AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंडित नेहरुंवर टीका करण्याचं कारण काय?, सुप्रिया सुळे यांनी सांगितलं

महिला क्रिकेटपटूंना जर मानधन चांगलं दिलं असेल तर त्याचा स्वागत आहे.

पंडित नेहरुंवर टीका करण्याचं कारण काय?, सुप्रिया सुळे यांनी सांगितलं
सुप्रिया सुळे यांनी यादीच सांगितली Image Credit source: tv 9
| Edited By: | Updated on: Oct 28, 2022 | 9:50 PM
Share

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, हे असंवेदनशील सरकार आहे. बांधावर घेत जात आढावा घेतला पाहिजे. मेळावा सण साजरे करण्यासाठी सरकार आहे का, शेतकरी वर्गासाठी आढावा घेत का नाहीत, असा सवाल त्यांनी विचारला. राज्यात अनेक ठिकाणी ओला दुष्काळ परिस्थिती आहे. ओला दुष्काळ जाहीर करावा. थोडा वेळ मिळाला तर सरकारने याकडे लक्ष दिलं पाहिजे.

विषय रिझर्व्ह बँकेचा आहे. त्यात आमचे मत रिझर्व्ह बँकनं मागितले नाही. अरुण जेटली या विषयावर नेहमी म्हणायची की या विषयावरती चर्चा करण्यात अर्थ नाही. त्यामुळे चर्चा न केलेलीच बरी.

महिला क्रिकेटपटूंना जर मानधन चांगलं दिलं असेल तर त्याचा स्वागत आहे. हा निर्णय चांगला आहे. बीसीसीआय स्वायत्त संस्था आहे. निर्णय घेण्याचा त्यांना अधिकार आहे.

कोणास किती निधी मिळाला याचे लोकप्रतिनिधी यांनी आढावा घ्यायला पाहिजे. म्हणून प्रत्येक जण आपलं काम करत असतो. निधी मिळवणं त्यांचं काम आहे. त्यात काही गैर आहे असं मला वाटत नाही, असंही सुप्रिया सुळे म्हणाले.

बच्चू कडू खूप संवेदनशील आहेत. त्यांचे विधान काय म्हटले ते मी ऐकलं नाही. पण ज्या पद्धतीने चर्चा आहे अख्या गावामध्ये चर्चा आहे की हे खोके सरकार आहे. 50 कोटी मिळून ही सरकार सत्तेवर आले. त्यामुळेच त्यांची जर बदनामी होत असेल तर त्याची उत्तर दिली गेली पाहिजेत, असं मला वाटतं.

नेहरून सारखं वैज्ञानिक दृष्टिकोन कोणाचाही नव्हता. त्यांनी देशाच्या प्रगतीचा विचार करून अनेक संस्था नावारूपास आणल्या. त्यामध्ये आयआयटी असेल आयपीएस अकॅडमी असेल भारतीय लष्कर असेल. या सर्वांमधून भारताची प्रगती झाली. आता मोदींना दुसरा मुद्दा काही हाताशी नाही. त्यामुळे नेहरूंवरती ते टीका करत आहेत, असा आरोप सुप्रिया सुळे यांनी लावला.

Follow Us
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.