AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिवावासीयांसाठी आनंदाची बातमी! पाणीटंचाईचा प्रश्न कायमचा मिटणार, मंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या सूचना!

एकनाथ शिंदे यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीला उद्योगमंत्री सुभाष देसाई व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित होते. दिवामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून लोकसंख्येमध्ये वाढ होत असल्यामुळे पाणी वाढवून मिळावे अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने जोर धरू लागली होती. त्यामुळेच आता साडेसहा एमएलडी पाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

दिवावासीयांसाठी आनंदाची बातमी! पाणीटंचाईचा प्रश्न कायमचा मिटणार, मंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या सूचना!
मुंबईत सोमवारपासून पाणी कपात
| Updated on: Jun 14, 2022 | 2:45 PM
Share

मुंबई : दिवाकरांसाठी (Diva) एक अत्यंत मोठी आणि महत्वाची बातमी आहे. दिवाकरांची आता पाणीटंचाईपासून कायमची सुटका होणार आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकताच जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना पाण्यासंदर्भात सूचना दिल्या आहेत. यामुळे दिवावासीयांची आता पाणीटंचाईपासून कायमची सुटका होणार आहे. दिवाकरांना जादा सहा एमएलडी पाणी मिळणार आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी कालच जलसंपदा विभागालाच्या अधिकाऱ्यांना यासंदर्भात सुचना दिल्यात. मान्सूम अजून राज्यामध्ये दाखल झाला नाहीये. मात्र, गेल्या चार दिवसांपासून अनेक ठिकाणी पावसाच्या (Rain) सरी बरसल्या आहेत. आता पावसाळा तोंडावर असताना दिवावायिकांना मुबलक प्रमाणात पाणी मिळणार आहे.

जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक

एकनाथ शिंदे आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीला उद्योगमंत्री सुभाष देसाई व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित होते. दिवामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून लोकसंख्येमध्ये वाढ होत असल्यामुळे पाणी वाढवून मिळावे अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने जोर धरू लागली होती. त्यामुळेच आता साडेसहा एमएलडी पाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. दिवामधील पाणीटंचाईचा विषय गंभीर होता. लोकांना मुबलक प्रमाणात पाणी मिळत नव्हते. मात्र, नवीन निर्णयामुळे दिवा येथील लोकांना मोठा दिलास मिळणार आहे.

दिवाकरांचे पाण्याचे टेन्शन मिटणार

दिवाच्या पाणी प्रश्नी घेण्यात आलेल्या बैठकीला खासदार शिंदे, नरेश म्हस्के, आयुक्त श्रीकांत शिंदे, डॉ. विपिन शर्मा, जिल्हाधिकारी राजेश कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्र नार्वेकर, दिवा सुदाम परदेशी, ठाणे, कल्याण डोबिवली महापालिकांचे नगरसेवक, महाराष्ट्र औद्योगिक विकास, महामेदव व जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता आदी उपस्थित होते. विशेष म्हणजे याच बैठकीमध्ये कल्याण-डोंबिवलीच्या पाणीटंचाई संदर्भात देखील चर्चा करण्यात आली. कल्याण-डोंबिवलीच्या पाणीटंचाईबद्दल एकनाथ शिंदे लवकर पाहणी करून निर्णय घेतील, असेही सांगण्यात येते आहे.

Follow Us
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता.
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान.
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड.
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम.
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती.
रुपाली ठोंबरे यांचा रुपाली चाकणकरांना सूचक इशारा; आणखी काय म्हणाल्या?
रुपाली ठोंबरे यांचा रुपाली चाकणकरांना सूचक इशारा; आणखी काय म्हणाल्या?.
देशात इंधनाचा तुटवडा नाही, युद्धजन्य परिस्थितीचाही परिणाम नाही.....
देशात इंधनाचा तुटवडा नाही, युद्धजन्य परिस्थितीचाही परिणाम नाही......
खरातच्या मुलीला फ्लॅट भेट, चौकशीसाठी चाकणकरांना का बोलावले नाही?
खरातच्या मुलीला फ्लॅट भेट, चौकशीसाठी चाकणकरांना का बोलावले नाही?.
अस्मानी संकटाचा कहर... शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् हुंदके...
अस्मानी संकटाचा कहर... शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् हुंदके....
अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं
अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं.