AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘आमचं सरकार आलं तर…’, नागपूरच्या रॅलीतून राहुल गांधी यांचं मोठं आश्वासन

काँग्रेसची नागपुरात आज भव्य सभा पार पडली. या सभेत राहुल गांधी यांनी संबोधित केलं. या सभेत राहुल गांधी यांनी देशातील जनतेला महत्त्वाचं आश्वासन दिलं. विशेष म्हणजे राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भूमेकिच्या अगदी विरोधी भूमिकेचं आश्वासन दिलं आहे.

'आमचं सरकार आलं तर...', नागपूरच्या रॅलीतून राहुल गांधी यांचं मोठं आश्वासन
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Dec 28, 2023 | 6:22 PM
Share

नागपूर | 28 डिसेंबर 2023 : राज्यात आरक्षणावरुन वातावरण तापलं आहे. मराठा समाज आरक्षणसाठी आक्रमक झालाय. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळावं, अशी मागणी केलीय. तर त्यावरुन ओबीसी नेते आक्रमक झाले आहेत. ओबीसी समाजाचं हक्काचं आरक्षणात कुणाला वाटा देऊ नये, अशी ओबीसी नेत्यांची भूमिका आहे. तर धनगर समाजाची देखील आरक्षणाबाबत महत्त्वाची मागणी आहे. देशात धनखड समाज म्हणून जो उल्लेख आहे त्याचा अर्थ धनगर असा होतो. त्यामुळे धनगर समाजालाही त्यांच्या हक्काचं आरक्षण मिळावं, अशी त्यांची मागणी आहे. राज्यासह देशातील अनेक भागांमध्ये आरक्षणाबाबत मागण्या आहेत. त्यामुळे सर्वात आधी जातीय जनगणेनीची मागणी केली जात आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पार पडलेल्या बौद्धिक शिबिरात संघाचे विदर्भ सरसंघचालक श्रीधर घाडगे यांनी भूमिका जाहीर केली होती. यावेळी त्यांनी जातीय जनगणनेची गरज नाही, असं म्हटलं. पण काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज महाराष्ट्रात येऊन याबाबत मोठी घोषणा केलीय.

काँग्रेस पक्षाचा आज 139 वा वर्धापन दिवस आहे. या दिनाच्या निमित्ताने नागपुरात भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमाला राहुल गांधी यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी जातीय जनगणनेबाबत भूमिका स्पष्ट केली. आमचं सरकार आलं तर सर्वात आधी देशात जातगणना केली जाईल, असं आश्वासन राहुल गांधी यांनी दिलं.

‘जातीय जनगणना झाली पाहिजे’

“मी संसदेत भाजपच्या लोकांना विचारलं, हिंदुस्तानला 90 टक्के लोकं चालवतात. IAS अधिकारी आहेत. मी विचारलं, यापैकी ओबीसी, दलित, आदिवासी किती आहेत? भाजपचे लोक गप्प झाले. ओबीसींची कमीत कमी २० टक्के लोकसंख्या आहे, दलित १५ टक्के, आदिवासींची १२ टक्के लोकसंख्या आहे. ९० पैकी ३ अधिकारी ओबीसी समाजाचे आहेत. त्यांना कोपऱ्यात बसवतात, छोटे-छोटे विभाग देतात. भारतातील मोठ्या कंपन्या काढा आणि त्यात ओबीसी, दलित, आदिवासी समाजाचं कोण आहे ते दाखवून द्या. प्रत्येक क्षेत्रात हीच अवस्था आहे. त्यामुळे जातीय जनगणना झाली पाहिजे”, अशी स्पष्ट भूमिका राहुल गांधी यांनी मांडली.

राहुल गांधींचं मोठं आश्वासन

“मी मागणी केली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बोल बदलले. भारतात एकच जात आहे ती म्हणजे गरीब. एकच जात आहे तर तुम्ही ओबीसी कसे आहात? आमचं सरकार जेव्हा येईल तेव्हा जातीय जनगणना करुन दाखवू”, असं आश्वासन राहुल गांधी यांनी दिलं. “ही विचारधारेची लढाई आहे. कोट्यवधी लोकांना भाजप सरकारने गरिबीत ढकललं आहे. जे काम आम्ही मनरेगाच्या मदतीने केलं ते या लोकांनी सर्व संपवून टाकलं. आम्हाला दोन हिंदुस्तान नकोय, एक हिंदुस्तान अरबपतींचा, खोट्या स्वप्नांचा असेल, त्यात काही तथ्य नाही. देशाचे जवान सोशल मीडियाने जगू शकत नाही. त्यांना रोजगार हवा आहे. हे काम फक्त इंडिया आघाडी करु शकते. कारण या कामासाठी देशाचा आवाज ऐकावा लागेल”, असं राहुल गांधी म्हणाले.

‘संपूर्ण देशात निवडणूक जिंकू’

“द्वेष दूर करावा लागेल. देशाला जोडून पुढे जावं लागेल. आम्ही कन्याकुमारी ते काश्मीर चाललो, चार हजार किमी चाललो. द्वेषाच्या बाजारात तुम्ही प्रेमाचं दुकान खोलू इच्छूक असाल तर तुम्ही काँग्रेसी आहात. मी महाराष्ट्राच्या काँग्रेस कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो, कारण तुम्ही स्पेशल आहात, मी भारत जोडो यात्रेच महाराष्ट्रात आलो तेव्हा मी विचार केला ही काँग्रेसची जमीन आहे. इथे लोकांना न समजवता विचारधारा समजते. त्यामुळे आम्ही आज महाराष्ट्रात आलो आहोत. तुम्ही गब्बर शेर आहात. तुम्हाला कुणालाच घाबरायचं कारण नाही. तुमची विचारधारेची, मनाची लढाई आहे. तुम्ही आणि आम्ही एकत्र मिळून महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशात निवडणूक जिंकणार आहोत”, असा दावा राहुल गांधींनी केला.

Follow Us
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
पेगलवाडी रस्त्याची पाहणी. विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
आदित्य ठाकरे यांच्याकडून त्र्यंबकेश्वरमधील पेगलवाडी रस्त्याची पाहणी. विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
कोर्टातील निकालाच मोठा परिणाम हा... शिंदेंच्या गट नेत्याचं मोठं विधान
कोर्टातील निकालाच मोठा परिणाम हा... एकीकडे कोर्टात सुनावणी सुरू दुसरीकडे शिंदेंच्या गट नेत्याचं मोठं विधान