AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंडित नेहरुंवर टीका करण्याचं कारण काय?, सुप्रिया सुळे यांनी सांगितलं

महिला क्रिकेटपटूंना जर मानधन चांगलं दिलं असेल तर त्याचा स्वागत आहे.

पंडित नेहरुंवर टीका करण्याचं कारण काय?, सुप्रिया सुळे यांनी सांगितलं
सुप्रिया सुळे यांनी यादीच सांगितली Image Credit source: tv 9
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Oct 28, 2022 | 9:50 PM
Share

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, हे असंवेदनशील सरकार आहे. बांधावर घेत जात आढावा घेतला पाहिजे. मेळावा सण साजरे करण्यासाठी सरकार आहे का, शेतकरी वर्गासाठी आढावा घेत का नाहीत, असा सवाल त्यांनी विचारला. राज्यात अनेक ठिकाणी ओला दुष्काळ परिस्थिती आहे. ओला दुष्काळ जाहीर करावा. थोडा वेळ मिळाला तर सरकारने याकडे लक्ष दिलं पाहिजे.

विषय रिझर्व्ह बँकेचा आहे. त्यात आमचे मत रिझर्व्ह बँकनं मागितले नाही. अरुण जेटली या विषयावर नेहमी म्हणायची की या विषयावरती चर्चा करण्यात अर्थ नाही. त्यामुळे चर्चा न केलेलीच बरी.

महिला क्रिकेटपटूंना जर मानधन चांगलं दिलं असेल तर त्याचा स्वागत आहे. हा निर्णय चांगला आहे. बीसीसीआय स्वायत्त संस्था आहे. निर्णय घेण्याचा त्यांना अधिकार आहे.

कोणास किती निधी मिळाला याचे लोकप्रतिनिधी यांनी आढावा घ्यायला पाहिजे. म्हणून प्रत्येक जण आपलं काम करत असतो. निधी मिळवणं त्यांचं काम आहे. त्यात काही गैर आहे असं मला वाटत नाही, असंही सुप्रिया सुळे म्हणाले.

बच्चू कडू खूप संवेदनशील आहेत. त्यांचे विधान काय म्हटले ते मी ऐकलं नाही. पण ज्या पद्धतीने चर्चा आहे अख्या गावामध्ये चर्चा आहे की हे खोके सरकार आहे. 50 कोटी मिळून ही सरकार सत्तेवर आले. त्यामुळेच त्यांची जर बदनामी होत असेल तर त्याची उत्तर दिली गेली पाहिजेत, असं मला वाटतं.

नेहरून सारखं वैज्ञानिक दृष्टिकोन कोणाचाही नव्हता. त्यांनी देशाच्या प्रगतीचा विचार करून अनेक संस्था नावारूपास आणल्या. त्यामध्ये आयआयटी असेल आयपीएस अकॅडमी असेल भारतीय लष्कर असेल. या सर्वांमधून भारताची प्रगती झाली. आता मोदींना दुसरा मुद्दा काही हाताशी नाही. त्यामुळे नेहरूंवरती ते टीका करत आहेत, असा आरोप सुप्रिया सुळे यांनी लावला.

Follow Us
सुनेत्रा पवारांचे अध्यक्षपद खरंच अवैध? सचिदानंद सिंह यांची पुन्हा रिमा
सुनेत्रा पवारांचे अध्यक्षपद खरंच अवैध? सचिदानंद सिंह यांची पुन्हा रिमाईंडर नोटीस, आता...
मूळ शिवसेना कुणाची? 7 दिवसांच्या सुनावणीनंतर निकाल कोणत्या वळणावर?
मूळ शिवसेना कुणाची? 7 दिवसांच्या सुनावणीनंतर निकाल कोणत्या वळणावर? आज ठाकरेंचे वकील...
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं घडणार? शरद पवार आणि पार्थ पवार भेटीनंतर
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं घडणार? शरद पवार आणि पार्थ पवार भेटीनंतर भलत्याच चर्चांना उधाण, 3 तासांच्या बैठकीत...
धाकधुक वाढली! शिवसेनेचं चिन्ह गोठणार की... वकील अनंत कळसेंचं विधान
धाकधुक वाढली! शिवसेनेचं चिन्ह गोठणार की... वकील अनंत कळसेंचं सुचक वक्तव्य, अखेर मोठी अपडेट समोर
मोठी बातमी! लाडकी बहिण योजनेबाबत मुख्यमंत्री फडणीसांचं मोठ विधान
मोठी बातमी! लाडकी बहिण योजनेतील अपात्रतेबाबत मुख्यमंत्री फडणीसांचं मोठं विधान; काय म्हणाले?
जुन्नरच्या अत्याचार प्रकरणावरून राऊतांचा फडणवीस, शिंदेंवर हल्लाबोल,
जुन्नरच्या अत्याचार प्रकरणावरून राऊतांचा फडणवीस, शिंदेंवर हल्लाबोल, अमृता फडणवीसांनाही म्हणाले...
उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार? अमित ठाकरे...
Pocket Money Scheme : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार? अमित ठाकरे म्हणाले..
श्रीमद्भागवत वाचल्यास अपघाती मृत्यू टळतो; अजित पवारांचा उल्लेख करत...
श्रीमद्भागवत वाचल्यास अपघाती मृत्यू टळतो; अजित पवारांचा उल्लेख करत डॉ. सूरदास यांनी काय काय सांगितलं?
'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही' आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल; 'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही'
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू