AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिवावासीयांसाठी आनंदाची बातमी! पाणीटंचाईचा प्रश्न कायमचा मिटणार, मंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या सूचना!

एकनाथ शिंदे यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीला उद्योगमंत्री सुभाष देसाई व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित होते. दिवामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून लोकसंख्येमध्ये वाढ होत असल्यामुळे पाणी वाढवून मिळावे अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने जोर धरू लागली होती. त्यामुळेच आता साडेसहा एमएलडी पाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

दिवावासीयांसाठी आनंदाची बातमी! पाणीटंचाईचा प्रश्न कायमचा मिटणार, मंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या सूचना!
मुंबईत सोमवारपासून पाणी कपात
| Updated on: Jun 14, 2022 | 2:45 PM
Share

मुंबई : दिवाकरांसाठी (Diva) एक अत्यंत मोठी आणि महत्वाची बातमी आहे. दिवाकरांची आता पाणीटंचाईपासून कायमची सुटका होणार आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकताच जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना पाण्यासंदर्भात सूचना दिल्या आहेत. यामुळे दिवावासीयांची आता पाणीटंचाईपासून कायमची सुटका होणार आहे. दिवाकरांना जादा सहा एमएलडी पाणी मिळणार आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी कालच जलसंपदा विभागालाच्या अधिकाऱ्यांना यासंदर्भात सुचना दिल्यात. मान्सूम अजून राज्यामध्ये दाखल झाला नाहीये. मात्र, गेल्या चार दिवसांपासून अनेक ठिकाणी पावसाच्या (Rain) सरी बरसल्या आहेत. आता पावसाळा तोंडावर असताना दिवावायिकांना मुबलक प्रमाणात पाणी मिळणार आहे.

जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक

एकनाथ शिंदे आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीला उद्योगमंत्री सुभाष देसाई व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित होते. दिवामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून लोकसंख्येमध्ये वाढ होत असल्यामुळे पाणी वाढवून मिळावे अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने जोर धरू लागली होती. त्यामुळेच आता साडेसहा एमएलडी पाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. दिवामधील पाणीटंचाईचा विषय गंभीर होता. लोकांना मुबलक प्रमाणात पाणी मिळत नव्हते. मात्र, नवीन निर्णयामुळे दिवा येथील लोकांना मोठा दिलास मिळणार आहे.

दिवाकरांचे पाण्याचे टेन्शन मिटणार

दिवाच्या पाणी प्रश्नी घेण्यात आलेल्या बैठकीला खासदार शिंदे, नरेश म्हस्के, आयुक्त श्रीकांत शिंदे, डॉ. विपिन शर्मा, जिल्हाधिकारी राजेश कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्र नार्वेकर, दिवा सुदाम परदेशी, ठाणे, कल्याण डोबिवली महापालिकांचे नगरसेवक, महाराष्ट्र औद्योगिक विकास, महामेदव व जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता आदी उपस्थित होते. विशेष म्हणजे याच बैठकीमध्ये कल्याण-डोंबिवलीच्या पाणीटंचाई संदर्भात देखील चर्चा करण्यात आली. कल्याण-डोंबिवलीच्या पाणीटंचाईबद्दल एकनाथ शिंदे लवकर पाहणी करून निर्णय घेतील, असेही सांगण्यात येते आहे.

Follow Us
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हेंचा टोला
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हे यांचा मिश्किल टोला, म्हणाल्या तुमचा उजवा हात...
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे....
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे.... मोठ्या पर्यावरण संकटाला निमंत्रण
शिंदे गटातील नेत्याची थेट धमकी, माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला....
माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला थेट... पुन्हा शिंदें गटातील बड्या नेत्याची भर मंचावरून धमकी
याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटो...
Nashik Kumbh | याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटोबाबत अखेर सांगितलंच
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान
मोठी बातमी! आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, त्यामुळे... शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
संपुर्ण वंदे मातरम् गीताचे गायन केल्यामुळे सोनिया गांधी नाराज?
संपुर्ण वंदे मातरम् गीताचे गायन केल्यामुळे सोनिया गांधी नाराज? 'त्या' व्हिडीओचं सत्य काय?
भाजप शिवसेनेत पडद्याआड मोठा संघर्ष! तिरंगा रॅलीतील 'त्या' व्हिडीओने...
मोठी बातमी! भाजप-शिवसेनेत पडद्याआड मोठा संघर्ष! तिरंगा रॅलीतील 'त्या' व्हिडीओने चर्चांना उधाण
प्रताप सरनाईकांनंतर आता आणखी एका बड्या मंत्र्याचं 'ऑपरेशन टायगर'बाबत..
प्रताप सरनाईकांनंतर आता आणखी एका बड्या मंत्र्याचं 'ऑपरेशन टायगर'बाबत सुचक विधान, थेट म्हणाले...
नोकर आहात, नोकरांसारखे वागा; भर बैठीकीतच शिंदेंचा आमदार कडाडला...
Video | नोकर आहात, नोकरांसारखे वागा; भर बैठीकीतच शिंदेंचा आमदार कडाडला, असं काय घडलं की...
प्रताप सरनाईकांच्या दाव्यानंतर कैलास पाटलांची मोठी प्रतिक्रिया, थेट...
प्रताप सरनाईकांच्या दाव्यानंतर कैलास पाटलांची मोठी प्रतिक्रिया, थेट... धारशिवमध्ये राजकीय समीकरण पुन्हा बदलणार?