WATER CUT : मुंबईकरांवर दोन दिवस पाणी कपातीचे संकट, कोणत्या विभागात पूर्ण पाणी बंद? घ्या जाणून

मुंबईला पाणीपुरवठा सुरळीतपणे होण्यासाठी बारा विभागात पाणी बंद तर दोन विभागात पाणी कपात करण्यात येणार आहे. नवीन दुरुस्ती कामे हाती घेण्यात येणार असल्यामुळे मुंबईकरांवर पाणी कपातीचे संकट ओढवणार आहे.

WATER CUT : मुंबईकरांवर दोन दिवस पाणी कपातीचे संकट, कोणत्या विभागात पूर्ण पाणी बंद? घ्या जाणून
WATER MARK Image Credit source: TV9 NETWORK
Follow us
| Updated on: Jan 26, 2023 | 6:03 PM

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता आणि पाणीपुरवठा प्रकल्प या दोन खात्याद्वारे भांडुप संकुल येथील जलशुद्धीकरण केंद्रास अतिरिक्त ४ हजार मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी जोडणे, विविध जल वाहिन्यांवर झडपा बसविणे, नवीन जलवाहिन्यांची जोडणी यासोबतच अन्य २ ठिकाणी उद्भवलेली गळती दुरुस्त करणे अशी कामे हाती घेतली जाणार आहेत. महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना अधिक सुरळीतपणे आणि चांगल्या पद्धतीने पाणीपुरवठा व्हावा यासाठी ही कामे हाती घेतली जात आहेत. यामुळे २९ जानेवारी ते ४ फेब्रुवारी या दरम्यान महानगरपालिकेच्या बारा विभागांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

मुंबईतील १२ विभागात ३० जानेवारी सकाळी १० ते ३१ जानेवारी सकाळी १० पर्यंत महानगरपालिकेच्या २४ विभागांपैकी १२ विभागातील पाणीपुरवठा पूर्णतः बंद असणार आहे. तर, दोन विभागात २५ टक्के पाणी कपात केली जाणार आहे.

हे सुद्धा वाचा

पश्चिम उपनगरातील के पूर्व, के पश्चिम, पी दक्षिण, पी उत्तर, आर दक्षिण, आर मध्य, आर उत्तर, एच पूर्व, एच पश्चिम आणि पूर्व उपनगरातील एस, एन आणि एल विभाग अशा १२ विभागातील अनेक परिसरात पाणीपुरवठा पूर्णपणे खंडित करण्यात येणार आहे. त्यामुळे पाण्याचा वापर जपून करावा असे आवाहन महापालिकेने केले आहे.

३० व ३१ जानेवारी २०२३ रोजी ‘जी उत्तर’ आणि ‘जी दक्षिण’ या २ विभागातील प्रभादेवी, माहीम, दादर आणि माटुंगा ( पश्चिम ) परिसरातील पाणीपुरवठ्यात २५ टक्के कपात केली जाणार आहे. धारावी परिसरातही जेथे दुपारी ४ ते सायंकाळी ९ दरम्यान पाणीपुरवठा होणाऱ्या भागात ३० जानेवारी रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद असणार आहे, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेचे जल अभियंता पुरुषोत्तम माळवदे यांनी दिली आहे.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.