आता एक बदल करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. यामुळे पाण्याची आणि पैशांची बचत होणार आहे. आता वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये एका लिटरऐवजी अर्ध्या लिटरच्या पाण्याची बाटली मिळणार आहे.

काय आहे बदल

महाराष्ट्रातून धावणाऱ्या सर्व वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये रेलनीर ही पाण्याची बाटली दिली जाते. ‘रेलनीर’ हा भारतीय रेल्वेचा बाटली बंद पाण्याचा ब्रँड आहे. मात्र ‘रेलनीर’ची बाटली एक लिटरची असल्याने ती खरेदी करणे आणि रेल्वे प्रवासात बाळगणे प्रवाशांना त्रासदायक होत होते. यामुळे अर्धा लिटर म्हणजेच ५०० मिलीची बाटलीबंद पाणी पुरवण्याची मागणी प्रवाशांकडून केली होती. तसेच रेल्वे प्रवासात अनेक प्रवासी एक लिटर बाटलीमधील काहीसे पाणी पिऊन उर्वरित पाणी फेकून देत होते. त्यामुळे पाण्याचा अपव्यय होत होता. त्यामुळे वंदे भारतमध्ये आता एक लिटरऐवजी अर्ध्या लिटरच्या पाण्याची बाटली मिळणार आहे.

या गाड्यांमध्ये असणार बदल

रेलनीलच्या एक लिटर पाण्याची बाटलीऐवजी अर्धा लिटरची बाटली दिली जाणार आहे. त्यामुळे मुंबईतून सुटणाऱ्या गांधीनगर, अहमदाबाद, सोलापूर, शिर्डी, मडगाव, जालना या वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांसाठी ५०० मिलीची पाण्याची बाटली उपलब्ध असेल. या निर्णयामुळे प्रवाशांची मागणी पूर्ण होणार आहे. तसेच पाण्याची बचत होणार आहे.

वंदे भारत एक्सप्रेसमध्ये तिकीटासोबत फूड घेतल्यास त्याचे वेगवेगळे चार्जस आहेत. 65 पासून ते 350 रुपायांपर्यंत चार्ज त्यासाठी आकारला जातो. वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये चहाचे दर 15 रुपये आहेत.

Follow Us
सांगली जिल्हा परिषदेत मविआची सत्ता, अध्यक्षपदी पवार गटाची महिला
सांगली जिल्हा परिषदेत मविआची सत्ता, अध्यक्षपदी पवार गटाची महिला.
उद्या गुढीपाडवा... पण नववर्ष कधी सुरू होणार?
उद्या गुढीपाडवा... पण नववर्ष कधी सुरू होणार?.
ठाकरे युतीनंतर पहिलाच गुढीपाडवा मेळावा, राज ठाकरे काय बोलणार?
ठाकरे युतीनंतर पहिलाच गुढीपाडवा मेळावा, राज ठाकरे काय बोलणार?.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गॅस तुटवड्यानंतर आणखी एक मोठं संकट
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गॅस तुटवड्यानंतर आणखी एक मोठं संकट.
मुंबईला गँगवॉरकडे जाऊ देणार नाही - CM फडणवीस
मुंबईला गँगवॉरकडे जाऊ देणार नाही - CM फडणवीस.
दिल्ली मेट्रो स्टेशनजवळील सदनगर परिसरात भीषण आग; 7 जणांचा मृत्यू
दिल्ली मेट्रो स्टेशनजवळील सदनगर परिसरात भीषण आग; 7 जणांचा मृत्यू.
बलिदान मास पूर्ण करत, शंभू भक्तांकडून छत्रपती संभाजी महाराजांना अभिवाद
बलिदान मास पूर्ण करत, शंभू भक्तांकडून छत्रपती संभाजी महाराजांना अभिवाद.
अजित पवारांच्या अपघातावरून रोहित पवार यांचा थेट सरकारवर आरोप
अजित पवारांच्या अपघातावरून रोहित पवार यांचा थेट सरकारवर आरोप.
दिल्ली दौऱ्यात शिंदेचं मोदींसोबत खलबतं; केंद्रीय मंत्रिमंडळ....
दिल्ली दौऱ्यात शिंदेचं मोदींसोबत खलबतं; केंद्रीय मंत्रिमंडळ.....
हे सर्व भाजपचे अंगवस्त्र, संजय राऊत यांची कुणावर टीका; काय दिला इशारा?
हे सर्व भाजपचे अंगवस्त्र, संजय राऊत यांची कुणावर टीका; काय दिला इशारा?.