मुंबई : मुंबईसह राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. जोरदार पावसामुळे मुंबईसह इतर सखल भागात अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. पावसाचा जोर पाहता प्रशासनाने मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणे या तीन जिल्ह्यात सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. मुंबईसह वसई-विरार, ठाणे-कल्याण, शहापूर या भागात दोन दिवसापासून जोरदार पाऊस कोसळत आहे. याशिवाय कोकणातही मुसळधार पाऊस कोसळत आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्गाला पावसाने झोडपून काढलं आहे. रविवारी मध्यरात्रीपासून सुरु असलेल्या पावसाची सतंतधार आजही सुरु आहे. यामुळे मुसळधार पावसामुळे मुंबईसह इतर ठिकाणी अनेक ठिकाणी पाणी तुंबले. त्यामुळे दिवसभर मुंबईतील रस्ते, रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. तर मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखणाऱ्या रेल्वेच्या तिन्ही लाईन्स ठप्प झाल्या आहेत.
मुंबईतील अनेक भागात पाणी साचलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या घरात गुडघाभर पाणी साचलं आहे. नवाब मलिक यांनी स्वत: ट्विट करुन याबाबतची माहिती दिली. ट्विटमध्ये त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, सीएमओ महाराष्ट्र आणि शिवसेनेला टॅग केलं आहे. त्यासोबत करुन दाखवलं अशी टॅगलाईन दिली.
Thanks @MCGM_BMC pic.twitter.com/VTmhEtKcav
— Nawab Malik (@nawabmalikncp) July 1, 2019
My home @uddhavthackeray @ShivSena @CMOMaharashtra @MCGM_BMC
Karun dakhavla@MumbaiNCP @NCPspeaks #MumbaiRainsLive #MumbaiRains pic.twitter.com/372GbptoPQ— Nawab Malik (@nawabmalikncp) July 1, 2019