AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Campaign | क्षयरोग दुरीकरण मोहीम, गुंतवणूक करा व जीव वाचवा; 2025 पर्यंत भारत क्षयरोग मुक्त?

क्षयरोग दुरीकरण अभियान यशस्वी कारणासाठी सर्वांनी सहकार्य करणे आवश्यक आहे. लोकांमध्ये व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याची गरज आहे. क्षयरोग जनजागृतीसाठी आयोजित कार्यक्रमाची मुख्य थीम टीबी संपविण्यासाठी गुंतवणूक करा व जीव वाचवा (Invest to End TB save lives) ही आहे.

Campaign | क्षयरोग दुरीकरण मोहीम, गुंतवणूक करा व जीव वाचवा; 2025 पर्यंत भारत क्षयरोग मुक्त?
क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमात उपस्थित मान्यवर. Image Credit source: tv 9
| Updated on: Mar 26, 2022 | 6:00 AM
Share

नागपूर : वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहीरवार (Dr. Narendra Bahirwar) म्हणाले, भारतात क्षयरोग दुरीकरण मोहिमेला (Tuberculosis Eradication Campaign in India) 60 वर्षापेक्षा अधिक कालावधी झालेला आहे. 2025 पर्यंत भारतातून क्षयरोग दूर करावयाचा आहे. हे दुरीकरण अभियान यशस्वी कारणासाठी सर्वांनी सहकार्य करणे आवश्यक आहे. लोकांमध्ये व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याची गरज आहे. क्षयरोग जनजागृतीसाठी आयोजित कार्यक्रमाची मुख्य थीम टीबी संपविण्यासाठी गुंतवणूक करा व जीव वाचवा (Invest to End TB save lives) ही आहे. यावेळी डॉ. बहिरवार यांनी Invest चा अर्थ समजावून सांगितलं. I – Invest, N – Notification, V – Valufication, E – Energy, S – Sincerely आणि T – Time. या थीम प्रमाणे आपण जर आपल्या जीवनात बदल केला तर नक्कीच 2025 पर्यंत भारत क्षयरोग मुक्त होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. हे अभियान यशस्वी करण्यासाठी सर्व आरोग्य चमूने सहकार्य करावे, असे आवाहनही यावेळी डॉ. बहिरवार यांनी केले.

क्षयरोग झाला म्हणजे आयुष्य संपत नाही

क्षयरोग आजार झाला आहे किंवा नाही हे लवकर लक्षात येत नाही. आजार वाढल्यानंतर जेव्हा लक्षणे दिसू लागतात तेव्हा क्षयरोगाचे निदान होते. मात्र निदान झाल्यानंतर रुग्ण बिमारी पेक्षा भीतीनेच जास्त खचून जातो. अशा वेळी रुग्णाला गरज असते मानसिक आधाराची. एकदा क्षयरोगाचे निदान झाले की ते योग्य उपचाराने बरे होते. त्यामुळे क्षयरोग झाले म्हणजे आयुष्य संपले, असा विचार कुणीही मनात आणू नये, असे आवाहन वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार यांनी केले.

उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा सत्कार

नागपूर महापालिकेच्या आरोग्य विभागाद्वारे जागतिक क्षयरोग दिनाच्या अनुषंगाने महाल येथील राजे रघुजी भोसले नगर भवन येथे क्षयरोग जनजागृती कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी मेयोचे सहयोगी प्राध्यापक डॉ. ज्ञानशंकर मिश्रा, डॉ. राजेश बल्लाळ, डॉ. सय्यद तारिक, डॉ. झारीया, डॉ. शिल्पा जिचकार, शहर क्षयरोग अधिकारी मनपा, वैद्यकीय अधिकारी डॉ. व्ही. एम. महेश्वर, डॉ. सदफ खतिब व सर्व झोनल वैद्यकीय अधिकारी, आशा वर्कर्स आदी उपस्थित होते. प्रास्ताविक शहर क्षयरोग अधिकारी डॉ. शिल्पा जिचकार यांनी केले. यावेळी क्षयरोग दुरीकरण मोहिमेत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शासकीय तसेच खासगी डॉक्टर्स, अशा वर्कर्स, खासगी स्तरावरील केमिस्ट यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

CM Uddhav Thackeray: कोविड घोटाळ्यापासून मलिकांच्या राजीनाम्यापर्यंत; मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील 10 मोठे मुद्दे

मुंबई ते दिल्ली “पेनड्राईव्ह बॉम्ब”ची दहशत, मुंबईत फडणवीस तर दिल्लीत नवनीत राणांकडून पुरावे सादर

Maharashtra News Live Update : केंद्रानं दिलेली व्हेंटिलेटर चालली नाहीत, त्याची टेंडर काढलेली का? : उद्धव ठाकरे

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.